शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

"अखंड भारत कधीपर्यंत पाहता येईल?"; सरसंघचालक मोहन भागवतांनी दिलं रोखठोक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 09:02 IST

विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात विचारण्यात आला होता अखंड भारताबद्दलचा प्रश्न

Mohan Bhagwat, Akhand Bharat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांचे अखंड भारताबाबत मोठे वक्तव्य समोर आले आहे. देशाची परिस्थिती बदलत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतापासून वेगळे झालेल्या देशांना त्यांची चूक कळत असून त्यांना पुन्हा भारतात सामील व्हायचे आहे, असा दावा त्यांनी केला. एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना भागवत म्हणाले की, देश अखंड भारत कधी बनेल हे मी सांगू शकत नाही, पण म्हातारे होण्यापूर्वीच दिसेल. नागपूरच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.

अखंड भारत कधी निर्माण होणार?

वसतिगृहातील एका विद्यार्थ्याने भागवतांना विचारले की, भारत देशाला अखंड भारत म्हणून कधी बघता येणार आहे. त्यावर उत्तर देताना भागवत म्हणाले, 'नक्की कधीपर्यंत ते मी आता सांगू शकत नाही. त्यासाठी आपल्याला ग्रहज्योतिष पाहावे लागेल. मी प्राण्यांचा डॉक्टर आहे. पण मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही आतापासून विचार केलात तर तुम्ही म्हातारे होण्यापूर्वी तुम्हाला ते दिसेल.'

'विभक्त देशांना भारतात सामील व्हायचे आहे'

"देशातील परिस्थिती असे वळण घेत आहे. भारतापासून वेगळे झालेल्यांना आपण चूक केली असे वाटते. पुन्हा भारतात सामील व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. पण पुन्हा भारत बनणे म्हणजे नकाशावरील रेषा संपवणे, असे त्यांचे मत आहे. मी असे मानत नाही, कारण ते तसे होणार नाही. भारत असणे म्हणजे भारताचे स्वरूप स्वीकारणे. भारताचा स्वभाव मान्य नव्हता, त्यामुळे अखंड भारताचे तुकडे करण्यात आले. हा स्वभाव परत आल्यावर संपूर्ण भारत एक होईल. सर्व शेजारी देशांना त्यांच्या जीवनातून हे शिकावे लागेल. हे काम आपल्याला करायचे आहे आणि ते आपण करत आहोत. आम्ही मालदीवला पाणी पोहोचवतो, श्रीलंकेला पैसे पोहोचवतो, भूकंपात नेपाळला मदत करतो, बांगलादेशला मदत करतो. सगळ्यांना मदत करतो," असा उल्लेख त्यांनी केला.

'भारत हा दक्षिण आशियाई देशाचा एक भाग आहे'

भागवत एक किस्सा सांगताना म्हणाले की, 1992-93 मध्ये सार्कचे अध्यक्ष असताना श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष प्रेमदासा म्हणाले होते की, जगातील मोठे देश लहान देशांना गिळंकृत करतात. म्हणूनच आपण सर्वांनी सावध राहून संघटित व्हायला हवे. दक्षिण आशियातील देशांसाठी हे अवघड काम नाही. आज आपल्याला जगात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते, पण प्रत्यक्षात आपण एकाच भूमीचे, भारताचे मुख्य भाग आहोत. भारत ही माझी आई आहे, मी तिचा मुलगा आहे, असा हा भाग निर्माण झाला आहे. आपले पूर्वज एकच आहेत. ज्या मूल्यांवर आपली संस्कृती उभी आहे ती सर्वत्र सारखीच आहेत," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतIndiaभारतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघSri Lankaश्रीलंकाNepalनेपाळBangladeshबांगलादेश