शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

"अखंड भारत कधीपर्यंत पाहता येईल?"; सरसंघचालक मोहन भागवतांनी दिलं रोखठोक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 09:02 IST

विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात विचारण्यात आला होता अखंड भारताबद्दलचा प्रश्न

Mohan Bhagwat, Akhand Bharat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांचे अखंड भारताबाबत मोठे वक्तव्य समोर आले आहे. देशाची परिस्थिती बदलत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतापासून वेगळे झालेल्या देशांना त्यांची चूक कळत असून त्यांना पुन्हा भारतात सामील व्हायचे आहे, असा दावा त्यांनी केला. एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना भागवत म्हणाले की, देश अखंड भारत कधी बनेल हे मी सांगू शकत नाही, पण म्हातारे होण्यापूर्वीच दिसेल. नागपूरच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.

अखंड भारत कधी निर्माण होणार?

वसतिगृहातील एका विद्यार्थ्याने भागवतांना विचारले की, भारत देशाला अखंड भारत म्हणून कधी बघता येणार आहे. त्यावर उत्तर देताना भागवत म्हणाले, 'नक्की कधीपर्यंत ते मी आता सांगू शकत नाही. त्यासाठी आपल्याला ग्रहज्योतिष पाहावे लागेल. मी प्राण्यांचा डॉक्टर आहे. पण मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही आतापासून विचार केलात तर तुम्ही म्हातारे होण्यापूर्वी तुम्हाला ते दिसेल.'

'विभक्त देशांना भारतात सामील व्हायचे आहे'

"देशातील परिस्थिती असे वळण घेत आहे. भारतापासून वेगळे झालेल्यांना आपण चूक केली असे वाटते. पुन्हा भारतात सामील व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. पण पुन्हा भारत बनणे म्हणजे नकाशावरील रेषा संपवणे, असे त्यांचे मत आहे. मी असे मानत नाही, कारण ते तसे होणार नाही. भारत असणे म्हणजे भारताचे स्वरूप स्वीकारणे. भारताचा स्वभाव मान्य नव्हता, त्यामुळे अखंड भारताचे तुकडे करण्यात आले. हा स्वभाव परत आल्यावर संपूर्ण भारत एक होईल. सर्व शेजारी देशांना त्यांच्या जीवनातून हे शिकावे लागेल. हे काम आपल्याला करायचे आहे आणि ते आपण करत आहोत. आम्ही मालदीवला पाणी पोहोचवतो, श्रीलंकेला पैसे पोहोचवतो, भूकंपात नेपाळला मदत करतो, बांगलादेशला मदत करतो. सगळ्यांना मदत करतो," असा उल्लेख त्यांनी केला.

'भारत हा दक्षिण आशियाई देशाचा एक भाग आहे'

भागवत एक किस्सा सांगताना म्हणाले की, 1992-93 मध्ये सार्कचे अध्यक्ष असताना श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष प्रेमदासा म्हणाले होते की, जगातील मोठे देश लहान देशांना गिळंकृत करतात. म्हणूनच आपण सर्वांनी सावध राहून संघटित व्हायला हवे. दक्षिण आशियातील देशांसाठी हे अवघड काम नाही. आज आपल्याला जगात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते, पण प्रत्यक्षात आपण एकाच भूमीचे, भारताचे मुख्य भाग आहोत. भारत ही माझी आई आहे, मी तिचा मुलगा आहे, असा हा भाग निर्माण झाला आहे. आपले पूर्वज एकच आहेत. ज्या मूल्यांवर आपली संस्कृती उभी आहे ती सर्वत्र सारखीच आहेत," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतIndiaभारतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघSri Lankaश्रीलंकाNepalनेपाळBangladeshबांगलादेश