शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

एफआरपीचे ३,६०७ कोटी रुपये थकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 05:10 IST

राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात उसाची एफआरपीची (रास्त व किफायतशीर दर) एकूण २२ हजार ४२ कोटी रुपये जमा करणे अपेक्षित होते.

पुणे  -  राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात उसाची एफआरपीची (रास्त व किफायतशीर दर) एकूण २२ हजार ४२ कोटी रुपये जमा करणे अपेक्षित होते. मात्र, त्यातील १८ हजार ८२१ कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे. राज्यातील शेतकºयांची एफआरपी ३ हजार ६०७ कोटी रुपये रक्कम अजूनही थकीत आहे, असे साखर आयुक्तालयाने म्हटले आहे.साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, एप्रिलअखेरीस राज्यातील साखर कारखान्यांनी ९४९ लाख टन एवढ्या उसाचे गाळप पूर्ण केले आहे. त्यावर देय असलेल्या एफआरपीच्या रक्कमेपैकी ८५ टक्के रक्कम एप्रिल अखेरीस शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे. मात्र,अद्यापही राज्यातील शेतकºयांची ३ हजार ६०७ कोटी एफआरपीची रक्कम थकित आहे. शेतकºयांना ही रक्कम तत्काळ मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. केंद्र शासनाच्या सॉफ्टलोन योजनेतून राज्यातील कारखान्यांना कर्ज मंजूर झाले आहे. कर्जाची रक्कम मिळताच थकीत एफआरपी आणखी कमी होईल.एप्रिल अखेरपर्यंत उसाच्या एफआरपीची शंभर टक्के रक्कम ४३ साखर कारखान्यांनी शेतकºयांना दिली आहे. तसेच ८० टक्क्यांहून अधिक रक्कम देणाºया कारखान्यांची संख्या ८० असून, ४२ कारखान्यांनी ६० ते ७९ टक्के एवढी रक्कम शेतकºयांना दिली आहे. त्याचप्रमाणे शून्य ते ६० टक्क्यापर्यंत एफआरपी देणाºया कारखान्यांची संख्या ३० एवढी आहे.सुमारे १५ दिवसांपूर्वी शेतकºयांना एफआरपीचे चार हजार ३२४ कोटी रुपये देणे बाकी होते. त्यातील काही कारखान्यांनी शेतकºयांच्या बँक खात्यावर ७१७ कोटी रुपये जमा केले आहेत. २०१८-१९ या उस गाळप हंगाम मध्ये प्रथमच एफआरपीचा देय आकडा चार हजार कोटी रुपयांच्या खाली आला आहे, असेही शेखर गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेbusinessव्यवसाय