शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

प्रेमाचा 'गुलाब' ५० रुपयांना अन् खायचा 'गुलाब' ५० पैशांना; जगाच्या पोशिंद्याने उभ्या पिकात शेळ्या-मेंढ्या सोडून दिल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 12:20 IST

Farmer Cabbage Rate Down: शेतकऱ्यांची मुले शहरात छोट्या मोठ्या नोकऱ्या करू लागली आहेत. भविष्यात शेतकरी दिसेल का, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे. अनेक ठिकाणी गावातील शेते ओस पडू लागली आहेत.

जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला शेतकरी म्हणून जगणे खूप कठीण झाले आहे. शेतमालाला भाव नाही, महागाई गगणाला भिडलेली. यात वेगवेगळ्या रोगांची धाड, त्यात निसर्ग कोपलेला. अशा अनेक दुष्टचक्रात हा शेतकरी अडकलेला आहे. या शेतकऱ्यांची मुले शहरात छोट्या मोठ्या नोकऱ्या करू लागली आहेत. भविष्यात शेतकरी दिसेल का, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे. अनेक ठिकाणी गावातील शेते ओस पडू लागली आहेत. आजचाच विषय घ्यायचा झाला तर पत्ताकोबीला ५० पैसे प्रतिकिलोचा दर मिळाल्याने शेतकऱ्याने उभ्या पिकात शेळ्या-मेंढ्या चरण्यासाठी सोडून दिल्या आहेत. तर दुसरीकडे व्हॅलेंटाईन आठवड्यानिमित्त गुलाबाच्या फुलाला प्रति फुल ५० रुपयांचा दर आला आहे. 

किती विदारक परिस्थिती सध्या शेतकऱ्यावर ओढविली आहे, याचे हे जिवंत उदाहरण आहे. काही लोक म्हणतात आधुनिक शेती करा, सिझननुसार उत्पादन घ्या. परंतू या शेतकऱ्यांना कोणते उत्पादन घ्यावे हे सांगायला देखील कोणी नसतो. त्याला जसे समजते, तसेच तो उत्पादन घेतो आणि फसतो. जेव्हा एखाद्या भाजीपाल्याची टंचाई होते तेव्हा त्याला दर मिळतो. यासाठी काहीसे लक आणि वेळ या शेतकऱ्याच्या बाजुने असावी लागते, तरच हे होते. 

येवला तालुक्यातील विखरणी येथील शेतकरी गोरख शेलार यांनी आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये 25 हजार रुपये खर्च करून कोबी पिकाची लागवड केली होती. भाजीपाल्याला शहरात मोठी मागणी असते. कोबीचा वापर चायनिजच्या गाड्यांवर प्लेटमधील सजावटीसाठी व खाण्यासाठी केला जातो. घरातही कोबीची भाजी केली जाते. याच कोबीला जेव्हा शेलार यांना ५० पैसे प्रति किलोचा दर आहे, हे बाजारात माल नेल्यावर समजले तेव्हा त्यांनी त्या २५ हजारांवर आणि अपेक्षा केलेल्या उत्पन्नावर पाणी सोडले. उद्विग्न होत या शेतकऱ्याने या पिकात शेळ्या मेंढ्या चरविल्या आहेत. 

तर दुसरीकडे पंढरपूरच्या शेतकऱ्याने गुलाबाची लागवड केली होती. इतर वेळी या गुलाबाला १०-१५ रुपयांचा पेंडीचा दर असतो. तो आता पन्नास रुपयांवर गेला आहे. खायचा 'फुलकोबी' ५० पैशांना आणि प्रेमाचा 'गुलाब' ५० रुपयांना ही दरी या शेतकऱ्यांच्या काळजात धस् करणारी आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी