गाझा प्रकरणी केंद्राची भूमिका दुर्दैवी
By Admin | Updated: July 21, 2014 03:25 IST2014-07-21T03:25:43+5:302014-07-21T03:25:43+5:30
गाझा पट्टीतील हिंसाचारावर सध्याच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने स्वीकारलेली भूमिका दुर्दैवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली

गाझा प्रकरणी केंद्राची भूमिका दुर्दैवी
मुंबई : गाझा पट्टीतील हिंसाचारावर सध्याच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने स्वीकारलेली भूमिका दुर्दैवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. पक्षाच्यावतीने ताज हॉटेलमध्ये आयोजित इफ्तार पार्टीत ते बोलत होते.
इस्रायल आणि पॅलेस्टाइन या दोघांशीही भारताचे मित्रत्वाचे संबंध आहेत. त्यामुळे या दोघांच्या वादात भारत सरकार फार काही करू शकत नसल्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेविरुद्ध राज्यसभेत चर्चेची मागणी लावून धरणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
यापूर्वी सरकारांनी इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षात पॅलेस्टाइनच्या बाजूने भूमिका घेतली होती. निष्पाप पॅलेस्टिनी नागरिकांवर हल्ले करणारे आणि त्यांची हत्या करणारा इस्रायलसारखा देश भारताचा मित्र असून शकत नाही, असेही पवार म्हणाले. राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांसोबत समाजवादी पक्षाचे आ. अबू आझमी, क्रिकेटपटू झहीर खान इफ्तारला उपस्थित होते. (प्रतिनिधी)