शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या २० एमएलडी पाण्यावर दरोडा

By admin | Updated: May 5, 2014 16:23 IST

शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे.

दुर्लक्ष : जलवाहिन्यांची गळती होते की पाण्याची चोरी औरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. तर दुसरीकडे जायकवाडी ते औरंगाबाद शहरापर्यंत येणार्‍या दोन जलवाहिन्यांतून सुमारे २० एमएलडी पाण्याची गळती होत आहे. ही गळती आहे की, पाण्याची चोरी हा संशोधनाचा विषय आहे; परंतु औरंगाबादकरांना पाण्यासाठी उन्हाळ्यात भटकंती करावी लागत आहे.मनपाच्या जलउपसा केंद्रापर्यंत पाण्याचा प्रवाह येण्यासाठी ॲप्रोच चॅनलचे काम गतवर्षी दुष्काळात करण्यात आले. त्यामुळे उपसा केंद्रापर्यंत पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात आहे. तेथून १४५ एमएलडी पाणी उपसले जात आहे. मात्र, शहरापर्यंत पोहोचेपर्यंत त्यातील २० एमएलडी पाणी मध्येच गळते आहे. असा होतो पाणीपुरवठाशहराला जायकवाडी आणि हर्सूल तलावातून पाणी येते. दररोज २०० द़ ल़ लिटर पाण्याची गरज असून, १२० ते १२५ द़ ल़ लिटर पाणीपुरवठा ५५ जलकुंभापर्यंत होतो. १९७२ साली ७०० मि़ मी़ आणि १९९२ साली टाकलेल्या १४०० मि़ मी़ जलवाहिनीतून शहराला पाणी येते. त्या दोन्ही जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत़ गळती आणि चोर्‍यांमध्ये २० ते ३० द़ ल़ लिटर पाणी जाते़ शहराची पाण्याची गरजप्रत्येक नागरिकाच्या ५७ लिटर पाण्याची चोरी होत आहे. धरणातून रोज १४५ एमएलडी पाणी उपसले जाते. त्यातून शहराला १२५ एमएलडी पाणी येते. २० एमएलडी पाणी चोरी किंवा गळतीमध्ये जाते. शहराची लोकसंख्या १३ लाख असून, दरडोई १३५ लिटर पाणी देणे मनपाला बंधनकारक आहे. मनपा ७८ लिटर पाणी दरडोई देते आहे. वर्षातून चार महिने पाणीपुरवठा होत असून, दरडोई १४ हजार लिटर पाणीपुरवठा मनपा करते. ३६५ दिवसांसाठी ३ हजार ५० रुपये पाणीपट्टी वसूल केली जात असून, १२० दिवस वर्षातून महिन्यातून १० दिवस पाणीपुरवठा होतो. १ लाख ५ हजार घरगुती, तर १ हजार ३०० व्यावसायिक नळ कनेक्शन आहेत. चार दिवस लागतीलजायकवाडीला अखंड वीज मिळाली, तर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी चार दिवस लागतील. वेळापत्रक महावितरणच्या शटडाऊनमुळे कोलमडले आहे. पाच मिनिटे वीजपुरवठा खंडित झाला तरी शहराचे वेळापत्रक कोलमडते. पाण्याची गळती नेहमीप्रमाणेच आहे. त्याचा वेळापत्रकावर परिणाम झालेला नाही. तसेच पाण्याची चोरीदेखील होत नसल्याचा दावा कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी केला.