शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

शहराच्या २० एमएलडी पाण्यावर दरोडा

By admin | Updated: May 5, 2014 16:23 IST

शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे.

दुर्लक्ष : जलवाहिन्यांची गळती होते की पाण्याची चोरी औरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. तर दुसरीकडे जायकवाडी ते औरंगाबाद शहरापर्यंत येणार्‍या दोन जलवाहिन्यांतून सुमारे २० एमएलडी पाण्याची गळती होत आहे. ही गळती आहे की, पाण्याची चोरी हा संशोधनाचा विषय आहे; परंतु औरंगाबादकरांना पाण्यासाठी उन्हाळ्यात भटकंती करावी लागत आहे.मनपाच्या जलउपसा केंद्रापर्यंत पाण्याचा प्रवाह येण्यासाठी ॲप्रोच चॅनलचे काम गतवर्षी दुष्काळात करण्यात आले. त्यामुळे उपसा केंद्रापर्यंत पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात आहे. तेथून १४५ एमएलडी पाणी उपसले जात आहे. मात्र, शहरापर्यंत पोहोचेपर्यंत त्यातील २० एमएलडी पाणी मध्येच गळते आहे. असा होतो पाणीपुरवठाशहराला जायकवाडी आणि हर्सूल तलावातून पाणी येते. दररोज २०० द़ ल़ लिटर पाण्याची गरज असून, १२० ते १२५ द़ ल़ लिटर पाणीपुरवठा ५५ जलकुंभापर्यंत होतो. १९७२ साली ७०० मि़ मी़ आणि १९९२ साली टाकलेल्या १४०० मि़ मी़ जलवाहिनीतून शहराला पाणी येते. त्या दोन्ही जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत़ गळती आणि चोर्‍यांमध्ये २० ते ३० द़ ल़ लिटर पाणी जाते़ शहराची पाण्याची गरजप्रत्येक नागरिकाच्या ५७ लिटर पाण्याची चोरी होत आहे. धरणातून रोज १४५ एमएलडी पाणी उपसले जाते. त्यातून शहराला १२५ एमएलडी पाणी येते. २० एमएलडी पाणी चोरी किंवा गळतीमध्ये जाते. शहराची लोकसंख्या १३ लाख असून, दरडोई १३५ लिटर पाणी देणे मनपाला बंधनकारक आहे. मनपा ७८ लिटर पाणी दरडोई देते आहे. वर्षातून चार महिने पाणीपुरवठा होत असून, दरडोई १४ हजार लिटर पाणीपुरवठा मनपा करते. ३६५ दिवसांसाठी ३ हजार ५० रुपये पाणीपट्टी वसूल केली जात असून, १२० दिवस वर्षातून महिन्यातून १० दिवस पाणीपुरवठा होतो. १ लाख ५ हजार घरगुती, तर १ हजार ३०० व्यावसायिक नळ कनेक्शन आहेत. चार दिवस लागतीलजायकवाडीला अखंड वीज मिळाली, तर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी चार दिवस लागतील. वेळापत्रक महावितरणच्या शटडाऊनमुळे कोलमडले आहे. पाच मिनिटे वीजपुरवठा खंडित झाला तरी शहराचे वेळापत्रक कोलमडते. पाण्याची गळती नेहमीप्रमाणेच आहे. त्याचा वेळापत्रकावर परिणाम झालेला नाही. तसेच पाण्याची चोरीदेखील होत नसल्याचा दावा कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी केला.