शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या २० एमएलडी पाण्यावर दरोडा

By admin | Updated: May 5, 2014 16:23 IST

शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे.

दुर्लक्ष : जलवाहिन्यांची गळती होते की पाण्याची चोरी औरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. तर दुसरीकडे जायकवाडी ते औरंगाबाद शहरापर्यंत येणार्‍या दोन जलवाहिन्यांतून सुमारे २० एमएलडी पाण्याची गळती होत आहे. ही गळती आहे की, पाण्याची चोरी हा संशोधनाचा विषय आहे; परंतु औरंगाबादकरांना पाण्यासाठी उन्हाळ्यात भटकंती करावी लागत आहे.मनपाच्या जलउपसा केंद्रापर्यंत पाण्याचा प्रवाह येण्यासाठी ॲप्रोच चॅनलचे काम गतवर्षी दुष्काळात करण्यात आले. त्यामुळे उपसा केंद्रापर्यंत पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात आहे. तेथून १४५ एमएलडी पाणी उपसले जात आहे. मात्र, शहरापर्यंत पोहोचेपर्यंत त्यातील २० एमएलडी पाणी मध्येच गळते आहे. असा होतो पाणीपुरवठाशहराला जायकवाडी आणि हर्सूल तलावातून पाणी येते. दररोज २०० द़ ल़ लिटर पाण्याची गरज असून, १२० ते १२५ द़ ल़ लिटर पाणीपुरवठा ५५ जलकुंभापर्यंत होतो. १९७२ साली ७०० मि़ मी़ आणि १९९२ साली टाकलेल्या १४०० मि़ मी़ जलवाहिनीतून शहराला पाणी येते. त्या दोन्ही जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत़ गळती आणि चोर्‍यांमध्ये २० ते ३० द़ ल़ लिटर पाणी जाते़ शहराची पाण्याची गरजप्रत्येक नागरिकाच्या ५७ लिटर पाण्याची चोरी होत आहे. धरणातून रोज १४५ एमएलडी पाणी उपसले जाते. त्यातून शहराला १२५ एमएलडी पाणी येते. २० एमएलडी पाणी चोरी किंवा गळतीमध्ये जाते. शहराची लोकसंख्या १३ लाख असून, दरडोई १३५ लिटर पाणी देणे मनपाला बंधनकारक आहे. मनपा ७८ लिटर पाणी दरडोई देते आहे. वर्षातून चार महिने पाणीपुरवठा होत असून, दरडोई १४ हजार लिटर पाणीपुरवठा मनपा करते. ३६५ दिवसांसाठी ३ हजार ५० रुपये पाणीपट्टी वसूल केली जात असून, १२० दिवस वर्षातून महिन्यातून १० दिवस पाणीपुरवठा होतो. १ लाख ५ हजार घरगुती, तर १ हजार ३०० व्यावसायिक नळ कनेक्शन आहेत. चार दिवस लागतीलजायकवाडीला अखंड वीज मिळाली, तर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी चार दिवस लागतील. वेळापत्रक महावितरणच्या शटडाऊनमुळे कोलमडले आहे. पाच मिनिटे वीजपुरवठा खंडित झाला तरी शहराचे वेळापत्रक कोलमडते. पाण्याची गळती नेहमीप्रमाणेच आहे. त्याचा वेळापत्रकावर परिणाम झालेला नाही. तसेच पाण्याची चोरीदेखील होत नसल्याचा दावा कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी केला.