शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

दंगली घडवण्याचे प्रयोग; नवहिंदू ओवेसींच्या खांद्यावर भाजपची बंदूक - संजय राऊत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 07:57 IST

राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर राज्यात तणाव निर्माण करण्याचा आरोप केला. तसेच नवहिंदू ओवेसींच्या माध्यमातून भाजप हे काम करवून घेत असल्याचा आरोप केला. मात्र, राऊत यांनी थेट नाव घेण्याचे टाळले.

मुंबई : उत्तर प्रदेशातील निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने एमआयएमच्या ओवेसींचा वापर केला. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात हिंदू समाजात काही ओवेसी निर्माण करण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रात फूट पाडण्याचे, दंगली घडविण्याचे आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयोग सुरू असल्याचा आरोप शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी केला आहे.राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर राज्यात तणाव निर्माण करण्याचा आरोप केला. तसेच नवहिंदू ओवेसींच्या माध्यमातून भाजप हे काम करवून घेत असल्याचा आरोप केला. मात्र, राऊत यांनी थेट नाव घेण्याचे टाळले. हे मी कोणाचे व्यक्तिगत नाव घेऊन बोलत नाही. महाराष्ट्रातील ओवेसींच्या माध्यमातून प्रयत्न आहेत; परंतु महाराष्ट्राची जनता अत्यंत सावध आहे, जागरूक आहे, संयमी आहे आणि ज्ञानी आहे, एवढेच मी सांगेन. देशभरातील दंगलीचा व्यापक कट आहे आणि जे दिल्लीत घडले ते महाराष्ट्रात घडवण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे; परंतु यशस्वी होणार नाहीत, असेही राऊत म्हणाले.योग्य वेळी बोलेन - राज ठाकरेसंजय राऊत व अन्य नेत्यांनी केलेल्या आरोपाबाबत पुण्यात मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले, त्यावर मी बोलणार नाही. ते काही बोलले की आम्ही बोलणार, ते पुन्हा बोलणार. मी योग्य वेळी बोलेन.

‘ही राजकीय नाही तर श्रद्धेची यात्रा’राऊत यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरही भाष्य केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिवसेना राम मंदिराच्या लढ्यात प्रत्यक्ष सहभागी होती. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख तिकडची परिस्थिती पाहून ठरवली जाईल. मात्र, ही काही राजकीय यात्रा नाही, श्रद्धेची यात्रा आहे, असे संजय राऊत म्हणाले.   

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे