शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

"धिस ईज अ राईट टाईम!" प्रकाश आंबेडकरांचे धनंजय मुंडे प्रकरणावर मोठं विधान 

By दीपक अविनाश कुलकर्णी | Updated: January 14, 2021 19:04 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः धनंजय मुंडे यांच्यासंबंधी प्रतिक्रिया देताना हा गंभीर स्वरूपाचा आरोप असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.

पुणे : ठाकरे सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर पार्श्वगायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराचे आरोप केले आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अगदी ढवळून निघाले आहे. या प्रकरणामुळे मुंडे यांची आमदारकी व मंत्रीपद देखील धोक्यात आली आहे. भाजपने सुद्धा त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता या प्रकरणामध्ये वंचित बहुजन विकास आघाडीचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा संदर्भ देत धनंजय मुंडे यांच्याबाबत मोठं विधान केले आहे. 

पुण्यात प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. आंबेडकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी केलेल्या बलात्कारसंबंधी आरोपावर प्रतिक्रिया देताना हा गंभीर स्वरूपाचा आरोप असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे आता यावर मुंडे यांनी हे प्रकरण गांभीर्यानं घ्यायचे आहे की नाही ते ठरवायला हवे. मात्र आज ना उद्या केलेला गुन्हा हा बाहेर येतच असतो. त्याच अनुषंगाने आता मुंडे यांनीच 'धिस ईज अ राईट टाईम' म्हणावे असे महत्वपूर्ण विधान केले आहे. 

केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात मुस्लिम बांधव वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली येत्या २७ जानेवारीला महाराष्ट्रभर आंदोलन करणार करणार आहे. तसेच गेल्या दीड महिन्यांपासून दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. न्यायालयाने कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकारला फटकारताना चार जणांची समिती स्थापन केली आहे. पण याचवेळी आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांनी या समितीला विरोध केला आहे. 

सत्ता टिकवायची का नाही हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावा...  औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्यावरून राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना व काँग्रेस हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहे. याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याचे देखील समोर आले आहे. त्यानंतर काहीच दिवसात मुख्यमंत्र्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून औरंगाबादचा संभाजीनगर व उस्मानाबादच्या पुढे धाराशिव असा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे नामांतराचा वाद आणखी उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण त्याचसंबंधी आपली भूमिका जाहीर करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सत्ता टिकवायची की नाही याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे.  

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरDhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारRapeबलात्कारPoliticsराजकारण