शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

"धिस ईज अ राईट टाईम!" प्रकाश आंबेडकरांचे धनंजय मुंडे प्रकरणावर मोठं विधान 

By दीपक अविनाश कुलकर्णी | Updated: January 14, 2021 19:04 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः धनंजय मुंडे यांच्यासंबंधी प्रतिक्रिया देताना हा गंभीर स्वरूपाचा आरोप असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.

पुणे : ठाकरे सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर पार्श्वगायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराचे आरोप केले आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अगदी ढवळून निघाले आहे. या प्रकरणामुळे मुंडे यांची आमदारकी व मंत्रीपद देखील धोक्यात आली आहे. भाजपने सुद्धा त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता या प्रकरणामध्ये वंचित बहुजन विकास आघाडीचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा संदर्भ देत धनंजय मुंडे यांच्याबाबत मोठं विधान केले आहे. 

पुण्यात प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. आंबेडकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी केलेल्या बलात्कारसंबंधी आरोपावर प्रतिक्रिया देताना हा गंभीर स्वरूपाचा आरोप असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे आता यावर मुंडे यांनी हे प्रकरण गांभीर्यानं घ्यायचे आहे की नाही ते ठरवायला हवे. मात्र आज ना उद्या केलेला गुन्हा हा बाहेर येतच असतो. त्याच अनुषंगाने आता मुंडे यांनीच 'धिस ईज अ राईट टाईम' म्हणावे असे महत्वपूर्ण विधान केले आहे. 

केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात मुस्लिम बांधव वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली येत्या २७ जानेवारीला महाराष्ट्रभर आंदोलन करणार करणार आहे. तसेच गेल्या दीड महिन्यांपासून दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. न्यायालयाने कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकारला फटकारताना चार जणांची समिती स्थापन केली आहे. पण याचवेळी आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांनी या समितीला विरोध केला आहे. 

सत्ता टिकवायची का नाही हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावा...  औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्यावरून राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना व काँग्रेस हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहे. याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याचे देखील समोर आले आहे. त्यानंतर काहीच दिवसात मुख्यमंत्र्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून औरंगाबादचा संभाजीनगर व उस्मानाबादच्या पुढे धाराशिव असा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे नामांतराचा वाद आणखी उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण त्याचसंबंधी आपली भूमिका जाहीर करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सत्ता टिकवायची की नाही याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे.  

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरDhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारRapeबलात्कारPoliticsराजकारण