शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

मुख्यमंत्री घरी बसलेत, अन् मी फिरतोय; शरद पवारांनी सांगितले यामागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 05:34 IST

राज्याचे मुख्यमंत्री सकाळपासून संध्याकाळपर्यंत अक्षरश: या एका कामातच अखंडपणाने बसलेले आहेत. सबंध महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : खासगी डॉक्टरांना सहकार्य करावेच लागेल. शासकीय यंत्रणेने त्यांच्या सेवेची मागणी केली तर त्यांना सेवा द्यावीच लागेल. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार महामारीत वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना समन्स देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे; परंतु अद्याप तशी वेळ आलेली नाही, असे इशारेवजा स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शनिवारी येथे दिले.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा वाढलेला मृत्यूदर, प्रशासनाच्या उपाययोजना जाणून घेण्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावलेल्या बैठकीला पवार यांची विशेष उपस्थिती होती. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, भविष्यातील दृष्टीने पालकमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी आढावा घेऊन खासगी वैद्यकीय सेवेबाबत तरतूद केलेली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ज्या यंत्रणेची आवश्यकता आहे, ती यंत्रणा सरकारला ताब्यात घेता येते. उद्या मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन औरंगाबादेत काय कमी आहे, ते सांगणार आहे....म्हणून मी फिल्डवरपवार म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री सकाळपासून संध्याकाळपर्यंत अक्षरश: या एका कामातच अखंडपणाने बसलेले आहेत. सबंध महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट आहे.त्यामुळे मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्यात जाऊन बसले तर बाकीच्या जिल्ह्यांच्या समस्यांवर तातडीने निर्णय घेता येणे अवघड होईल. आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव कॅप्टन (मुख्यमंत्री ठाकरे) एका ठिकाणी बसून सर्व टीम काम करते आहे की नाही, यावर नियंत्रण ठेवत आहेत. मला करमत नाही.एका जागी बसवत नाही. मी सतत लोकांत राहणारा माणूस आहे, म्हणून मी फिल्डवर जातो, अशी मिश्कील टीपण्णीही पवार यांनी केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्या