शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

तृतीयपंथींनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 06:59 IST

भक्ताकडून पैसे मागितले आणि त्या भक्तावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप संबंधित तृतीयपंथीवर आहे. 

मुंबई : एका तृतीयपंथीच्या वर्तनाबाबत पंढरपूरच्या सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केलेली टिप्पणी अनावश्यक आहे. त्यांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, असे निरीक्षण नोंदवित मुंबई उच्च न्यायालयाने विठ्ठल-रुक्मीणी मंदिरात भक्तावर हल्ला करणाऱ्या व सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप असलेल्या तृतीयपंथीची जामिनावर सुटका केली. 

सत्र न्यायालयाचे न्या. एम. बी. लांबे यांनी तृतीयपंथीचा जामीन रद्द करताना केलेल्या टिप्पणीवर नाराजी दर्शवित न्या. माधव जामदार यांच्या एकलपीठाने म्हटले की, तृतीयपंथीही या देशाचे नागरिक आहेत. त्यांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मीणी मंदिरात एका भक्ताचा छळ व शिवीगाळ केल्याचा आरोप असलेल्या तृतीयपंथीच्या जामीन अर्जावर न्या. जामदार यांच्या एकलपीठापुढे सुनावणी सुरू होती. भक्ताकडून पैसे मागितले आणि त्या भक्तावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप संबंधित तृतीयपंथीवर आहे. 

‘रूढीवादी टिप्पणी करणे अनावश्यक’४ डिसेंबर २०२३ रोजी अर्जदाराला अटक करण्यात आली. दोनच दिवसांनी अर्जदाराने उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली. कारण, न्या. लांबे यांनी यादरम्यान त्याचा जामीन अर्ज फेटाळला. सत्र न्यायालयाने नोंदविलेल्या निरीक्षणांवर अर्जदाराने उच्च न्यायालयात आक्षेप घेतला.तृतीयपंथींबाबत अशी रूढीवादी टिप्पणी करणे अनावश्यक आहे. ते या देशाचे नागरिक आहेत. राज्यघटनेचे अनुच्छेद २१ सर्व नागरिकांच्या जगण्याच्या हक्काचे आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण करते. जगण्याच्या अधिकारामध्ये सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचाही समावेश आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाच्या आदेशात नोंदविण्यात आलेली निरीक्षणे आवश्यक नव्हती, असे न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट