शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

परतीच्या पावसाने सोयाबीनला, कपाशीला आले कोंब; शेकडो शेतकरी चिंताग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 23:43 IST

चंद्रपुरात सोयाबीन ढीग पाण्यात, यवतमाळ जिल्ह्यात कपाशी आडवी,

चंद्रपूर/ यवतमाळ : कपाशी, सोयाबीन ही पिके हाताशी आलेली असतानाच यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठा फटका दिला आहे. ऐन दिवाळीच्या दिवसात पीक घरात येण्याच्या स्थितीत असतानाच पावसाने पिकांची धूळधाण उडविली आहे. गेल्या दोन दिवसात यवतमाळ जिल्ह्यात ६६ मिलिमीटर पाऊस बरसला आहे.

परतीच्या पावसाने खरिपातील सोयाबीन, कापूस, धान पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. सोयाबीन व कापूस पिकाला चक्क कोंब आले. त्यामुळे खर्च निघणार की नाही, या प्रश्नाने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जवळपास ५० टक्के नुकसान झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

दोन दिवस सतत पाऊस बरसत असल्याने सोयाबीनच्या गंज्या भिजल्या. या सोयाबीनला आता कोंब फुटत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचवेळी यंदा ढगाळी वातावरणाने कपाशीलाही उशिरा बोंडे फुटली. त्यामुळे दसºया झाल्यावरही अनेकपरतीच्या पावसाने सोयाबीनला, कपाशीला आले कोंब शेतकऱ्यांना सीतादही करता आली नव्हती. आता दिवाळीच्या तोंडावर कापूस वेचणीच्या अवस्थेत असताना धुंवाधार पावसाने पºहाटीची झाडेच आडवी केली आहेत. तर फुटलेला कापूस ओलाचिंब झाल्याने तो वेचणेही अवघड झाले आहे. शिवाय, कापूस काळवंडल्याने पुढे भावही मिळण्याची शक्यता संपली आहे. त्याचप्रमाणे भाजीपाला पिकालाही मोठा फटका बसला आहे.यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांच्या पिकांचे नुकसान कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे.

सध्या सोयाबीन कापणीला आले आहे. काही शेतकºयांनी कापणी करून ढीग तयार केला आहे. परंतु परतीच्या पावसामुळे सोयाबीन ओले झाले असून सोयाबीन शेगांना कोंब आले तर कपाशीची स्थितीही वाईट आहे. लवकर हाती येणारे पीक म्हणून यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली आहे. बहुतांश शेतकºयांनी सोयाबीन कापणी केली आहे. परंतु परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राजुरा तालुक्यात गोवरी, सास्ती, माथरा, चिंचोली, गोयेगाव, अंतरगाव, पोवनी, साखरी, वरोडा, मानोली, बाबापूर, कढोली परिसरातील खरिपातील सोयाबीन, कापूस, धानपिके मातीमोल झाले आहे. मात्र प्रशासनाने याकडे अजूनही लक्ष दिले नाही.

दिवाळीच्या आनंदावर विरजण : शहरात दिवाळीनिमित्त रोषणाईने आसमंत उजळून निघत असताना ग्रामीण भागात परतीच्या पावसाने शेतकºयांचे प्रचंड नुकसान केले. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, पीक वाया गेले. त्यामुळे सोयाबीन विकून दिवाळी साजरी करण्याच्या आनंदावर यंदा विरजण पडले आहे.माझ्या शेतात चार एकरातील सोयाबीनची कापणी करून ठेवली. परंतु अचानक आलेल्या पावसाने सोयाबीन पीक खराब झाले. शेंगांना कोंब फुटले. खर्च निघेल की नाही, याची चिंता आहे. शासनाने तातडीने सर्वेक्षण करून भरपाई द्यावी. -चेतन बोभाटे, युवा शेतकरी, गोवरी, जि. चंद्रपूरसततच्या पावसामुळे काढलेल्या सोयाबीनला कोंब फुटले, ज्वारी काळी पडली, भारी जमिनीतील कपाशीचे नुकसान होण्याची शक्यता आहे; परंतु तूर व रब्बी पिकांना हा पाऊस पोषक ठरणार आहे. डॉ. विलासराव भाले, कुलगुरू , डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.परतीच्या पावसाने सोयाबीनला, कपाशीला आले कोंब शेतकºयांना सीतादही करता आली नव्हती. आता दिवाळीच्या तोंडावर कापूस वेचणीच्या अवस्थेत असताना धुंवाधार पावसाने पºहाटीची झाडेच आडवी केली आहेत. तर फुटलेला कापूस ओलाचिंब झाल्याने तो वेचणेही अवघड झाले आहे. शिवाय, कापूस काळवंडल्याने पुढे भावही मिळण्याची शक्यता संपली आहे. त्याचप्रमाणे भाजीपाला पिकालाही मोठा फटका बसला आहे.यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांच्या पिकांचे नुकसान कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. 

टॅग्स :Rainपाऊस