शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

परतीच्या पावसाने सोयाबीनला, कपाशीला आले कोंब; शेकडो शेतकरी चिंताग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 23:43 IST

चंद्रपुरात सोयाबीन ढीग पाण्यात, यवतमाळ जिल्ह्यात कपाशी आडवी,

चंद्रपूर/ यवतमाळ : कपाशी, सोयाबीन ही पिके हाताशी आलेली असतानाच यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठा फटका दिला आहे. ऐन दिवाळीच्या दिवसात पीक घरात येण्याच्या स्थितीत असतानाच पावसाने पिकांची धूळधाण उडविली आहे. गेल्या दोन दिवसात यवतमाळ जिल्ह्यात ६६ मिलिमीटर पाऊस बरसला आहे.

परतीच्या पावसाने खरिपातील सोयाबीन, कापूस, धान पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. सोयाबीन व कापूस पिकाला चक्क कोंब आले. त्यामुळे खर्च निघणार की नाही, या प्रश्नाने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जवळपास ५० टक्के नुकसान झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

दोन दिवस सतत पाऊस बरसत असल्याने सोयाबीनच्या गंज्या भिजल्या. या सोयाबीनला आता कोंब फुटत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचवेळी यंदा ढगाळी वातावरणाने कपाशीलाही उशिरा बोंडे फुटली. त्यामुळे दसºया झाल्यावरही अनेकपरतीच्या पावसाने सोयाबीनला, कपाशीला आले कोंब शेतकऱ्यांना सीतादही करता आली नव्हती. आता दिवाळीच्या तोंडावर कापूस वेचणीच्या अवस्थेत असताना धुंवाधार पावसाने पºहाटीची झाडेच आडवी केली आहेत. तर फुटलेला कापूस ओलाचिंब झाल्याने तो वेचणेही अवघड झाले आहे. शिवाय, कापूस काळवंडल्याने पुढे भावही मिळण्याची शक्यता संपली आहे. त्याचप्रमाणे भाजीपाला पिकालाही मोठा फटका बसला आहे.यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांच्या पिकांचे नुकसान कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे.

सध्या सोयाबीन कापणीला आले आहे. काही शेतकºयांनी कापणी करून ढीग तयार केला आहे. परंतु परतीच्या पावसामुळे सोयाबीन ओले झाले असून सोयाबीन शेगांना कोंब आले तर कपाशीची स्थितीही वाईट आहे. लवकर हाती येणारे पीक म्हणून यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली आहे. बहुतांश शेतकºयांनी सोयाबीन कापणी केली आहे. परंतु परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राजुरा तालुक्यात गोवरी, सास्ती, माथरा, चिंचोली, गोयेगाव, अंतरगाव, पोवनी, साखरी, वरोडा, मानोली, बाबापूर, कढोली परिसरातील खरिपातील सोयाबीन, कापूस, धानपिके मातीमोल झाले आहे. मात्र प्रशासनाने याकडे अजूनही लक्ष दिले नाही.

दिवाळीच्या आनंदावर विरजण : शहरात दिवाळीनिमित्त रोषणाईने आसमंत उजळून निघत असताना ग्रामीण भागात परतीच्या पावसाने शेतकºयांचे प्रचंड नुकसान केले. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, पीक वाया गेले. त्यामुळे सोयाबीन विकून दिवाळी साजरी करण्याच्या आनंदावर यंदा विरजण पडले आहे.माझ्या शेतात चार एकरातील सोयाबीनची कापणी करून ठेवली. परंतु अचानक आलेल्या पावसाने सोयाबीन पीक खराब झाले. शेंगांना कोंब फुटले. खर्च निघेल की नाही, याची चिंता आहे. शासनाने तातडीने सर्वेक्षण करून भरपाई द्यावी. -चेतन बोभाटे, युवा शेतकरी, गोवरी, जि. चंद्रपूरसततच्या पावसामुळे काढलेल्या सोयाबीनला कोंब फुटले, ज्वारी काळी पडली, भारी जमिनीतील कपाशीचे नुकसान होण्याची शक्यता आहे; परंतु तूर व रब्बी पिकांना हा पाऊस पोषक ठरणार आहे. डॉ. विलासराव भाले, कुलगुरू , डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.परतीच्या पावसाने सोयाबीनला, कपाशीला आले कोंब शेतकºयांना सीतादही करता आली नव्हती. आता दिवाळीच्या तोंडावर कापूस वेचणीच्या अवस्थेत असताना धुंवाधार पावसाने पºहाटीची झाडेच आडवी केली आहेत. तर फुटलेला कापूस ओलाचिंब झाल्याने तो वेचणेही अवघड झाले आहे. शिवाय, कापूस काळवंडल्याने पुढे भावही मिळण्याची शक्यता संपली आहे. त्याचप्रमाणे भाजीपाला पिकालाही मोठा फटका बसला आहे.यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांच्या पिकांचे नुकसान कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. 

टॅग्स :Rainपाऊस