शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

परतीच्या पावसाचा प्रवास आता ऑक्टोबरमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 03:43 IST

मान्सूनबाबत स्कायमेटचा अंदाज : हवामानातील बदलामुळे पावसाचा कालावधी लांबला

मुंबई : मान्सूनचा या वर्षीचा परतीचा प्रवास लांबणार आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होईल. मान्सूनच्या परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राजस्थानातून सुरू होतो. पश्चिम राजस्थानातून मान्सून पहिल्यांदा परतीच्या प्रवासाला निघतो. मात्र या वेळी हवामानातील बदलामुळे परतीचा प्रवास लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे.प्रत्यक्षात मान्सून केरळमध्ये १ जून रोजी दाखल होतो. केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने देशही विलंबाने व्यापला होता. आता परतीच्या प्रवासालाही मान्सून विलंबाने सुरुवात करणार आहे. गेल्या १० वर्षांत मान्सून सर्वाधिक विलंबाने म्हणजे २९ सप्टेंबर रोजी परतीला निघाला होता तर मान्सूनने परतीचा प्रवास सर्वाधिक लवकर म्हणजे ४ सप्टेंबर रोजी सुरू केला होता. आणि आता म्हणजे २०१९ साली मान्सून आणखी एक नवा रेकॉर्ड नोंदविण्याच्या मार्गावर आहे.हवामानातील बदलामुळे पुढील काही दिवसांत मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरयाणा, दिल्लीसह अनेक राज्यांत पाऊस पडेल. झारखंड, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथेही पाऊस पडेल, असा अंदाज आहे.परतीच्या पावसाला का होतोय उशीर?देशाच्या दोन्ही समुद्रकिनारी मान्सूनचा जोर आहे. दक्षिण पूर्वेकडील वारे उत्तर पश्चिम दिशेने वाहत आहेत. यातच अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आणि हिक्का नावाचे चक्रिवादळ उठले. हे सुरू असतानाच बंगालच्या खाडीतही हवामानात बदल होत राहिले. परिणामी, मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला उशीर होत आहे.असा झाला प्रवासदेशभरात जून महिन्यात मान्सूनचे प्रमाण ३३ टक्के कमी होते.जुलै महिन्यात ५ टक्के वाढ झाली. आॅगस्टमध्ये सर्वसाधारण मान्सूनच्या तुलनेत मान्सूनमध्ये १५ टक्के वाढ झाली. जुलै आणि आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक मान्सूनची नोंद झाली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातसह महाराष्ट्रात पूरस्थिती नोंदविण्यात आली.बिहारमध्येही उत्तम पाऊस नोंदविण्यात आला.सप्टेंबर महिन्यात ३२ टक्के अधिक पाऊस नोंदविण्यात आला.

 

टॅग्स :Rainपाऊस