शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

पीएसआय पदाच्या प्रलंबित परीक्षेचा निकाल फेब्रुवारी अखेरीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 20:17 IST

राज्य लोकसेवा आयोगातर्फे 26 एप्रिल 2017 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी महिना अखेरीस जाहीर केला जाईल.

ठळक मुद्देतब्बल दोन वर्षांचा कालावधी होत आला तरीही अद्याप परीक्षेचा निकाल नाही जाहीर सध्या आयोगाचा कारभार प्रभारी अध्यक्षांकडे असून आयोगाच्या सदस्यांची संख्या कमी

पुणे: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय-2017 ) पदाच्या परीक्षेचा प्रलंबित निकाल येत्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिध्द केला जाणार आहे. या परीक्षेत पात्र ठरलेल्या काही विद्यार्थ्यांची मैदानी परीक्षा घेण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही .त्यामुळे निकाल जाहीर करण्यास विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे.राज्य लोकसेवा आयोगातर्फे 26 एप्रिल 2017 रोजी पीएसआय पदाच्या 650,विक्रीकर निरिक्षक पदाच्या 251 आणि सहायक कक्ष अधिकारी पदाच्या 107 पदाची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. मात्र,तब्बल दोन वर्षांचा कालावधी होत आला तरीही अद्याप पीएसआय पदाच्या परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तसेच 2017 च्या परीक्षेचा निकाल जाहीर न झाल्यामुळे 2017,2018 आणि 2019 मध्ये प्रसिध्द झालेल्या राज्यसेवा आयोगाच्या विविध परीक्षेसाठी हेच विद्यार्थी पुन्हा परीक्षेस प्रविष्ट होत आहेत. वेळेवर निकाल प्रसिद्ध झाल्यास काही विद्यार्थ्यांची निवड आयोगाकडून संबंधित पदांसाठी केली जाईल. त्यातून परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल. परिणामी स्पर्धा परीक्षेकडे वळलेल्या नव्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास आणि यश मिळविण्यास अधिक संधी प्राप्त होईल. त्यामुळे आयोगाने लवकरात लवकर पीएसआयसह सर्व परीक्षांचा निकाल लवकर प्रसिध्द करावा,अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.पोलीस उपनिरीक्षक पदाची पूर्व परीक्षा 16 जुलै 2017 रोजी घेण्यात आली.या परीक्षेचा निकाल 3 ऑक्टोबर रोजी जाहीर झाल्यानंतर मुख्य परीक्षा 5 नोव्हेंबर रोजी झाली. मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 3 ऑक्टोबर ते 29 डिसेंबर 2018 या कालावधीत मैदानी चाचणी घेण्यात आली.सध्या आयोगाचा कारभार प्रभारी अध्यक्षांकडे असून आयोगाच्या सदस्यांची संख्या कमी आहे.त्यामुळे पीएसआय पदाच्या मैदानी चाचणी घेण्यास विलंब होत आहे.त्यामुळे शासनाने आयोगाच्या सदस्यांच्या संख्येत वाढ करून कामास गती द्यावी,अशी मागणीही विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.--------------राज्य लोकसेवा आयोगातर्फे 26 एप्रिल 2017 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी महिना अखेरीस जाहीर केला जाईल.या परीक्षेत पात्र ठरलेल्या काही विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी घेण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.सर्व विद्यार्थ्यांची मैदानी चाचणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निकाल प्रसिध्द होईल.- चंद्रशेखर ओक ,प्रभारी अध्यक्ष,एमपीएससी 

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षा