शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

अडीच टक्क्यांनी निकाल घटला

By admin | Updated: June 7, 2016 07:32 IST

उस्मानाबाद : उस्मानाबाद : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेत उस्मानाबाद जिल्ह्याचा निकाल

उस्मानाबाद : उस्मानाबाद : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेत उस्मानाबाद जिल्ह्याचा निकाल ८५़६२ टक्के लागला आहे़ मागील वर्षी जिल्ह्याचा निकाल ८८़४७ टक्के लागला होता़ हा निकाल पाहता मागच्या वर्षीपेक्षा यंदा २़६० टक्क्यांनी जिल्ह्याचा निकाल घटला आहे़ दरम्यान, मुलींनी यंदाही बाजी मारली असून, मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८८़३८ टक्के आहे़राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परिक्षेसाठी जिल्ह्यातील २३ हजार २८१ विद्यार्थ्यांनी दहावीच्या अर्ज दाखल केला होता़ यातील २३ हजार १८५ विद्यार्थ्यांनी मार्चमध्ये परिक्षा दिली़ यात १२ हजार ४६९ मुले तर १० हजार ६५६ मुलांचा समावेश होता़ यातील १९ हजार ७९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल ८५़६२ टक्के लागला आहे़ यात १० हजार ३८१ मुले व ९ हजार ४१८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत़ मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ही ८८़३८ टक्के तर मुलांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ८३़२५ टक्के आहे़ जिल्ह्यात सर्वाधिक निकाल ९२़३४ टक्के भूम तालुक्याचा लागला आहे़ उस्मानाबाद तालुक्याचा ८५़३७ टक्के, कळंब- ७९़७१ टक्के, लोहारा ८६़३१ टक्के, उमरगा ८६़४७ टक्के, परंडा ९०़३७ टक्के, तुळजापूर ८४़३५ टक्के तर वाशी तालुक्याचा निकाल हा ८१़२१ टक्के लागला आहे़ तालुकानिहाय निकालांमध्येही सर्व तालुक्यात मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे़ शहरातील नेट कॅफे, शाळा- महाविद्यालयासह शासकीय कार्यालयांमध्येही आपाली पाल्ये, नातेवाईकांच्या पाल्यांचा निकाल पाहण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले़ निकाल लागल्यानंतर उत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींनी मोठा जल्लोष केला़रिपीटरचाही टक्का घसरलामागील वर्षी रिपिटर विद्यार्थ्यांचा निकाल ५३़०३ टक्के लागला होता़ यंदा मात्र, रिपिटरचा निकाल ४१़०५ टक्के लागला आहे़ रेग्युलर प्रमाणेच रिपीटर परिक्षार्थींचाही निकाल यंदा घसरला आहे़ यात उस्मानाबाद तालुक्याचा २८़८६ टक्के, भूम तालुक्याचा १५ टक्के, कळंब २८ टक्के, लोहारा ७३़२ टक्के, उमरगा ३४़६७ टक्के, परंडा ५० टक्के, तुळजापूर ४८़१३ टक्के, वाशी तालुक्याचा २८़५७ टक्के निकाल लागला आहे़विभागात जिल्हा दुसऱ्या क्रमांकावरलातूर विभागाचा ८१़५४ टक्के निकाल लागला आहे़ लातूरने नेहमीप्रमाणे विभागात आघाडी मारली असून, लातूरचा निकाल ८६़५४ टक्के लागला आहे़ त्या पाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्याचा ८५़६२ टक्के निकाल लागला आहे़ तर नांदेड जिल्ह्याचा ७४़४८ टक्के निकाल लागला आहे़ विशेष प्राविण्यासह ५४५१ विद्यार्थी उत्तीर्णजिल्ह्यातील १९ हजार ७९९ विद्यार्थी दहावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत़ यात ५ हजार ४५१ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत़ तर प्रथम श्रेणीत ७ हजार ६१८, द्वितीय श्रेणीत ५ हजार ५३८, तर पास श्रेणीत १ हजार १९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़पाचव्या वर्षीही भूम आघाडीवरमागील चार वर्षापासून भूम तालुक्याने जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकाविला आहे़ सन २०११-१२ या शैक्षणिक वर्षात भूम तालुक्याचा ७६़०८ टक्के, शैक्षणिक वर्ष २०१२-१३ मध्ये ८४़३५ टक्के, शैक्षणिक वर्ष २०१३-१४ मध्ये ९१़११ टक्के निकाल लागला होता़ तर शैक्षणिक वर्ष २०१४-१५ मध्ये ९४़६७ टक्के निकाल लागला होता़ तर शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मध्ये ९२़३४ टक्के निकाल लागला आहे़ भूम तालुक्याने सलग पाचव्या वर्षी जिल्ह्यात सर्वाधिक निकालाची परंपरा कायम राखली आहे़