शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अडीच टक्क्यांनी निकाल घटला

By admin | Updated: June 7, 2016 07:32 IST

उस्मानाबाद : उस्मानाबाद : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेत उस्मानाबाद जिल्ह्याचा निकाल

उस्मानाबाद : उस्मानाबाद : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेत उस्मानाबाद जिल्ह्याचा निकाल ८५़६२ टक्के लागला आहे़ मागील वर्षी जिल्ह्याचा निकाल ८८़४७ टक्के लागला होता़ हा निकाल पाहता मागच्या वर्षीपेक्षा यंदा २़६० टक्क्यांनी जिल्ह्याचा निकाल घटला आहे़ दरम्यान, मुलींनी यंदाही बाजी मारली असून, मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८८़३८ टक्के आहे़राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परिक्षेसाठी जिल्ह्यातील २३ हजार २८१ विद्यार्थ्यांनी दहावीच्या अर्ज दाखल केला होता़ यातील २३ हजार १८५ विद्यार्थ्यांनी मार्चमध्ये परिक्षा दिली़ यात १२ हजार ४६९ मुले तर १० हजार ६५६ मुलांचा समावेश होता़ यातील १९ हजार ७९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल ८५़६२ टक्के लागला आहे़ यात १० हजार ३८१ मुले व ९ हजार ४१८ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत़ मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ही ८८़३८ टक्के तर मुलांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ८३़२५ टक्के आहे़ जिल्ह्यात सर्वाधिक निकाल ९२़३४ टक्के भूम तालुक्याचा लागला आहे़ उस्मानाबाद तालुक्याचा ८५़३७ टक्के, कळंब- ७९़७१ टक्के, लोहारा ८६़३१ टक्के, उमरगा ८६़४७ टक्के, परंडा ९०़३७ टक्के, तुळजापूर ८४़३५ टक्के तर वाशी तालुक्याचा निकाल हा ८१़२१ टक्के लागला आहे़ तालुकानिहाय निकालांमध्येही सर्व तालुक्यात मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे़ शहरातील नेट कॅफे, शाळा- महाविद्यालयासह शासकीय कार्यालयांमध्येही आपाली पाल्ये, नातेवाईकांच्या पाल्यांचा निकाल पाहण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले़ निकाल लागल्यानंतर उत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींनी मोठा जल्लोष केला़रिपीटरचाही टक्का घसरलामागील वर्षी रिपिटर विद्यार्थ्यांचा निकाल ५३़०३ टक्के लागला होता़ यंदा मात्र, रिपिटरचा निकाल ४१़०५ टक्के लागला आहे़ रेग्युलर प्रमाणेच रिपीटर परिक्षार्थींचाही निकाल यंदा घसरला आहे़ यात उस्मानाबाद तालुक्याचा २८़८६ टक्के, भूम तालुक्याचा १५ टक्के, कळंब २८ टक्के, लोहारा ७३़२ टक्के, उमरगा ३४़६७ टक्के, परंडा ५० टक्के, तुळजापूर ४८़१३ टक्के, वाशी तालुक्याचा २८़५७ टक्के निकाल लागला आहे़विभागात जिल्हा दुसऱ्या क्रमांकावरलातूर विभागाचा ८१़५४ टक्के निकाल लागला आहे़ लातूरने नेहमीप्रमाणे विभागात आघाडी मारली असून, लातूरचा निकाल ८६़५४ टक्के लागला आहे़ त्या पाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्याचा ८५़६२ टक्के निकाल लागला आहे़ तर नांदेड जिल्ह्याचा ७४़४८ टक्के निकाल लागला आहे़ विशेष प्राविण्यासह ५४५१ विद्यार्थी उत्तीर्णजिल्ह्यातील १९ हजार ७९९ विद्यार्थी दहावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत़ यात ५ हजार ४५१ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत़ तर प्रथम श्रेणीत ७ हजार ६१८, द्वितीय श्रेणीत ५ हजार ५३८, तर पास श्रेणीत १ हजार १९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़पाचव्या वर्षीही भूम आघाडीवरमागील चार वर्षापासून भूम तालुक्याने जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकाविला आहे़ सन २०११-१२ या शैक्षणिक वर्षात भूम तालुक्याचा ७६़०८ टक्के, शैक्षणिक वर्ष २०१२-१३ मध्ये ८४़३५ टक्के, शैक्षणिक वर्ष २०१३-१४ मध्ये ९१़११ टक्के निकाल लागला होता़ तर शैक्षणिक वर्ष २०१४-१५ मध्ये ९४़६७ टक्के निकाल लागला होता़ तर शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मध्ये ९२़३४ टक्के निकाल लागला आहे़ भूम तालुक्याने सलग पाचव्या वर्षी जिल्ह्यात सर्वाधिक निकालाची परंपरा कायम राखली आहे़