शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

शेतक-यांना आरक्षण द्या !, शरद पवारांची नवी भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 02:34 IST

जातीपातींचा विचार न करता समाजातील आर्थिक दुर्बलांना आरक्षण मिळाले पाहिजे, या आपल्या भूमिकेत बदल करत आता शेती व्यवसाय घटक मानून आरक्षण दिल्यास मराठा समाजासह सर्व समाजातील मागासांना आरक्षणाचा लाभ घेता येईल

मुंबई : जातीपातींचा विचार न करता समाजातील आर्थिक दुर्बलांना आरक्षण मिळाले पाहिजे, या आपल्या भूमिकेत बदल करत आता शेती व्यवसाय घटक मानून आरक्षण दिल्यास मराठा समाजासह सर्व समाजातील मागासांना आरक्षणाचा लाभ घेता येईल, अशी नवी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढे केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात घेतलेल्या मुलाखतीतील आरक्षणासंदर्भातील आपले विधान नीट समजून घेतले गेले नाही, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसींसाठी असलेल्या आरक्षणाला धक्का न लावता आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची भूमिका मी मांडली होती. आघाडी सरकारच्या काळात मराठा व मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयाने रद्द ठरविल्यामुळे आर्थिक निकषाच्या आधारे आरक्षणाचा विचार पुढे आला. शेजारील कर्नाटक राज्यात मराठा समाज ओबीसीमध्ये येतो.तसेच राजस्थानात जाट समाजाला आरक्षण देण्यात येते. या राज्यांनी मराठा समाजाची व्याख्या व्यापक केल्याने न्यायालयाच्या कसोटीवर आरक्षण टिकले. असाच प्रयत्न महाराष्ट्रानेही करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली.आरक्षणासाठी शेती या घटक ग्राह्य मानल्यास आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया मागास असणा-या सर्व घटकांना आरक्षणाचा लाभ देता येईल, असे पवार म्हणाले. यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे आग्रह धरावा, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.जिल्हा बँकांसाठी सर्वोच्च न्यायालयातनोटाबंदीच्या काळात जमा झालेल्या जुन्या नोटा सहकारी बँकांनी नष्ट कराव्यात आणि ताळेबंदपत्रकात तोटा म्हणून दाखवावा, असे अजब परिपत्रक रिझर्व्ह बँकेने काढले आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे २२.२५ कोटी, सांगली १४.७२, कोल्हापूर २५.२८, तर नाशिक बँकेच्या २१.३२ कोटी अशा विविध बँकाचे एकूण १२२ कोटी रूपये आरबीआयने बदलून दिले नाहीत. केंद्र सरकारकडून न्याय न मिळाल्यास थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाईल. पी. चिदंबरम् हा खटला लढवतील, असे खा. पवार यांनी सांगितले.उद्धवला तरी बाळासाहेब समजले का ?शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कळायला शरद पवारांना ५० वर्षे लागले, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. यावर पवार म्हणाले, उद्धव ठाकरे यांना तरी बाळासाहेब समजलेत का? आर्थिक निकषाच्या आधारावर आरक्षण असावे अशी बाळासाहेबांची भूमिका असताना मग युतीच्या पाच वर्षांच्या काळात हा निर्णय का झाला नाही? आताही शिवसेना तीन वर्षे सत्तेत आहे. तरीही निर्णय का होत नाही? कदाचित तसा निर्णय घ्यावा म्हणून येत्या काळात सत्तेतून बाहेर पडण्याचा इशाराही देतील, असा चिमटाही पवारांनी काढला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmerशेतकरीreservationआरक्षण