शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

राज्यातील १२ लाख टन साखरेचा होणार राखीव साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 10:58 IST

गेली २ वर्षे देशात विक्रमी ३३०-३३५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

ठळक मुद्देसाखर उद्योगाला दिलासा : तरीही देशात शंभर लाख टन साखर राहील शिल्लकदेशातील साखरेचे उत्पादन ३३० वरून २८५ लाख टनांवर घसरण्याचा अंदाजदेशात सुमारे १०० लाख टन साखर पुढील हंगामातही शिल्लक राहणार

पुणे : केद्र सरकारने जाहीर केलेल्या राखीव साठा (बफर स्टॉक) योजनेमुळे राज्यातील साखर कारखान्यांना १२ लाख टन साखरेचा साठा करता येणार आहे. या साखरेचे व्याज, विमा आणि गोदामाच्या खर्चापोटी कराव्या लागणाऱ्या खर्चाचा परतावा कारखान्यांना केंद्र सरकारकडे मागता येईल. त्यामुळे राज्यातील साखर कारखानदारीला काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र, तरीही देशात १०० लाख टन साखर ऑक्टोबर २०२०मधे शिल्लक राहण्याची दाट शक्यता आहे. गेली २ वर्षे देशात विक्रमी ३३०-३३५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०१८मधे नवीन हंगाम सुरू होताना तब्बल १०४ लाख टन साखरेचा साठा शिल्लक होता. मे महिन्यात संपलेल्या हंगामातही (२०१८-१९) देशात ३३० आणि राज्यात सलग दुसऱ्या वर्षी १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. देशाचा वार्षिक खप साधारण २६० लाख टन इतका असून, राज्यात ३० ते ३५ लाख टन साखर खपते. यंदाच्या वर्षी १३९ ते १४० लाख टन साखर क्टोबरअखेरीस शिलकी राहील. साखरेला उठाव नसल्याने साखर उद्योगासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यातून मार्ग काढण्यासाठी साखरेचा बफर स्टॉक करण्याची मागणी साखर संघटनांकडून होत होती. शिल्लक साखरेच्या प्रश्नामुळे देशात १ ऑगस्ट २०१९ ते ३१ जुलै २०२०पर्यंत ४० लाख टन साखरेचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. साधारण त्यातील ३० टक्के वाटा राज्याला मिळेल. म्हणजेच राज्याच्या वाट्याला येणारी १२ लाख टन साखर प्रत्येक कारखान्याला वाटून दिली जाईल. वाट्याला येणारा साखरेचा कोटा कारखान्यांना बाजूला काढावा लागेल. या साखरेच्या प्रमाणात विमा, कर्जाचे व्याज यांचा परतावा केंद्र सरकारकडून मिळेल. त्यासाठी दर ३ महिन्यांनी कारखान्यांना परताव्यासाठी अर्ज करावा लागेल. 

......* देशातील साखरेचे उत्पादन घसणार?‘गेल्या वर्षी असलेला बफर स्टॉकचा कोटा ३० वरून ४० लाख टनांवर वाढविण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक बाजारातील दरात सुधारणा होईल. शेतकऱ्यांनादेखील ऊसबिलाची रक्कम देता येणे कारखान्यांना शक्य होईल. उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरात २०१८-१९ या वर्षांत भरघोस वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे २०१९-२० या हंगामामधे मागील वाढीव दर कायम करण्याचा केंद्राचा निर्णय अपेक्षित होता,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली. .......... आगामी ऊस गाळप हंगामामधे देशातील साखरेचे उत्पादन ३३० वरून २८५ लाख टनांवर घसरण्याचा अंदाज आहे. गेल्या मॉन्सूनमधे महाराष्ट्राकडे पावसाने पाठ फिरविल्याने ऊस क्षेत्रात ११.५४ लाख हेक्टरवरून ८.२३ लाख हेक्टरपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे राज्यातील साखरेचे उत्पादन १०७ वरून ७० लाख टनांपर्यंत खाली घसरेल. त्याचा फटका देशातील एकूण उत्पादनाला बसेल. गेल्या हंगामातील (२०१८-१९) १३९ ते १४० लाख टन साखर शिल्लक राहील. देशातील साखरेचा खप २०६ लाख टन असून, ६० ते ६५ लाख टन साखर  आगामी हंगामात निर्यात होईल. ही आकडेवारी लक्षात घेतल्यास देशात सुमारे १०० लाख टन साखर पुढील हंगामातही शिल्लक राहील.........

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकारFarmerशेतकरीbusinessव्यवसाय