शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

आरक्षण हे सरकारचे नव्हे; मराठा आंदोलनाचे यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 05:22 IST

मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर केल्यावर भाजपाचे लोक स्वत:च फेटे बांधून मिरवत आहेत.

यवतमाळ/ अमरावती : मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर केल्यावर भाजपाचे लोक स्वत:च फेटे बांधून मिरवत आहेत. मात्र, सकल मराठा समाजाच्या आंदोलनाचेच हे सर्व यश आहे. आघाडी शासनाने दिलेले आरक्षण कोर्टात अडकल्यानंतर युती शासनाने चार वर्ष काय केले? मराठा समाजाने ५८ मोर्चे काढले, ४० जणांना प्राणाची आहुती द्यावी लागली. त्यामुळे अखेर युती शासनाला आरक्षणाचा निर्णय घेणे भाग पडले. हाच निर्णय चार वर्षांपूर्वी घेतला असता तर ४० जीव वाचले असते, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.काँग्रेसच्या पश्चिम विदर्भातील जनसंघर्ष यात्रेचा शुभारंभ मंगळवारी यवतमाळातून झाला. या वेळी पोस्टल ग्राउंडवरील जाहीर सभेत खा. चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, मराठा आरक्षणाचा निर्णय झाला; पण भाजपा-शिवसेना सरकारने धनगर आरक्षणाचे काय केले? पोहरादेवीत बंजारा समाजासाठी १०० कोटी दिले म्हणून मुख्यमंत्री सांगतात आणि दोनच दिवसांपूर्वी शिर्डीच्या साईबाबाकडून ५०० कोटी काढून घेतात. हे देणारे सरकार नव्हेतर देवाचेही पैसे काढून घेणारे सरकार आहे.२०१४ पासून शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. विदर्भाचे प्रश्न आपण सोडवू शकत नाही, हे लपविण्यासाठीच नागपूरचे अधिवेशन बंद करून मुंबईला पळविले, अशी टीका माणिकराव ठाकरे यांनी केली.>‘दर्डा यांनी जिल्ह्याचा लौकिक वाढविला’यवतमाळ जिल्ह्याने एके काळी राज्याला नेतृत्व दिले. वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांच्या रूपाने दोन समर्थ मुख्यमंत्री दिले. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा हे उद्योगमंत्री असताना त्यांनी जिल्ह्याचा लौकिक वाढविला. राज्यात आणि यवतमाळ जिल्ह्यात उद्योग आणण्यासाठी त्यांनी धडपड केली, पण सध्याच्या भाजपा-सेना सरकारने ‘कुठे नेऊन ठेवले यवतमाळ माझे’ म्हणण्याची वेळ आणली आहे, असेही खा. अशोक चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण