शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

आरक्षण हे सरकारचे नव्हे; मराठा आंदोलनाचे यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 05:22 IST

मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर केल्यावर भाजपाचे लोक स्वत:च फेटे बांधून मिरवत आहेत.

यवतमाळ/ अमरावती : मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर केल्यावर भाजपाचे लोक स्वत:च फेटे बांधून मिरवत आहेत. मात्र, सकल मराठा समाजाच्या आंदोलनाचेच हे सर्व यश आहे. आघाडी शासनाने दिलेले आरक्षण कोर्टात अडकल्यानंतर युती शासनाने चार वर्ष काय केले? मराठा समाजाने ५८ मोर्चे काढले, ४० जणांना प्राणाची आहुती द्यावी लागली. त्यामुळे अखेर युती शासनाला आरक्षणाचा निर्णय घेणे भाग पडले. हाच निर्णय चार वर्षांपूर्वी घेतला असता तर ४० जीव वाचले असते, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.काँग्रेसच्या पश्चिम विदर्भातील जनसंघर्ष यात्रेचा शुभारंभ मंगळवारी यवतमाळातून झाला. या वेळी पोस्टल ग्राउंडवरील जाहीर सभेत खा. चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, मराठा आरक्षणाचा निर्णय झाला; पण भाजपा-शिवसेना सरकारने धनगर आरक्षणाचे काय केले? पोहरादेवीत बंजारा समाजासाठी १०० कोटी दिले म्हणून मुख्यमंत्री सांगतात आणि दोनच दिवसांपूर्वी शिर्डीच्या साईबाबाकडून ५०० कोटी काढून घेतात. हे देणारे सरकार नव्हेतर देवाचेही पैसे काढून घेणारे सरकार आहे.२०१४ पासून शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. विदर्भाचे प्रश्न आपण सोडवू शकत नाही, हे लपविण्यासाठीच नागपूरचे अधिवेशन बंद करून मुंबईला पळविले, अशी टीका माणिकराव ठाकरे यांनी केली.>‘दर्डा यांनी जिल्ह्याचा लौकिक वाढविला’यवतमाळ जिल्ह्याने एके काळी राज्याला नेतृत्व दिले. वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांच्या रूपाने दोन समर्थ मुख्यमंत्री दिले. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा हे उद्योगमंत्री असताना त्यांनी जिल्ह्याचा लौकिक वाढविला. राज्यात आणि यवतमाळ जिल्ह्यात उद्योग आणण्यासाठी त्यांनी धडपड केली, पण सध्याच्या भाजपा-सेना सरकारने ‘कुठे नेऊन ठेवले यवतमाळ माझे’ म्हणण्याची वेळ आणली आहे, असेही खा. अशोक चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण