शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

आजी-माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा लागली पणाला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 5:13 AM

उस्मानाबादेत धुमशान । मधुकर चव्हाण, राणा पाटील, तानाजी सावंतांनी थोपटले दंड

उस्मानाबाद जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत यावेळी उथळ पक्षांतर, बंडखोरीने चांगलाच खळखळाट निर्माण केला आहे़ उमेदवारीसाठी ऐनवेळी दुसरा झेंडा हाती घेतलेल्यांची संख्या लक्षणीय आहे़ या सगळ्या उलथापालथीत मतदारांचे लक्ष मात्र, तुळजापूर अन् परंडा मतदारसंघाकडे लागले आहे़ येथून तीन आजी-माजी मंत्री आखाड्यात आहेत़ यावेळची लढत ही तिघांसाठीही प्रतिष्ठेची आहे़ कोणत्याही स्थितीत प्रतिस्पर्ध्याची पाठ लावायचीच, या इर्ष्येने वेगवेगळे डाव टाकले जात आहेत़

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात रंगतदार लढत ही तुळजापुरात होत आहे़ येथे भाजपने माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील व काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्यात कुस्ती लागली आहे़ पाचवेळा निवडून आलेल्या चव्हाणांसमोर यावेळी भाजपने राणा पाटील यांना उतरवून पहिल्यांदाच आव्हान निर्माण केले आहे़ दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी व प्रहारनेही तगडे उमेदवार दिल्याने रंगत वाढली आहे़ असे असले तरी राणा व मधुकररावांसाठी ही लढत टोकाच्या प्रतिष्ठेची आहे़विधानपरिषदेची टर्म अजून बरीच शिल्लक असतानाही जनतेतून निवडून जाण्याचा चंग बांधलेल्या जलसंधारणमंत्री प्रा़तानाजी सावंत यांनी परंडा मतदारसंघात सेनेकडून शड्डू ठोकला आहे़ त्यांच्यापुढे हॅट्ट्रीक साधलेल्या राष्ट्रवादीच्या राहुल मोटे यांचे आव्हान आहे़ राष्ट्रवादीचा हा गड सर करण्यासाठी सावंतांनी जंग-जंग पछाडले आहे़ दरम्यान, या दोघांच्या भांडणात ‘वंचित’च्या सुरेश कांबळे यांनीही मतदारसंघात आपली ‘हवा’ तयार करण्यात यश मिळविले आहे़

उमरग्यात शिवसेनेचे विद्यमान आमदार हॅट्ट्रीक साधण्यासाठी आखाड्यात उतरले आहेत़ मात्र, त्यांच्यापुढे काँग्रेसच्या दिलीप भालेराव यांनी आव्हान निर्माण केले आहे़ येथे वंचित बहुजन आघाडीही निर्णायक स्थितीत आहे़उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने कैलास पाटील या तरुण चेहऱ्याला संधी दिली आहे़ तर राष्ट्रवादीने संजय निंबाळकर यांच्या माध्यमातून सेनेला आव्हान दिले आहे़ या दोघांपुढे बंडखोर अजित पिंगळे, सुरेश पाटील तसेच वंचित बहुजन आघाडीचे धनंजय शिंगाडे यांनी चांगलेच आव्हान निर्माण केले आहे़ खा़ओमराजेंसाठी ही जागा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे़प्रचारातील चर्चेचे मुद्देपरंड्यापासून तुळजापूर व्हाया उस्मानाबाद, कृष्णेच्या पाण्याचा मुद्दाच प्रचारात अग्रस्थानी आहे़ मराठवाड्याच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी पुढच्या पाच वर्षात आपणच आणून दाखवू, अशी ग्वाही वरील तिन्ही मतदारसंघात सर्वच उमेदवार मतदारांना देत आहेत़रोजगार हा प्रचारात कळीचा मुद्दा ठरत आहे़ जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प नसल्याने तरुणांना गाव सोडावे लागते़ त्यामुळे पुन्हा एकदा हा विषय सर्वच उमेदवारांनी अजेंड्यावर घेतला आहे़ निवडून गेल्यानंतर आपल्या मतदारसंघात रोजगार देणारे मोठे उद्योग आणण्याचे आश्वासन उमेदवार मतदारांना देत आहेत़जिल्ह्यात बहुसंख्य मतदार हे शेतकरी आहेत़ त्यामुळे स्वाभाविकच प्रचारात हा घटक फ्रंटफुटवर असणाऱ त्यांच्यासाठी सिंचन सुविधा, शेतमालास भाव, कृषी प्रक्रिया उद्योग, पीकविमा, असे परंपरागत मुद्दे रेटले जात आहेत़