शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

प्रजासत्ताक दिनी संविधान बचाव रॅली, राजू शेट्टी, जितेंद्र आव्हाड, राजीव सातव यांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 17:01 IST

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संविधान बचाव मार्च काढण्यात येणार आहे. विद्यापीठातील आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया येथे विनापक्ष विनाझेंडा आंदोलन करण्यात येणार आहे.

मुंबई- प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संविधान बचाव मार्च काढण्यात येणार आहे. विद्यापीठातील आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया येथे विनापक्ष विनाझेंडा आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यघटना वाचविण्यासाठी त्याची छेडछाड रोखण्यासाठी संविधान बचाव रॅली आम्ही काढणार आहोत, असं प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे.अनंतकुमार यांनी हे विधान सत्ताधारी असल्यानं केलं आहे, राज्यात सत्ता असली तरी तुम्हाला राज्य घटना बदलू देणार नाही. जनतेने सत्ता दिली ती विकासासाठी घटनाबदलासाठी नाही. विकासासाठी मते मागून घटनाबदलाचा कार्यक्रम राबविण चुकीचं आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले आहेत. राजू शेट्टी, जितेंद्र आव्हाड, राजीव सातव यांनी मुंबई पत्रकार संघात संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.देशात विविध प्रवाह वगैरे असतानाही देश घटनेमुळेच एकत्र राहिला आहे. म्हणून आम्ही संविधान बचाव रॅली काढली आहे. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत संविधान वाचविण्यासाठी संघर्ष करणार असल्याचंही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे. आमची रॅली प्रतीकात्मक आहे. याला उत्तर म्हणून भाजपाने तिरंगा रॅली, संविधान सन्मान रॅली काढायची गरज नव्हती. पण ती काढतायत याचा अर्थ चोराच्या मनात चांदण, अशीही टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही टीका केली आहे. तरुणाईत सध्या अस्वस्थता आहे. विशेषतः विद्यापीठ कॅम्पसमध्ये अस्वस्थता आहे. घटनाबाह्य शक्तींच्या माध्यमातून घटना संपविण्याचे, बदलण्याचे प्रयत्न सुरू आहे. अनंतकुमार यांच्यासारख्या ज्येष्ठ खासदार मंत्री उघडपणे घटना बदलाची भाषा करत आहेत. तेव्हा संविधान बचावासाठी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. शरद पवार, शरद यादव, सीताराम येचुरी, सुशीलकुमार शिंदे, डी. राजा, तुषार गांधी, अल्पेश ठाकूर यांच्यासह अनेक सर्वपक्षीय नेते यात सहभागी होत आहेत.आमच्या रॅलीला उत्तर म्हणून तिरंगा रॅलीची भाजपाने घोषणा केली. पण, याच तिरंगा रॅलीला संघ-भाजपाने विरोध केला जोता. १४ ऑगस्ट १९४७ च्या ऑर्गनायझरच्या लेखात तिरंग्याला विरोध केला होता. ज्यांनी तिरंग्याला आपला मानला नाही ते आज तिरंगा सन्मान रॅली काढत आहेत. त्यामुळे आधी तुमच्या पूर्वजांच्या भूमिकेबद्दल माफी मागा. संविधानातच तिरंगा रक्षण आणि सन्मानाची तरतूद केली आहे. त्यामुळे आधी संविधान वाचलं तर तिरंगा आपोआप वाचेल. काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनीही भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्री उद्या तिरंगा रॅली काढतायत. पण त्यांच्या लेटर हेडवर दीनदयाळ उपाध्याय यांचा फोटो असतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आधी भूमिका स्पष्ट करावी, असंही राजीव सातव म्हणाले आहेत.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीJitendra Awhadजितेंद्र आव्हाड