शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

हे सरकार बरखास्त करा अन् राष्ट्रपती राजवट लावा; अभिषेक घोसाळकर हत्येवरून संजय राऊत संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 12:11 IST

तरीही पोलीस त्यावर काहीच कारवाई करायला तयार नाहीत कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत असा आरोप राऊतांनी केला आहे. 

मुंबई - महाराष्ट्रात दिवसाढवळ्या हत्या होतायेत, गोळीबार सुरू आहेत. हे अपयश नरेंद्र मोदी, अमित शाह यांचे आहे. त्यांनी माफियाराज महाराष्ट्रावर लादलं आहे. हा सूड आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे हे अपयश आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अपयश आहेत. ज्या पद्धतीचे त्यांनी हे सरकार जनतेवर लादलेले आहे. त्यामुळे गावागावत रक्ताचे सडे पडतायेत, लूटमार, हत्या वाढली आहे. मुख्यमंत्र्यांना ताबडतोड काढून याठिकाणी सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लावा, अशी आक्रमक मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

अभिषेक घोसाळकर हत्येवरून संजय राऊतांनी आक्रमकपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस भाजपाचा कार्यक्रम चाय पे चर्चा करतायेत. परंतु महाराष्ट्राच्या बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर चर्चा कधी करणार?, ठिकठिकाणी शिंदे गँगचे आमदार, खासदार हे रोज गुंड टोळ्यांसोबत चाय पे चर्चा करतायेत. हत्या होतायेत. देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अपयशी, अकार्यक्षम गृहमंत्री आहेत. तुम्हाला केवळ आमच्यावर टीका करण्यासाठी गृहमंत्रिपद दिले आहेत. राज्यातील जनता तुमच्याकडे राजीनामा मागतेय. या राज्याच्या गुंडांना पाठिशी घालणाऱ्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या लोकांवर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर कारवाई करा असं त्यांनी सांगितले. 

दरम्यान, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेची योजना सुरू आहे. परंतु महाराष्ट्रात गुंडांना पाठिशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारला जात नाही हे दुर्दैव आहे. शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव अभिषेक घोसाळकर हेसुद्धा नगरसेवक होते. मुंबई बँकेचे संचालक होते. त्यांची निर्घृणपणे मुंबई शहरात हत्या झाली आहे. या हत्येनंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा जो नंगानाच पाहायला मिळतोय तो अस्वस्थ करणारा आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हते. गेल्या दीड वर्षात रोज हत्येच्या बातम्या येतायेत. पुण्यात हत्या होते, वकील आढाव दाम्पत्याची हत्या झाली. राज्याचे गृहमंत्री अदृश्य आहेत. ते कुठे आहेत? असा सवाल राऊतांनी विचारला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAbhishek Ghosalkarअभिषेक घोसाळकर