शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘रिलायन्स’-‘टाटा’त रंगले शीतयुद्ध

By admin | Updated: June 19, 2014 03:01 IST

रिलायन्स आणि टाटा या दोन प्रतिस्पर्धी कंपन्या वीज दराच्या स्पर्धेमुळे आमने-सामने असतानाच आता त्यांच्यात वीज वितरण जाळ्यावरूनदेखील ‘शीतयुद्ध’ रंगले आहे.

मुंबई : मुंबईच्या उपनगरातील वीज ग्राहकांना विजेचे वितरण करणाऱ्या रिलायन्स आणि टाटा या दोन प्रतिस्पर्धी कंपन्या वीज दराच्या स्पर्धेमुळे आमने-सामने असतानाच आता त्यांच्यात वीज वितरण जाळ्यावरूनदेखील ‘शीतयुद्ध’ रंगले आहे.गेल्या आर्थिक वर्षात पसरविलेल्या ३३६ किलोमीटर लांबीच्या वीज वितरण जाळ्याचे सक्षमीकरण झाल्याचा दावा टाटा पॉवरने केला असतानाच रिलायन्सदेखील वीज वितरण जाळ्याच्या तपशिलाचा पाढा वाचत आपणही कसे पुढे आहोत? याचे गोडवे गायले आहे. उपनगरातील वीज गाहक एकमेकांकडे खेचण्यासाठी या दोन्ही प्रतिस्पर्धी कंपन्यांमध्ये वाद आहे. टाटा पॉवरची वीज रिलायन्सपेक्षा स्वस्त असल्याने उपनगरातील छोटे ग्राहक टाटाकडे आकर्षित होत आहेत. उलटपक्षी उद्योगधंद्यासाठी लागणाऱ्या विजेच्या दराबाबत रिलायन्सचे दर कमी असून, टाटाचे त्यापेक्षा अधिक आहेत. या प्रतिस्पर्धी कंपन्यांमधील ‘तु तू मैं मैं’ शिगेला पोहोचले आहे की, प्रसिद्धिपत्रके काढत त्यांनी एकमेकांना मागे टाकण्याचा प्रयत्न केला आहे.टाटा पॉवरचे कार्यकारी संचालक अशोक सेठी यांनी याबाबत सांगितले की, मुंबईत वीज वितरणासाठी खूप कमी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात आला आहे.रिलायन्सच्या प्रवक्त्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, टाटाकडून उपनगरातील वीज ग्राहकांना जी वीज वितरित केली जात आहे; त्यात रिलायन्सच्या वीज वितरण जाळ्याची भूमिका मोलाची आहे. शिवाय रिलायन्सचे उपनगरात २९ लाख ग्राहक आहेत. या वीज ग्राहकांची मागणी १ हजार ७५० मेगावॅट एवढी आहे. शिवाय रस्त्यांवरील दिव्यांसाठी रिलायन्सने तब्बल ३१ किमी वीज वितरणाचे जाळे उभारले आहे. तसेच उच्च आणि लघुदाब वीज वितरणासाठीही कंपनीचे मोठे जाळे पसरले आहे. (प्रतिनिधी)