शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

गरजेपोटीची बांधकामे नियमित करा

By admin | Updated: August 24, 2016 02:24 IST

प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या बांधकामांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या बांधकामांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सिडको व महापालिकेने ही बांधकामे अनधिकृत ठरवून त्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे यांच्याकडे केली आहे.प्रकल्पग्रस्तांच्या या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी नवी मुंबई प्रकल्पग्रस्त मध्यवर्ती कृती समितीच्या वतीने बेलापूर येथील सिडको गेस्ट हाऊस येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पालकमंत्री शिंदे यांच्यासह खासदार विचारे व आमदार मंदा म्हात्रे उपस्थित होत्या. प्रकल्पग्रस्तांचे नेते डॉ. राजेश पाटील यांनी या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले. सिडकोच्या चुकीमुळे आज ही परिस्थिती उद्भली आहे. चार दशके झाली तरी गावांचे सीमांकन करण्यात आलेले नाही. त्यामुळे गावठाण विस्तार केला गेला नाही. शहर विकसित करताना गावांचे नियोजन झाले नाही. साडेबारा टक्के भूखंड वाटप योजनेत मोठ्याप्रमाणात दिरंगाई करण्यात आली. याचा परिणाम म्हणून प्रकल्पग्रस्तांनी वाढत्या कुटुंबांची गरज लक्षात घेवून मूळ जागेवर गरजेपोटी बांधकामे केली. ही बांधकामे अनधिकृत ठरवून त्यावर कारवाई केली जात आहे. त्यामुळे ही बांधकामे नियमित करण्यासाठी आग्रही भूमिका घ्यावी, अशी मागणी डॉ. राजेश पाटील यांनी यावेळी केली. प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटीच्या बांधकामांचा प्रश्न गंभीर व तितकाच जिव्हाळ्याचा आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून यासंदर्भातील गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले जाईल, असे आश्वासन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. या बैठकीला शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले, प्रकल्पग्रस्तांचे नेते मोरेश्वर पाटील, विठ्ठल मोरे व कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)