शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

अधिकाऱ्यांना संरक्षण देणा-या कलमाचा फेरविचार करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 04:48 IST

सरकारी अधिकारी, कर्मचा-यांना संरक्षण देणा-या कलम ३५३ मध्ये सुधारणा सुचवण्यासाठी विधिमंडळाची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

नागपूर : सरकारी अधिकारी, कर्मचा-यांना संरक्षण देणा-या कलम ३५३ मध्ये सुधारणा सुचवण्यासाठी विधिमंडळाची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. त्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी एक सर्वपक्षीय समिती नेमावी व त्या समितीने तीन महिन्यांच्या आत या प्रकरणी आपला अहवाल द्यावा अशी सूचना त्यांनी यावेळी केली.पोलीस अधिकाºयांकडून आमदारांना मिळालेल्या अवमानकारक वागणुकीवरून बुधवारी विधानसभेत सर्वपक्षीय आमदारांनी प्रचंड गोंधळ घातला होता. सरकारी अधिकारी, कर्मचारी या कलमाचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप अनेक आमदारांनी विधानसभेत केला होता.शेवटी मुख्यमंत्री निवेदन करतील असे सांगून ती चर्चा थांबवण्यात आली होती. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, लोकप्रतिनिधींचा कुणीही अवमान करू नये. प्रशासनाने त्यांचा आदर राखला पाहिजे. ज्या तक्रारी बुधवारी लोकप्रतिनिधींनी केल्या त्या सगळ्यांची पोलीस महासंचालकांमार्फत १५ दिवसात चौकशी केली जाईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या चौकशीच्यावेळी आमदारांनाही बोलावले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीचा अर्ज भरायला गेलो तर अधिकारी बसून अर्ज घेतात कारण निवडणूक आयोगाने तसे आदेश काढले. मात्र इतर वेळीही अधिकारी तसेच वागतात, हे चुकीचे आहे. लोकप्रतिनिधींच्या हक्कासाठी हक्कभंग समिती आहेच पण त्याशिवाय छोट्या छोट्या तक्रारीसाठी एक सर्वपक्षीय आमदारांची औचित्याची समिती नेमली जाईल. ही समिती आलेल्या तक्रारींची तात्काळ दखल घेईल, दोन्ही बाजूच्या लोकांना बोलावून चौकशी करेल व निर्णय देईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.>सरकारी कामात अडथळा आणणाºयाच्या विरोधात कलम ३५३ अंतर्गत पाच वर्षांचा कारावास होतो, तसेच या कलमांतर्गत दाखल होणारा गुन्हा अजामीनपात्र आहे.अधिकारी या कलमाचा वापर करून खोट्या तक्रारी करतात आणि आमदारांनाही तुरुंगात टाकत असल्याची तक्रार अनेक आमदारांनी विधानसभेत केली होती.आमदारांच्या या भावना लक्षात घेऊन कलम ३५३ मध्ये सुधारणा सुचवण्यासाठी विधिमंडळाची समिती स्थापन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

टॅग्स :nagpurनागपूरNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८