शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Sanjay Raut On Petrol Diesel Price Cut : इंधनाच्या किंमती कमी करणं ही केंद्राची जबाबदारीच, राज्याच्या अखत्यारितील विषय नाही : राऊत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 11:02 IST

इंधनाच्या भडकलेल्या किमती आणि महागाईमुळे होरपळलेल्या जनतेला केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे.

इंधनाच्या भडकलेल्या किमती आणि महागाईमुळे होरपळलेल्या जनतेला केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ८ आणि ६ रुपये प्रति लिटर कपात करण्याची घोषणा केली. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील दर कमी करण्यावर राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं ते म्हणाले.

“१५ रुपये वाढवायचे ९ रुपये कमी करायचे, आपली तिजोरी भरायची असा हा भाग आहे. याविषयी मुख्यमंत्री, राज्य सरकार, अर्थमंत्री निर्णय घेतील. इंधनाच्या किंमती करणं केंद्र सरकारची जबाबदारीच आहे. हा राज्याच्या अखत्यारितील विषय नाही. कच्च्या तेलाच्या किंमती, आंतरराष्ट्रीय बाजारात काय सुरू आहे हे तुम्हालाच पाहायचं आहे,” असं राऊत म्हणाले. केंद्र सरकारनं पहिल्यांदा महाराष्ट्राच्या वाट्याचा जीएसटीचा परतावा द्यावा. आम्हालाही काही गोष्टी करण्यासाठीही ताकद मिळेल. यावर कोणीच काही बोलत नाही. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेतेही काही बोलत नाहीत. त्यांनीही जीएसटीच्या परताव्यासाठी तगादा लावला पाहिजे, असंही ते म्हणाले. राज्य सरकारची जी जबाबदारी आहे ते राज्य सरकार पूर्ण करेलच, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं."एकेकाळी आम्ही वाजपेयी, अडवाणींचंही ऐकायचो"“बाळासाहेबांचंच शिल्लक आहे म्हणून महाराष्ट्र सरकार चालत आहे. एकेकाळी आम्ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचंही ऐकत होतो. तेव्हा चंद्रकांत पाटील कुठेही नव्हते. अटलजींचे आदेश सूचना आम्ही पाळल्या. शरद पवार यांचं मार्गदर्शन पंतप्रधानही घेतात हे सर्वांना माहित आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे राजकारणाची माहिती कमी आहे,” असं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीPetrolपेट्रोलDieselडिझेल