शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

खाद्य पदार्थांतून साखर, मीठ, चरबीयुक्त घटक कमी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 04:05 IST

देशभरातील उद्योगांनी मागितली तीन वर्षांची मुदत

- राजेश मडावीचंद्रपूर : खाद्य पदार्थांमध्ये साखर, मीठ आणि तळलेल्या पदार्थांमध्ये चरबीयुक्त घटकांचा अधिक समावेश असल्याने नागरिकांना जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ३० टक्के मृत्यू केवळ चुकीच्या आहारामुळे होत असल्याचे निष्कर्ष काढल्याने केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाने ‘इट राइट मुव्हमेंट’ सुरू केली आहे. या मोहिमेच्या बडग्यामुळे खाद्य पदार्थांतून साखर, मीठ व चरबीयुक्त घटक कमी करून आहाराचा ‘नवीन फार्म्युला’ तीन वर्षांच्या आत तयार करू, अशी मुदत २० पेक्षा अधिक मोठ्या उद्योग समूहांनी केेंद्र सरकारकडे मागितली आहे.खाण्यापिण्याच्या वाईट सवयीमुळे मधुमेह, हृदयरोग व उच्च रक्तदाब यासारखे आजार होतात. सॉस, सिरफ, रेडी टू इट- फू ड, मैद्यापासून तयार केलेल्या पदार्थांमुळे बालकांना विविध आजारांनी घेरले. त्यामुळे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाने जागृती सुरूकेली आहे.अशी आहे ‘राइट इट मूव्हमेंट’मोहिमेचा उद्देश केवळ ‘कमी आणि पौष्टिक खा’ एवढ्यापुरताच नाही. दैनंदिन आहारात साखर, मीठ, मैदा व चरबीयुक्त पदार्थांचा अतिवापर केल्याने होणारे दुष्परिणाम समजून सांगावे. त्याविरोधात देशभरातील अन्न उत्पादक कंपन्यांनी ठोस पाऊल उचलावे. सध्याच्या पदार्थांमधून साखर, मीठ व मैदा वगळावे, यासाठी कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्य अन्न व औषध प्रशासनातील सूत्रांनी दिली.साखरेत कोणतेही व्हिटॅमीन नसते. मैदा म्हणजे एक प्रकारचे पांढरे विष आहे. यात तंतूमय (फ ायबर ) पदार्थ नसतो. तेलाचा अधिक वापर शरीरावर अनिष्ट परिणाम करतो. निरोगी आहारासाठी आज विविध पर्याय उपलब्ध आहेत.- डॉ. गोपाल मुंदडा, आहारतज्ज्ञ, चंद्रपूरखाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळेच अनेक आजार वाढत आहेत. त्यामुळे आहारातील हानिकारक अन्नघटक बाजूला काढून नवीन फॉर्म्युला तयार करण्याशिवाय आता पर्यायच उरला नाही. त्यामुळे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाने ‘राईट इट मुव्हमेंट’ सुरू केली. त्याद्वारे देशभरात जागृती केली जात आहे.- पवन अगरवाल, कार्यकारी संचालक, अन्न सुरक्षा व गुणवत्ता प्राधिकरण, दिल्ली.