शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

खाद्य पदार्थांतून साखर, मीठ, चरबीयुक्त घटक कमी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 04:05 IST

देशभरातील उद्योगांनी मागितली तीन वर्षांची मुदत

- राजेश मडावीचंद्रपूर : खाद्य पदार्थांमध्ये साखर, मीठ आणि तळलेल्या पदार्थांमध्ये चरबीयुक्त घटकांचा अधिक समावेश असल्याने नागरिकांना जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ३० टक्के मृत्यू केवळ चुकीच्या आहारामुळे होत असल्याचे निष्कर्ष काढल्याने केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाने ‘इट राइट मुव्हमेंट’ सुरू केली आहे. या मोहिमेच्या बडग्यामुळे खाद्य पदार्थांतून साखर, मीठ व चरबीयुक्त घटक कमी करून आहाराचा ‘नवीन फार्म्युला’ तीन वर्षांच्या आत तयार करू, अशी मुदत २० पेक्षा अधिक मोठ्या उद्योग समूहांनी केेंद्र सरकारकडे मागितली आहे.खाण्यापिण्याच्या वाईट सवयीमुळे मधुमेह, हृदयरोग व उच्च रक्तदाब यासारखे आजार होतात. सॉस, सिरफ, रेडी टू इट- फू ड, मैद्यापासून तयार केलेल्या पदार्थांमुळे बालकांना विविध आजारांनी घेरले. त्यामुळे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाने जागृती सुरूकेली आहे.अशी आहे ‘राइट इट मूव्हमेंट’मोहिमेचा उद्देश केवळ ‘कमी आणि पौष्टिक खा’ एवढ्यापुरताच नाही. दैनंदिन आहारात साखर, मीठ, मैदा व चरबीयुक्त पदार्थांचा अतिवापर केल्याने होणारे दुष्परिणाम समजून सांगावे. त्याविरोधात देशभरातील अन्न उत्पादक कंपन्यांनी ठोस पाऊल उचलावे. सध्याच्या पदार्थांमधून साखर, मीठ व मैदा वगळावे, यासाठी कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्य अन्न व औषध प्रशासनातील सूत्रांनी दिली.साखरेत कोणतेही व्हिटॅमीन नसते. मैदा म्हणजे एक प्रकारचे पांढरे विष आहे. यात तंतूमय (फ ायबर ) पदार्थ नसतो. तेलाचा अधिक वापर शरीरावर अनिष्ट परिणाम करतो. निरोगी आहारासाठी आज विविध पर्याय उपलब्ध आहेत.- डॉ. गोपाल मुंदडा, आहारतज्ज्ञ, चंद्रपूरखाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळेच अनेक आजार वाढत आहेत. त्यामुळे आहारातील हानिकारक अन्नघटक बाजूला काढून नवीन फॉर्म्युला तयार करण्याशिवाय आता पर्यायच उरला नाही. त्यामुळे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाने ‘राईट इट मुव्हमेंट’ सुरू केली. त्याद्वारे देशभरात जागृती केली जात आहे.- पवन अगरवाल, कार्यकारी संचालक, अन्न सुरक्षा व गुणवत्ता प्राधिकरण, दिल्ली.