शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

खाद्य पदार्थांतून साखर, मीठ, चरबीयुक्त घटक कमी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 04:05 IST

देशभरातील उद्योगांनी मागितली तीन वर्षांची मुदत

- राजेश मडावीचंद्रपूर : खाद्य पदार्थांमध्ये साखर, मीठ आणि तळलेल्या पदार्थांमध्ये चरबीयुक्त घटकांचा अधिक समावेश असल्याने नागरिकांना जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ३० टक्के मृत्यू केवळ चुकीच्या आहारामुळे होत असल्याचे निष्कर्ष काढल्याने केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाने ‘इट राइट मुव्हमेंट’ सुरू केली आहे. या मोहिमेच्या बडग्यामुळे खाद्य पदार्थांतून साखर, मीठ व चरबीयुक्त घटक कमी करून आहाराचा ‘नवीन फार्म्युला’ तीन वर्षांच्या आत तयार करू, अशी मुदत २० पेक्षा अधिक मोठ्या उद्योग समूहांनी केेंद्र सरकारकडे मागितली आहे.खाण्यापिण्याच्या वाईट सवयीमुळे मधुमेह, हृदयरोग व उच्च रक्तदाब यासारखे आजार होतात. सॉस, सिरफ, रेडी टू इट- फू ड, मैद्यापासून तयार केलेल्या पदार्थांमुळे बालकांना विविध आजारांनी घेरले. त्यामुळे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाने जागृती सुरूकेली आहे.अशी आहे ‘राइट इट मूव्हमेंट’मोहिमेचा उद्देश केवळ ‘कमी आणि पौष्टिक खा’ एवढ्यापुरताच नाही. दैनंदिन आहारात साखर, मीठ, मैदा व चरबीयुक्त पदार्थांचा अतिवापर केल्याने होणारे दुष्परिणाम समजून सांगावे. त्याविरोधात देशभरातील अन्न उत्पादक कंपन्यांनी ठोस पाऊल उचलावे. सध्याच्या पदार्थांमधून साखर, मीठ व मैदा वगळावे, यासाठी कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्य अन्न व औषध प्रशासनातील सूत्रांनी दिली.साखरेत कोणतेही व्हिटॅमीन नसते. मैदा म्हणजे एक प्रकारचे पांढरे विष आहे. यात तंतूमय (फ ायबर ) पदार्थ नसतो. तेलाचा अधिक वापर शरीरावर अनिष्ट परिणाम करतो. निरोगी आहारासाठी आज विविध पर्याय उपलब्ध आहेत.- डॉ. गोपाल मुंदडा, आहारतज्ज्ञ, चंद्रपूरखाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळेच अनेक आजार वाढत आहेत. त्यामुळे आहारातील हानिकारक अन्नघटक बाजूला काढून नवीन फॉर्म्युला तयार करण्याशिवाय आता पर्यायच उरला नाही. त्यामुळे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाने ‘राईट इट मुव्हमेंट’ सुरू केली. त्याद्वारे देशभरात जागृती केली जात आहे.- पवन अगरवाल, कार्यकारी संचालक, अन्न सुरक्षा व गुणवत्ता प्राधिकरण, दिल्ली.