शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

Reservation: ‘ओबीसींचं आरक्षण १७ टक्क्यांपर्यंत कमी करा, उर्वरित १० टक्के मराठा समाजाला द्या’, मराठा क्रांती मोर्चाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 13:28 IST

Reservation: ओबीसींना महाराष्ट्रात लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे, अशी मराठा समाजाची मारणी आहे. त्यानुसार ओबीसींना १७ टक्क्यांच्या आसपास आरक्षण मिळेल, त्यानंतर उरलेले १०-११ टक्के आरक्षण हे मराठा समाजाला देण्यात यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वकिलांनी केली आहे.

मुंबई - ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे सुटला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारत त्यानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, बांठिया आगोगाने दिलेल्या अहवालात ओबीसींची संख्या ३७ टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, लोकसंख्येच्या तुलनेत ५० टक्के आरक्षणाची तरतूद असल्याने ओबीसींचं आरक्षण त्याप्रमाणे कमी करून १७ टक्के करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. तसेच हे उरणारे १० टक्के आरक्षण मराठा समाजाला द्या, असे मराठा क्रांती मोर्चाच्या वकिलांनी म्हटले आहे.

याबाबत सविस्तर माहिती देताना मराठा क्रांती मोर्चाचे वकील अभिजित पाटील म्हणाले की, ओबीसी आरक्षणासंदर्भांत बांठिया आयोगाचा अहवाल आला आहे. त्यात ओबीसींची लोकसंख्या ही ३७ टक्के एवढी निश्चित करण्यात आली आहे. हा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या अहवालाच्या वैधतेबाबत न्यायालयाने कुठलाही निर्णय दिलेला नाही. या अहवालाच्या वैधतेला आव्हान देण्याचा पर्याय न्यायालयाने मोकळा ठेवले आहे. मात्र आजच्या घडीला ओबीसींची संख्या ३७ टक्के असल्याचे समोर आले आहे. आरक्षण देण्याच्या पद्धतीनुसार लोकसंख्येच्या तुलनेत ५० टक्के आरक्षण दिले जाते. त्यामुळे आता ओबीसींना महाराष्ट्रात लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे, अशी मराठा समाजाची मारणी आहे. त्यानुसार ओबीसींना १७ टक्क्यांच्या आसपास आरक्षण मिळेल, त्यानंतर उरलेले १०-११ टक्के आरक्षण हे मराठा समाजाला देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक वीरेंद्र पवार म्हणाले की, सध्या मराठा समाजासाठी परिस्थिती चांगली आहे. आधीच्या सरकारमध्ये मराठा समाजाचं ऐकलंच जात नव्हतं, जे मंत्री होते ते मराठा समाजाला मदत करण्याच्या भूमिकेमध्ये नव्हतेच, उलट मराठा समाजाचं आरक्षण गेलं तेव्हा पेढे वाटणारे मंत्री तिथे होते. त्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला काय मिळेल ही अपेक्षाच मराठा समाजाने सोडून दिली होती.  आज ज्याप्रकारे ओबीसींचा निकाल लागला त्याप्रमाणे मराठा समाजाची प्रलंबित असलेली पुनर्विचार याचिका मार्गी लावून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग सुकर करावा, अशी आमची मागणी आहे, अशी मागणी त्यांनी केली. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण