शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Reservation: ‘ओबीसींचं आरक्षण १७ टक्क्यांपर्यंत कमी करा, उर्वरित १० टक्के मराठा समाजाला द्या’, मराठा क्रांती मोर्चाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 13:28 IST

Reservation: ओबीसींना महाराष्ट्रात लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे, अशी मराठा समाजाची मारणी आहे. त्यानुसार ओबीसींना १७ टक्क्यांच्या आसपास आरक्षण मिळेल, त्यानंतर उरलेले १०-११ टक्के आरक्षण हे मराठा समाजाला देण्यात यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वकिलांनी केली आहे.

मुंबई - ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे सुटला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारत त्यानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, बांठिया आगोगाने दिलेल्या अहवालात ओबीसींची संख्या ३७ टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, लोकसंख्येच्या तुलनेत ५० टक्के आरक्षणाची तरतूद असल्याने ओबीसींचं आरक्षण त्याप्रमाणे कमी करून १७ टक्के करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. तसेच हे उरणारे १० टक्के आरक्षण मराठा समाजाला द्या, असे मराठा क्रांती मोर्चाच्या वकिलांनी म्हटले आहे.

याबाबत सविस्तर माहिती देताना मराठा क्रांती मोर्चाचे वकील अभिजित पाटील म्हणाले की, ओबीसी आरक्षणासंदर्भांत बांठिया आयोगाचा अहवाल आला आहे. त्यात ओबीसींची लोकसंख्या ही ३७ टक्के एवढी निश्चित करण्यात आली आहे. हा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या अहवालाच्या वैधतेबाबत न्यायालयाने कुठलाही निर्णय दिलेला नाही. या अहवालाच्या वैधतेला आव्हान देण्याचा पर्याय न्यायालयाने मोकळा ठेवले आहे. मात्र आजच्या घडीला ओबीसींची संख्या ३७ टक्के असल्याचे समोर आले आहे. आरक्षण देण्याच्या पद्धतीनुसार लोकसंख्येच्या तुलनेत ५० टक्के आरक्षण दिले जाते. त्यामुळे आता ओबीसींना महाराष्ट्रात लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे, अशी मराठा समाजाची मारणी आहे. त्यानुसार ओबीसींना १७ टक्क्यांच्या आसपास आरक्षण मिळेल, त्यानंतर उरलेले १०-११ टक्के आरक्षण हे मराठा समाजाला देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक वीरेंद्र पवार म्हणाले की, सध्या मराठा समाजासाठी परिस्थिती चांगली आहे. आधीच्या सरकारमध्ये मराठा समाजाचं ऐकलंच जात नव्हतं, जे मंत्री होते ते मराठा समाजाला मदत करण्याच्या भूमिकेमध्ये नव्हतेच, उलट मराठा समाजाचं आरक्षण गेलं तेव्हा पेढे वाटणारे मंत्री तिथे होते. त्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला काय मिळेल ही अपेक्षाच मराठा समाजाने सोडून दिली होती.  आज ज्याप्रकारे ओबीसींचा निकाल लागला त्याप्रमाणे मराठा समाजाची प्रलंबित असलेली पुनर्विचार याचिका मार्गी लावून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग सुकर करावा, अशी आमची मागणी आहे, अशी मागणी त्यांनी केली. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण