शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
3
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
6
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
7
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
8
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
9
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
10
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
11
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
12
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
13
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
14
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
15
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
16
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
17
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
18
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
19
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
20
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी

धारावीचा पुनर्विकास ही काळाची गरज- रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 20:04 IST

Ramdas Athawale: बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने काल रात्री धारावीत आयोजित कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी धारावीच्या तातडीच्या पुनर्विकासाची जोरदार मागणी केली.

बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने काल रात्री धारावीत आयोजित कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी धारावीच्या तातडीच्या पुनर्विकासाची जोरदार मागणी केली. आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी असलेल्या धारावीतील नागरिकांसाठी चांगल्या आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्यांनी प्रकल्पाचा वेग वाढवण्याचे आवाहन केले.

"धारावी ही केवळ झोपडपट्टी नाही, तर इथे मराठी, हिंदी, तमिळ भाषिक आणि विविध धर्मीय लोक राहतात. सर्वांनाच सन्मानपूर्वक आणि सुरक्षित घरे मिळायला हवीत," असे आठवले म्हणाले. "हा पुनर्विकास प्रकल्प तातडीने राबवण्यात यावा, जेणेकरून येथील नागरिकांचे पुनर्वसन लवकरात लवकर होईल."

पुनर्विकास प्रकल्पाला काही ठिकाणी विरोध होत असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की लोकशाहीत मतभेदाचा अधिकार असतो, पण हे काम लोकांच्या हिताचे आहे. "लोकशाहीत विरोध करणे योग्यच आहे. पण धारावीचा पुनर्विकास ही काळाची गरज आहे आणि तो लवकरात लवकर सुरू व्हावा, असे आमचे मत आहे," असे आठवले यांनी स्पष्ट केले.

धारावी पुनर्विकास प्रकल्पावर सध्या राज्य व केंद्र सरकारचे लक्ष असून, या प्रकल्पामुळे लाखो नागरिकांच्या जीवनमानात मोठा बदल घडू शकतो. मंत्री आठवले यांच्या या वक्तव्यामुळे प्रकल्पाला मिळणारा पाठिंबा अधिक ठळकपणे पुढे आला आहे.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेMumbaiमुंबई