शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

ठेकेदारी पद्धतीने भरती, हा भारतीय सैन्याचा अपमान - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 13:35 IST

Sanjay Raut : ठेकेदारी पद्धतीने सैन्यभरती होत असेल तर ती पद्धत अयोग्य आहे. ठेकेदारीने सैन्यभरती झाल्यास तो भारतीय सैन्याचा अपमान आहे, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे.

मुंबई : केंद्र सरकारच्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. ठेकेदारी पद्धतीने सैन्यभरती होत असेल तर ती पद्धत अयोग्य आहे. ठेकेदारीने सैन्यभरती झाल्यास तो भारतीय सैन्याचा अपमान आहे, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे.

अग्निपथ योजनेवरून संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मोदी सरकारची प्रत्येक योजना अपयशी ठरली आहे. याआधी 2 कोटी 10 कोटी अशा घोषणा केल्या होत्या. आता नवीन अग्निपथ. सैन्याला एक शिस्त असते. सैन्यामध्ये जर ठेकेदारी पद्धतीने भरती होणार असेल तर भारतीय सैन्याची प्रतिष्ठा रसातळाला जाईल. सैन्यावर संपूर्ण देशाची जबाबदारी आहे, त्यांना ठेकेदारी पद्धतीने कसे काय घेतले जाऊ शकते, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

ठेकेदारी पद्धतीने सैन्य भरती हा संपूर्ण भारतीय सैन्याचा अपमान आहे. फक्त नोकरी म्हणून कामावर ठेवणे हा संपूर्ण भारतीय सैन्याचा अपमान आहे. राष्ट्रीय सुरक्षा दलाचा अपमान आहे. गुलामांना ठेकेदारीवर ठेवतात. देशाचे रक्षण करणाऱ्या सैन्याला ठेकेदारीवर ठेवले जाऊ शकत नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच, देशात सध्या काय चाललं आहे किंवा काय होणार आहे? हे कोणालाच माहित नाही. या योजनेवरुन संपूर्ण देशात वणवा पेटला आहे, असे संजय राऊत म्हणाले.

याचबरोबर, संजय राऊत यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर सुद्धा भाष्य केले. ते म्हणाले, "सर्वच पक्षाचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधत आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते राजनाथसिंह यांनीही मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. भाजप देशातील सर्व पक्षांना राष्ट्रपती निवडणुकसाठी फोन करत आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची एक प्रकिया असते. सर्वसमंतीने उमेदवार निश्चित झाला तर चांगलंच आहे."

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAgneepath Schemeअग्निपथ योजना