शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्हा बँकांची नोकर भरतीही सापडली संशयाच्या फेऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 09:27 IST

District Bank : भरती प्रक्रिया राबविणाऱ्या ‘नायबर’ या खासगी संस्थेने उत्तरपत्रिका स्वत:च्या कस्टडीत न ठेवता बँंकेत ठेवल्या. 

- सुधीर लंके 

राज्यातील जिल्हा सहकारी बॅंकांच्या नोकर भरतीत खासगी संस्थांची मदत घेतली जात असून, तेथेही घोटाळे झाल्याच्या तक्रारी आहेत. अहमदनगर, सांगली व सातारा येथील जिल्हा बँकांच्या भरतीबाबत अनेक आक्षेप घेतले गेले. मात्र, सहकार विभागाने पोलीस चौकशी न करता स्वत:च या घोटाळ्यांची तपासणी केली व त्यांना क्लिनचिट देण्याचा प्रयत्न केला.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ५६४ पदांसाठी २०१७ साली झालेल्या भरतीत मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालकांची मुले व नातेवाईकच निवड यादीत झळकले होेते.  ‘लोकमत’ने याचा भांडाफोड केल्यानंतर सहकार विभागाने या भरतीची चौकशी करुन ती फेब्रुवारी २०१८मध्ये रद्द केली. भरती प्रक्रिया राबविणाऱ्या ‘नायबर’ या खासगी संस्थेने उत्तरपत्रिका स्वत:च्या कस्टडीत न ठेवता बँंकेत ठेवल्या. 

अनेक उत्तरपत्रिकांत परीक्षेनंतर फेरफार झाला व सीसीटीव्ही बंद करुन त्या स्कॅन केल्या, नायबरने परस्पर अन्य एजन्सीची मदत घेतल्याची गंभीर बाब सहकार विभागाला चौकशीत आढळली. मात्र, भरतीतील काही उमेदवार औरंगाबाद खंडपीठात गेल्यानंतर न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व आर. जी. अवचट यांनी ५ एप्रिल २०१९ रोजी निकाल देताना चौकशी समितीला संशयास्पद आढळलेल्या ६४ उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्याचा आदेश दिला.

सहकार विभागाने या उत्तरपत्रिकांची तपासणी सरकारी फॉरेन्सिक एजन्सीकडून करणे अपेक्षित होते. मात्र, तत्कालीन सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी ती जयंत आहेर यांच्या खासगी एजन्सीकडून केली.  या एजन्सीने सर्व उत्तरपत्रिकांना क्लिनचीट दिल्याने सहकार विभाग सर्व भरती पुन्हा वैध ठरवून मोकळा झाला.  उत्तरपत्रिकांतील बदललेली शाई, कार्बन कॉपीतील फेरफार याची तपासणीच न करता सहकार विभागाने आपलाच पूर्वीचा अहवाल मोडीत काढला. 

मुख्य कार्यकारी अधिकारी व दोन संचालकांच्या नातेवाईकांच्या निवडीत हस्तक्षेप झाल्याचे सांगत तेवढ्या निवडी मात्र रद्द केल्या.विद्यमान सहकार आयुक्त अनिल कवडे यांनीही तक्रारींवर दोन वर्षे काहीच चौकशी केली नाही. जिल्ह्यातील नेतेही मौन बाळगून आहेत. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मुलाची निवड रद्द झाली असली, तरी बँकेने त्यांना नोकरीत कायम ठेवत निवृत्तीनंतर मुदतवाढ दिली आहे.

‘नायबर’ची नियुक्तीच बेकायदा- ‘सहकारी’ बँकाच्या भरतीबाबत धोरण ठरविण्यासाठी फडणवीस सरकारच्या काळात सहकार विभागाने ३० एप्रिल २०१६ रोजी ‘एसएलटीएफ’ उपसमितीचा अहवाल स्वीकारला. - या अहवालात ‘नायबर’सारख्या खासगी संस्था नियुक्त करुन भरती प्रक्रिया राबवा, असे म्हटले आहे.- ‘नायबर’ची नोंदणी ही कंपनी कायद्यांतर्गत नसून, धर्मादाय आयुक्त कायद्यांतर्गत आहे. त्यामुळे अशी संस्था भरती प्रक्रिया कशी राबवू शकते, हाच पेच आहे.- याबाबत ‘नाबार्ड’कडे तक्रार झाली असून, त्यांनी ती सहकार विभागाकडे चौकशीसाठी पाठवली आहे. सहकार विभाग मात्र काहीच चौकशी करायला तयार नाही.

टॅग्स :bankबँक