शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

जिल्हा बँकांची नोकर भरतीही सापडली संशयाच्या फेऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 09:27 IST

District Bank : भरती प्रक्रिया राबविणाऱ्या ‘नायबर’ या खासगी संस्थेने उत्तरपत्रिका स्वत:च्या कस्टडीत न ठेवता बँंकेत ठेवल्या. 

- सुधीर लंके 

राज्यातील जिल्हा सहकारी बॅंकांच्या नोकर भरतीत खासगी संस्थांची मदत घेतली जात असून, तेथेही घोटाळे झाल्याच्या तक्रारी आहेत. अहमदनगर, सांगली व सातारा येथील जिल्हा बँकांच्या भरतीबाबत अनेक आक्षेप घेतले गेले. मात्र, सहकार विभागाने पोलीस चौकशी न करता स्वत:च या घोटाळ्यांची तपासणी केली व त्यांना क्लिनचिट देण्याचा प्रयत्न केला.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ५६४ पदांसाठी २०१७ साली झालेल्या भरतीत मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालकांची मुले व नातेवाईकच निवड यादीत झळकले होेते.  ‘लोकमत’ने याचा भांडाफोड केल्यानंतर सहकार विभागाने या भरतीची चौकशी करुन ती फेब्रुवारी २०१८मध्ये रद्द केली. भरती प्रक्रिया राबविणाऱ्या ‘नायबर’ या खासगी संस्थेने उत्तरपत्रिका स्वत:च्या कस्टडीत न ठेवता बँंकेत ठेवल्या. 

अनेक उत्तरपत्रिकांत परीक्षेनंतर फेरफार झाला व सीसीटीव्ही बंद करुन त्या स्कॅन केल्या, नायबरने परस्पर अन्य एजन्सीची मदत घेतल्याची गंभीर बाब सहकार विभागाला चौकशीत आढळली. मात्र, भरतीतील काही उमेदवार औरंगाबाद खंडपीठात गेल्यानंतर न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व आर. जी. अवचट यांनी ५ एप्रिल २०१९ रोजी निकाल देताना चौकशी समितीला संशयास्पद आढळलेल्या ६४ उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्याचा आदेश दिला.

सहकार विभागाने या उत्तरपत्रिकांची तपासणी सरकारी फॉरेन्सिक एजन्सीकडून करणे अपेक्षित होते. मात्र, तत्कालीन सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी ती जयंत आहेर यांच्या खासगी एजन्सीकडून केली.  या एजन्सीने सर्व उत्तरपत्रिकांना क्लिनचीट दिल्याने सहकार विभाग सर्व भरती पुन्हा वैध ठरवून मोकळा झाला.  उत्तरपत्रिकांतील बदललेली शाई, कार्बन कॉपीतील फेरफार याची तपासणीच न करता सहकार विभागाने आपलाच पूर्वीचा अहवाल मोडीत काढला. 

मुख्य कार्यकारी अधिकारी व दोन संचालकांच्या नातेवाईकांच्या निवडीत हस्तक्षेप झाल्याचे सांगत तेवढ्या निवडी मात्र रद्द केल्या.विद्यमान सहकार आयुक्त अनिल कवडे यांनीही तक्रारींवर दोन वर्षे काहीच चौकशी केली नाही. जिल्ह्यातील नेतेही मौन बाळगून आहेत. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मुलाची निवड रद्द झाली असली, तरी बँकेने त्यांना नोकरीत कायम ठेवत निवृत्तीनंतर मुदतवाढ दिली आहे.

‘नायबर’ची नियुक्तीच बेकायदा- ‘सहकारी’ बँकाच्या भरतीबाबत धोरण ठरविण्यासाठी फडणवीस सरकारच्या काळात सहकार विभागाने ३० एप्रिल २०१६ रोजी ‘एसएलटीएफ’ उपसमितीचा अहवाल स्वीकारला. - या अहवालात ‘नायबर’सारख्या खासगी संस्था नियुक्त करुन भरती प्रक्रिया राबवा, असे म्हटले आहे.- ‘नायबर’ची नोंदणी ही कंपनी कायद्यांतर्गत नसून, धर्मादाय आयुक्त कायद्यांतर्गत आहे. त्यामुळे अशी संस्था भरती प्रक्रिया कशी राबवू शकते, हाच पेच आहे.- याबाबत ‘नाबार्ड’कडे तक्रार झाली असून, त्यांनी ती सहकार विभागाकडे चौकशीसाठी पाठवली आहे. सहकार विभाग मात्र काहीच चौकशी करायला तयार नाही.

टॅग्स :bankबँक