अंतिम टप्प्यातही विक्रमी मतदान

By Admin | Updated: May 12, 2014 21:49 IST2014-05-12T17:11:50+5:302014-05-12T21:49:33+5:30

लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये ८० टक्के, उत्तरप्रदेशमध्ये ५६ तर बिहारमध्ये ५४ टक्के मतदान पार पडले.

A record turnout in the final phase | अंतिम टप्प्यातही विक्रमी मतदान

अंतिम टप्प्यातही विक्रमी मतदान

>ऑनलाइन टीम 
नवी दिल्ली, दि. १२ - सोळाव्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा नववा व अंतिम टप्पाही भरघोस प्रतिसादात पार पडला. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले ते विक्रमी मतदान. यंदा नऊ टप्प्यांमध्ये एकूण ६६. ३८ मतदान झाले आहे.  
सोमवारी लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा होता. या टप्प्यात पश्चिम बंगाल, बिहार व उत्तर प्रदेशमधील ४१ जागांसाठी मतदान पार पडले. यात पश्चिम बंगालमध्ये ८० टक्के, उत्तरप्रदेशमध्ये ५६ तर बिहारमध्ये ५४ टक्के मतदान पार पडले. 

Web Title: A record turnout in the final phase