शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

ओबीसींना पदोन्नतीत आरक्षणाची शिफारस १५ वर्षांपासून धूळखात; आजच्या बैठकीकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 06:44 IST

मंत्रिमंडळ उपसमितीने केली होती शिफारस

ठळक मुद्दे२००४ मध्ये राज्य शासनाने एक कायदा करून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गास पदोन्नतीमध्ये आरक्षण दिले. २०१४ मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले आणि २०१९ मध्ये शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असे महाविकास आघाडीचे सरकार येऊनही ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण मिळाले नाही.पदोन्नतीतील आरक्षणाविरुद्ध याचिका करणारे राजेंद्र कोंढारे यांनी ७ मे रोजीचा आदेश कायम ठेवण्याची मागणी केली आहे.

यदु जोशीमुंबई :  राज्य सरकारी नाेकऱ्यांमध्ये इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) पदोन्नतीमध्ये १९ टक्के आरक्षण द्यावे, अशी शिफारस २००६ मध्ये मंत्रिमंडळ उपसमितीने केलेली होती; पण ती आजवर धूळखात पडली आहे. नंतरच्या कोणत्याही सरकारने त्यावर निर्णय घेतला नाही. तत्कालीन परिवहन मंत्री सुरूपसिंह नाईक यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने २००६ मध्ये राज्य मंत्रिमंडळाला अशी शिफारस केली होती की, ओबीसींना पदोन्नतीमध्ये १९ टक्के आरक्षण देण्यात यावे.

२००४ मध्ये राज्य शासनाने एक कायदा करून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गास पदोन्नतीमध्ये आरक्षण दिले. मात्र, ओबीसींना हे पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळाले नाही. तेव्हाचे सत्तारूढ पक्षांतील नेते (काँग्रेस-राष्ट्रवादी) आणि भाजपच्या नेत्यांनी ओबीसींनाही पदोन्नतीत आरक्षण देण्याची मागणी लावून धरल्यानंतर सुरूपसिंह नाईक यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली आणि या समितीने ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण देण्याची शिफारस स्पष्ट शब्दांत केली होती. त्यानंतर २००९ मध्ये पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आले. २०१४ मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले आणि २०१९ मध्ये शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असे महाविकास आघाडीचे सरकार येऊनही ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण मिळाले नाही.

...तर ओबीसींवर अन्याय  राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी ओबीसींना पदोन्नतीत आरक्षणाची मागणी केली. ओबीसी सोडून इतर सर्व मागासवर्गीयांना पदोन्नतीत आरक्षणाची भूमिका घेणे हा अन्याय असल्याचे ते म्हणाले.

आजच्या बैठकीकडे लक्षपदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या ७ मे रोजीच्या निर्णयासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी बैठक घेणार आहेत. पदोन्नतीत ३३ टक्के आरक्षण पूर्वीसारखे कायम ठेवणार की सर्व पदोन्नती या सेवाज्येष्ठतेनुसारच करण्याच्या निर्णयावर शासन ठाम राहणार, याबाबत उत्सुकता आहे. ७ मे रोजीचा आदेश तत्काळ रद्द करण्याची मागणी मागासवर्गीय संघटनांनी केली असून, या मागणीसाठी ते आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. पदोन्नतीतील आरक्षणाविरुद्ध याचिका करणारे राजेंद्र कोंढारे यांनी ७ मे रोजीचा आदेश कायम ठेवण्याची मागणी केली आहे.

अनुसूचित जाती-जमाती आदींना पदोन्नतीमध्ये दिलेले आरक्षण हायकोर्टाने रद्द ठरविले होते आणि प्रकरण आता सुप्रीम कोर्टात आहे. सरकारने ओबीसींनाही पदोन्नतीत आरक्षणाचा कायदा करावा आणि सर्व घटकांना आरक्षण मिळावे यासाठी भक्कमपणे बाजू मांडावी. - प्रा. हरी नरके, ज्येष्ठ विचारवंत

राज्य सरकारने ओबीसींची विभागणी करून व्हीजेएनटी, एसबीसींना पदोन्नतीत आरक्षण दिले; पण इतर ओबीसींना वंचित ठेवले. एका घटकाला देणे आणि दुसऱ्याला वंचित ठेवणे हे अन्यायकारक आहे. ओबीसींना तातडीने पदोन्नतीत आरक्षण दिले पाहिजे. - एकनाथ खडसे, माजी मंत्री, राष्ट्रवादीचे नेते

ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण देण्याची मागणी अतिशय रास्त आहे. सर्व मागासवर्गीयांना सारखाच न्याय लावायला हवा. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असताना एकूणच आरक्षणाचा विषय हा संयमाने आणि सर्वांशी चर्चा करून हाताळण्याची गरज आहे.- छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जाती