शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Indian sailors : इंडोनेशियाच्या समुद्रात अडकलेल्या भारतीय खलाशांसाठी आशेचा किरण, डीजी शिपिंगकडून दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 06:37 IST

Indian sailors : ‘एमटी स्ट्रोवोलोस’ हे जहाज वर्षभरापूर्वी आखातात तेल उत्खननासाठी गेले होते. परतताना चीनमध्ये कर्मचारी बदलले जाणार होते; परंतु भारतीय खलाशी असल्याने चीनने जहाजाला आपल्या हद्दीत प्रवेश दिला नाही.

मुंबई : तेल उत्खननासाठी गेलेले १३ भारतीय खलाशी इंडोनेशियाच्या समुद्रात अडकून पडले आहेत. सागरी हद्दीत विनापरवाना जहाज उभे करून प्रदूषण केल्याचा आरोप करीत इंडोनेशियाच्या इंटरपोलने त्यांना जहाजावर बंदिवान करून ठेवले आहे. त्यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. या सर्व खलाशांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला हस्तक्षेप करण्याची विनंती केल्याची माहिती जहाज बांधणी महासंचालनालयाकडून देण्यात आली.

‘एमटी स्ट्रोवोलोस’ हे जहाज वर्षभरापूर्वी आखातात तेल उत्खननासाठी गेले होते. परतताना चीनमध्ये कर्मचारी बदलले जाणार होते; परंतु भारतीय खलाशी असल्याने चीनने जहाजाला आपल्या हद्दीत प्रवेश दिला नाही. त्यामुळे थायलंडला जाऊन क्रू चेंज करायचा निर्णय घेण्यात आला; परंतु थायलंडलाही बर्थिंग न मिळाल्याने जहाज तिथून बायपास करून इंडोनेशियन सीमाक्षेत्रात आणण्यात आले. थायलंडने परवानगी दिल्यानंतर तिथे जाऊन क्रू चेंज करण्याचे ठरले; परंतु त्याआधीच इंडोनेशियन कोस्टगार्ड तेथे पोहोचले आणि त्यांनी जहाजाची तपासणी सुरू केली.

बरेच दिवस जहाज आमच्या सागरी हद्दीत उभे राहिल्यामुळे प्रदूषण झाल्याचा आरोप करीत कोस्टगार्डनी जहाजाच्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल केले. त्यानंतर इंडोनेशियन पोलिसांना यात सहभागी करून जहाजाचे कॅप्टन आणि मुख्य अभियंत्याला अटक केली. त्यांना चौकशीसाठी सोबत घेऊन गेले. त्यानंतर हे प्रकरण इंटरपोलकडे सोपविण्यात आले. इंटरपोलने जहाजावर बंदूकधारी सुरक्षारक्षक पाठवून सर्व कर्मचाऱ्यांना बंदिवासात ठेवले.

याप्रकरणात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. शिवाय इंडोनेशियातील भारतीय दूतावास आणि नौवहन मंत्रालय परस्पर समनव्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. सर्व खलाशांच्या सुटकेसाठी आम्ही उच्च स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती डीजी शिपिंगकडून देण्यात आली.

चूक कोणाची?‘क्रीस एनर्जी’ या कंपनीने बहरीनमध्ये नोंदणी केलेले इंधनवाहू जहाज भाडेतत्त्वावर घेतले. त्याची मूळ मालकी सिंगापूरमधील ‘वर्ल्ड टँकर मॅनेजमेंट’कडे आहे. मूळ मालक आणि चालक यांच्यातील वादामुळेच खलाशी अडकून पडले आहेत. त्यात १३ भारतीयांचा समावेश असून तीन महाराष्ट्रातील तर दोघे मुंबईचे तर एक जण रत्नागिरीचा असल्याचे ऑल इंडिया सिफेरर्स युनियनचे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे यांनी सांगितले.

हे खलाशी अडकलेनागनाथ हजारे, ऋषिकेश भोरे, आलोककुमार तांडेल, सर्फराज तेतावलवर, श्रीनिवास रावडा, सुभाष दत्ता, मोहसीन पठाण, भानू प्रताप, अरविंद सिंह, रामकृष्ण मोसा, निकोलास फर्नांडो, अनिकेत कुमार.

टॅग्स :Indonesiaइंडोनेशिया