शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

Indian sailors : इंडोनेशियाच्या समुद्रात अडकलेल्या भारतीय खलाशांसाठी आशेचा किरण, डीजी शिपिंगकडून दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 06:37 IST

Indian sailors : ‘एमटी स्ट्रोवोलोस’ हे जहाज वर्षभरापूर्वी आखातात तेल उत्खननासाठी गेले होते. परतताना चीनमध्ये कर्मचारी बदलले जाणार होते; परंतु भारतीय खलाशी असल्याने चीनने जहाजाला आपल्या हद्दीत प्रवेश दिला नाही.

मुंबई : तेल उत्खननासाठी गेलेले १३ भारतीय खलाशी इंडोनेशियाच्या समुद्रात अडकून पडले आहेत. सागरी हद्दीत विनापरवाना जहाज उभे करून प्रदूषण केल्याचा आरोप करीत इंडोनेशियाच्या इंटरपोलने त्यांना जहाजावर बंदिवान करून ठेवले आहे. त्यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. या सर्व खलाशांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला हस्तक्षेप करण्याची विनंती केल्याची माहिती जहाज बांधणी महासंचालनालयाकडून देण्यात आली.

‘एमटी स्ट्रोवोलोस’ हे जहाज वर्षभरापूर्वी आखातात तेल उत्खननासाठी गेले होते. परतताना चीनमध्ये कर्मचारी बदलले जाणार होते; परंतु भारतीय खलाशी असल्याने चीनने जहाजाला आपल्या हद्दीत प्रवेश दिला नाही. त्यामुळे थायलंडला जाऊन क्रू चेंज करायचा निर्णय घेण्यात आला; परंतु थायलंडलाही बर्थिंग न मिळाल्याने जहाज तिथून बायपास करून इंडोनेशियन सीमाक्षेत्रात आणण्यात आले. थायलंडने परवानगी दिल्यानंतर तिथे जाऊन क्रू चेंज करण्याचे ठरले; परंतु त्याआधीच इंडोनेशियन कोस्टगार्ड तेथे पोहोचले आणि त्यांनी जहाजाची तपासणी सुरू केली.

बरेच दिवस जहाज आमच्या सागरी हद्दीत उभे राहिल्यामुळे प्रदूषण झाल्याचा आरोप करीत कोस्टगार्डनी जहाजाच्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल केले. त्यानंतर इंडोनेशियन पोलिसांना यात सहभागी करून जहाजाचे कॅप्टन आणि मुख्य अभियंत्याला अटक केली. त्यांना चौकशीसाठी सोबत घेऊन गेले. त्यानंतर हे प्रकरण इंटरपोलकडे सोपविण्यात आले. इंटरपोलने जहाजावर बंदूकधारी सुरक्षारक्षक पाठवून सर्व कर्मचाऱ्यांना बंदिवासात ठेवले.

याप्रकरणात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. शिवाय इंडोनेशियातील भारतीय दूतावास आणि नौवहन मंत्रालय परस्पर समनव्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. सर्व खलाशांच्या सुटकेसाठी आम्ही उच्च स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती डीजी शिपिंगकडून देण्यात आली.

चूक कोणाची?‘क्रीस एनर्जी’ या कंपनीने बहरीनमध्ये नोंदणी केलेले इंधनवाहू जहाज भाडेतत्त्वावर घेतले. त्याची मूळ मालकी सिंगापूरमधील ‘वर्ल्ड टँकर मॅनेजमेंट’कडे आहे. मूळ मालक आणि चालक यांच्यातील वादामुळेच खलाशी अडकून पडले आहेत. त्यात १३ भारतीयांचा समावेश असून तीन महाराष्ट्रातील तर दोघे मुंबईचे तर एक जण रत्नागिरीचा असल्याचे ऑल इंडिया सिफेरर्स युनियनचे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे यांनी सांगितले.

हे खलाशी अडकलेनागनाथ हजारे, ऋषिकेश भोरे, आलोककुमार तांडेल, सर्फराज तेतावलवर, श्रीनिवास रावडा, सुभाष दत्ता, मोहसीन पठाण, भानू प्रताप, अरविंद सिंह, रामकृष्ण मोसा, निकोलास फर्नांडो, अनिकेत कुमार.

टॅग्स :Indonesiaइंडोनेशिया