शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

लोकसभेतल्या विजयानंतर शिंदेंच्या मतदारसंघावर राणेंचा दावा; उदय सामंत म्हणाले, "फडणवीसांकडे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 16:28 IST

पालकमंत्री असूनही उदय सामंत यांनी आघाडी मिळवून दिली नाही असा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला होता

Nilesh Rane VS Uday Samant : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे हे विजयी झाले आहेत. मात्र निकालावरुन राणे पुत्रांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. निलेश राणेंनी मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधु किरण सामंत यांच्याबाबत धक्कादायक विधान केले. किरण सामंत हे या निवडणुकीत उद्धव अन् रश्मी ठाकरेंना भेटले, असा मोठा दावा भाजपचे युवा नेते निलेश राणेंनी केला होता. तसेच पालकमंत्री असूनही उदय सामंत हे नारायण राणेंना आघाडी का मिळवून देऊ शकले नाहीत असाही सवाल निलेश राणे केला होता. आता राणेंच्या या प्रश्नाला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच निलेश राणे यांनी शिंदे गटाच्या मतदारसंघाबाबत केलेल्या विधानावरूनही उदय सामंत यांनी भाष्य केलं आहे.

खासदार नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी किरण सामंत यांच्यावर आरोप केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्यावरही जोरदार टीका केली. पालकमंत्री असूनही उदय सामंत हे नारायण राणेंना लीड का देऊ शकले नाहीत हे सांगावं. सामंत जे वागले ते आम्ही कधीही विसरणार नाही. आम्ही सर्व गोष्टी लक्षात ठेऊन आहोत, राणे कुणालाच माफ करत नाहीत असे म्हणत निलेश राणेंनी इशारा दिला होता.

"पालकमंत्री म्हणून त्यांनी जी डिलिव्हरी करायला हवी होती ती त्यांनी केली नाही. उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघात आम्ही मायनस आहोत. उदय सामंत यांनी लीड का दिलं नाही ते त्यांनी सांगावं. आम्ही रत्नागिरीमधून मताधिक्याची अपेक्षा ठेवली होती. उदय सामंत एक सिनियर लीडर आहेत, पण त्यांच्याकडून आम्हाला आकडे दिसले नाहीत," असं निलेश राणे यांनी म्हटलं होतं. 

दुसरीकडे नारायण राणे यांच्या विजयानंतर नितेश राणेंनी उदय सामंत यांच्‍या रत्‍नागिरी तसेच राजापूर विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितला होता. यापुढे जात निलेश राणेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत रत्नागिरी मतदारसंघाबाबत भाष्य केलं. "नितेशने फक्त राजापूर मतदार संघावर भाजपचा दावा सांगितला. माझं म्हणणं आहे रत्नागिरी विधानसभा मतदार संघ पण पारंपारिक भारतीय जनता पार्टीचा आहे तो आम्हाला परत मिळावा आणि तो आम्ही घेणार," असं विधान निलेश राणेंनी केलं होतं.

या सगळ्या प्रकारावरुन आता शिंदे गटाने संताप व्यक्त केला आहे. निलेश राणेंच्या आक्षेपाला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "आम्ही सगळ्यांनी मिळून नारायण राणे यांना ७५ हजार मतांपर्यंत पोहोचवले होते. हे नारायण राणे यांनाही माहिती आहे. त्यामुळे माझा रत्नागिरी मतदारसंघ भाजपसाठी मागणे किंवा माझ्यावर आक्षेप घेणे याची सगळी तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रालय आहे त्यातून त्यांनी माहिती घ्यावी. त्यातून उदय सामंत पालकमंत्री म्हणून कमी पडला असेल तर त्यांनी जाहीर करावे. लोकशाहीमध्ये कुठलाही मतदारसंघ मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळे निलेश राणेंना मतदारसंघ मागितला असेल," असे उदय सामंत यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Nilesh Raneनिलेश राणे Uday Samantउदय सामंतNitesh Raneनीतेश राणे