शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

राष्ट्रवादी मोदींच्या आॅपरेशन टेबलवर - प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 05:36 IST

काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सद्यस्थितीत कोमात गेले आहे. ते भाजपला विरोध करताना दिसत नाही. काँग्रेसचे नेते ‘पॅरालाइज’ (स्तंभित) झाल्याने या पक्षाला आता केवळ त्यांचे जिल्हाध्यक्ष तारु शकतात.

अहमदनगर : काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सद्यस्थितीत कोमात गेले आहे. ते भाजपला विरोध करताना दिसत नाही. काँग्रेसचे नेते ‘पॅरालाइज’ (स्तंभित) झाल्याने या पक्षाला आता केवळ त्यांचे जिल्हाध्यक्ष तारु शकतात. काँग्रेस स्वत: काही करत नसल्याने त्यांनी निदान डाव्यांच्या आंदोलनांना साथ द्यायला हवी. त्यातून भविष्यात काँग्रेसला फायदाच होईल, असे भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़भटक्या विमुक्तांच्या राज्यस्तरीय परिषदेसाठी आंबेडकर नगर जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन संपादकीय टीमशी संवाद साधला. ते म्हणाले, काँग्रेस नेतृत्वानेच आपल्या नेत्यांना शांत राहण्याचा आदेश दिला आहे की काय, अशी शंका वाटावी असे वातावरण आहे. चौकशीचा ससेमिरा पाठीशी लागण्याची भीती असल्यामुळे विरोधक म्हणून ते काहीच करत नाहीत. तर संपूर्ण राष्ट्रवादीच मोदींच्या ‘आॅपरेशन’ टेबलवर आहे. आॅपरेशन करुन हा पक्ष संपवायचा की जीवंत ठेवायचा हे मोदींच्या हातात आहे.त्यामुळे राष्टÑवादी भाजपविरोधात काहीच करु शकत नाही़ राज्यात भाजप विरोधात आघाडी उभी करण्याचा आमचा प्रयत्न राहील.राजू शेट्टींसह सर्वांचे यात स्वागत राहील. मात्र, शेट्टी भाजपशी पूर्ण काडीमोड घेणार की नाही हेअजून स्पष्ट नाही, असे आंबेडकर म्हणाले.चळवळीतूनच मिळेल पंतप्रधानपदाचा चेहराआत्ताच्या परिस्थितीत मोदींना सक्षम पर्र्याय देऊ शकेल, असा पंतप्रधान पदाचा चेहरा कुठल्याही पक्षाकडे नाही. नितीश कुमार यांची चर्चा होती, पण त्यांनी स्वत:ला त्यादृष्टीने कधीच तयार केले नव्हते. आता तर ते मोदींच्या तंबूत गेले आहेत. लालूप्रसाद निवडणूक लढवू शकत नाहीत. मायावती मोदींच्या विरोधात जातील, असे नाही. काँग्रेसकडेही सध्या हा चेहरा नाही. त्यामुळे पुढील दोन वर्षात जी जनआंदोलने उभी राहतील, त्यातूनच एखादा चेहरा समोर येईल. गुजरात निवडणुकीवर पुढील सर्व गणिते अवलंबून आहेत, असे भाकीत त्यांनी केले.सत्तेतील दलित नेत्यांचा समाजाला फायदा नाहीकेंद्रात रामदास आठवले यांना मंत्रिपद मिळून दलितांचा काहीही फायदा झालेला नाही. रा.सू. गवई, दादासाहेब रुपवते, सुशीलकुमार शिंदे सत्तेत होते. त्यामुळे दलित समाजाचा काय फायदा झाला? कोणी मंत्री झाला म्हणून समाज सुधारतो असे नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारBJPभाजपाNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी