शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: दानवेंचा दमदारपणा! जलआक्रोश मोर्चात गर्दीला आवरण्यासाठी स्वत: उतरले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 23:44 IST

औरंगाबादमधील धगधगत्या पाणी प्रश्नावर भाजपाच्या वतीनं आज जलआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महापालिकेवर धकड मोर्चा यावेळी काढण्यात आला.

औरंगाबाद-

औरंगाबादमधील धगधगत्या पाणी प्रश्नावर भाजपाच्या वतीनं आज जलआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महापालिकेवर धकड मोर्चा यावेळी काढण्यात आला. मोर्चात हजारोंची गर्दी पाहायला मिळाली. फडणवीसांनी औरंगाबादमधील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरुन ठाकरे सरकारला धारेवर धरलं. या मोर्चात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे देखील सहभागी झाले होते. त्यांनीही आपल्या छोटेखानी भाषणात ठाकरे सरकारला खडेबोल सुनावले. पण दानवेंनी या मोर्चात केलेल्या एका कृतीची देखील जोरदार चर्चा होऊ लागली आहे. 

"यांचे मंत्री जेलात अन् मुख्यमंत्री घरात", रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

त्याचं झालं असं की जलआक्रोश मोर्चात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. फडणवीस, दानवे आणि भाजपाचे प्रमुख नेते एका ओपन कारमधून मार्गस्थ होत होते. पण कारच्या समोरच कार्यकर्ते गर्दी करु लागल्यानं मोर्चा पुढे सरकत नव्हता. पोलीसही कार्यकर्त्यांना पुढे सरकण्याचं आवाहन करत होते. पण ते काही ऐकेनात. मग रावसाहेब दानवेच कारमधून खाली उतरले, हातात एक भाजपाचा झेंडा घेतला आणि झेंड्याच्या काठीनं गर्दीला कारच्या समोरुन दूर लोटू लागले. दानवेंच्या या दमदारपणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

दानवेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोलसभेला संबोधित करताना रावसाहेब दानवेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारचे नवीन नामकरणही केले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला दानवे म्हणाले की, "पाणी मिळता का..?किती दिवसाला मिळतं..?" यावर लोकांनी आठ दिवसाला मिळतं, असे सांगितलं. त्यानंतर रावसाहेब दानवेंनी या सरकारचं नवं नाव 'जुम्मे के जुम्मे' सरकार ठेवलं. दानवे म्हणाले की, "हे सरकार अमर, अकबर आणि अँथनीचं सरकार आहे. हे सरकार कधीच सोबत बसत नाहीत, जनतेच्या हिताचा निर्णय घेत नाही. राज्यातला कोणता प्रश्नही सोडवत नाही. यांना जे जमत नाही, त्याचं खापर केंद्रावर फोडतात." 

"हे तर जुम्मे के जुम्मे सरकार...", रावसाहेब दानवेंकडून सरकारचं नामकरण

"शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठा आहे. आमच्या सरकारच्या काळात समांतर पाणी पुरवठा योजना मान्य झाली होती. ही योजना यांच्या भानगडीमुळे बंद झाली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अतुल सावे, हरीभाऊ बागडे यांनी 1680 कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर करुन घेतली. सरकार बदलले, युती भाजप सेनेची होती आणि या लोकांनी दुसऱ्याशी संगनमत केलं.  लोकांनी आम्हाला मतदान केलं, पण आमची मतं चोरीला गेली. चोर सापडला, पण चोराला शिक्षा आता सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात द्यायची आहे. याची सुनावणी तुमच्या दराबारात सुरू आहे," असंही दानवे म्हणाले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद