शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी, मध्यस्थ अन् टक्केवारीलाच सरकारचे प्राधान्य; केशव उपाध्ये यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 10:56 IST

जनहिताची कामे कधी करणार?, सरकारला सवाल.

नारायण जाधवजागतिकीकरणाच्या स्पर्धेत अनेक नामांकित अर्थसंस्था अर्थपुरवठा करण्यासाठी बाजारात उपलब्ध असतांना एमएमआरडीएने ६० हजार कोटींच्या कर्जासाठी मध्यस्थाला १२० कोटींची दलाली देण्याचा ठराव मंजूर करणे धक्कादायक आहे. तसेही महाविकास सरकारनेे जनहिताच्या कामांऐवजी खंडणी, टक्केवारीलाच प्राधान्य दिल्याचे त्यांच्या आतापर्यंतच्या कारभारावरून दिसत आहे, अशी खरमरीत टीका भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. भाजप हा विषय लावून धरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘६० हजार कोटींच्या कर्जासाठी १२० दलाली’ या मथळ्याखालील ठळक वृत्त ‘लोकमत’ने १७ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध करताच त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या कर्जासाठी एमएमआरडीएने मध्यस्थ म्हणून एसबीआय कॅपिटल लिमिटेडची नियुक्ती करून त्यांना एकूण कर्जाच्या ०.२० टक्के सल्लागार शुल्क देण्याचे निश्चित केले आहे. ही रक्कम १२० कोटींच्या घरात  जाते. एमएमआरडीएच्या या निर्णयाचा निषेध करून भाजपने थेट महाविकास आघाडी सरकारवरच निशाणा साधला आहे. 

राज्यात सत्तेवर आल्यापासून महाविकास आघाडी सरकार हे खंडणी, टक्केवारी आणि मध्यस्थ नेमण्यासाठीच बदनाम असल्याचे महाराष्ट्रातील जनतेला दिसून आहे. दुष्काळ, आरक्षणासह इतर जनहिताच्या कामांना त्यांनी प्राधान्य दिलेले नाही.

कर्जासाठी मध्यस्थ नेमण्याचे कारण काय?आताही जागतिक व्यासपीठावर बाजारात अनेक बँक, संस्था अर्थपुरवठा करण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे ६० हजार कोटींचे कर्ज उभे करण्यासाठी मध्यस्थ नेमण्याचे कारण काय, देकार का मागविले नाहीत, असे प्रश्न उपाध्ये यांनी विचारले आहेत. अशाप्रकारे मध्यस्थ नेमून जनेतच्या पैशांची अशी लूट करण्यापेक्षा जनहिताच्या कामांना प्राधान्य द्यावे, असा टोला त्यांनी लगावला  आहे.

टॅग्स :mmrdaएमएमआरडीएMahavikas Aghadiमहाविकास आघाडी