शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

खंडणी, मध्यस्थ अन् टक्केवारीलाच सरकारचे प्राधान्य; केशव उपाध्ये यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 10:56 IST

जनहिताची कामे कधी करणार?, सरकारला सवाल.

नारायण जाधवजागतिकीकरणाच्या स्पर्धेत अनेक नामांकित अर्थसंस्था अर्थपुरवठा करण्यासाठी बाजारात उपलब्ध असतांना एमएमआरडीएने ६० हजार कोटींच्या कर्जासाठी मध्यस्थाला १२० कोटींची दलाली देण्याचा ठराव मंजूर करणे धक्कादायक आहे. तसेही महाविकास सरकारनेे जनहिताच्या कामांऐवजी खंडणी, टक्केवारीलाच प्राधान्य दिल्याचे त्यांच्या आतापर्यंतच्या कारभारावरून दिसत आहे, अशी खरमरीत टीका भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. भाजप हा विषय लावून धरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘६० हजार कोटींच्या कर्जासाठी १२० दलाली’ या मथळ्याखालील ठळक वृत्त ‘लोकमत’ने १७ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध करताच त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या कर्जासाठी एमएमआरडीएने मध्यस्थ म्हणून एसबीआय कॅपिटल लिमिटेडची नियुक्ती करून त्यांना एकूण कर्जाच्या ०.२० टक्के सल्लागार शुल्क देण्याचे निश्चित केले आहे. ही रक्कम १२० कोटींच्या घरात  जाते. एमएमआरडीएच्या या निर्णयाचा निषेध करून भाजपने थेट महाविकास आघाडी सरकारवरच निशाणा साधला आहे. 

राज्यात सत्तेवर आल्यापासून महाविकास आघाडी सरकार हे खंडणी, टक्केवारी आणि मध्यस्थ नेमण्यासाठीच बदनाम असल्याचे महाराष्ट्रातील जनतेला दिसून आहे. दुष्काळ, आरक्षणासह इतर जनहिताच्या कामांना त्यांनी प्राधान्य दिलेले नाही.

कर्जासाठी मध्यस्थ नेमण्याचे कारण काय?आताही जागतिक व्यासपीठावर बाजारात अनेक बँक, संस्था अर्थपुरवठा करण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे ६० हजार कोटींचे कर्ज उभे करण्यासाठी मध्यस्थ नेमण्याचे कारण काय, देकार का मागविले नाहीत, असे प्रश्न उपाध्ये यांनी विचारले आहेत. अशाप्रकारे मध्यस्थ नेमून जनेतच्या पैशांची अशी लूट करण्यापेक्षा जनहिताच्या कामांना प्राधान्य द्यावे, असा टोला त्यांनी लगावला  आहे.

टॅग्स :mmrdaएमएमआरडीएMahavikas Aghadiमहाविकास आघाडी