शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

राणेंची बोळवण दुय्यम खात्यावर!, मंत्रिमंडळ विस्तार दिवाळीनंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 05:54 IST

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार दिवाळीनंतर होणार असून नव्या पक्षाची स्थापना केलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मंत्रिमंडळ समावेश निश्चित झाला आहे.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार दिवाळीनंतर होणार असून नव्या पक्षाची स्थापना केलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मंत्रिमंडळ समावेश निश्चित झाला आहे. मात्र, त्यांना दुय्यम खात्यावरच समाधान मानावे लागेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.गृह, नगरविकास, महसूल, सार्वजनिक बांधकाम, वित्त ही महत्त्वाची खाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आहेत. यापैकी कोणतेही खाते राणे यांना मिळण्याची शक्यता नाही. चंद्रकांत पाटील यांचे मंत्रिमंडळातील ‘नंबर टू’ हे स्थान कायम राहील, असे सूत्रांनी सांगितले. ‘माजी मुख्यमंत्री असल्याने, व याआधी महसूलसारखे महत्त्वाचे खाते सांभाळल्याने आपल्या दर्जाला साजेल, असे मंत्रिपद दिले जावे’, असा राणे यांचा आग्रह आहे. तथापि, त्यांना राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या पहिल्या पाच खात्यांपैकी कोणतेही खाते दिले जाणार नाही, असे समजते.शिक्षण खात्याबाबत तक्रारीमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे शिक्षण खात्याच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी आल्या असून त्यांची नोंदही त्यांनी घेतली आहे. त्यामुळे विस्तारामध्ये विनोद तावडेंचे शिक्षण मंत्रीपद काढून त्यांच्याकडे दुसरे महत्त्वाचे खाते दिले जाऊ शकते.मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावामुख्यमंत्री फडणवीस मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेत आहेत. ३१ आॅक्टोबरला त्यांच्या सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असून त्या निमित्त त्यांनी प्रत्येक मंत्र्याकडून अहवाल मागविला आहे. मंत्रिमंडळ फेरबदलात मंत्र्यांची कामगिरी हा महत्त्वाचा निकष असेल.मुख्यमंत्री स्वीडनला जाणारमुख्यमंत्री फडणवीस हे १० ते १४ आॅक्टोबरदरम्यान स्वीडनला जाणार आहेत. तेथील ‘मेक इन इंडिया’ परिषदेत ते सहभागी होणार असून महाराष्ट्रात गुंतवणुकीसंदर्भात विविध कंपन्यांच्या प्रमुखांशी ते चर्चा करतील.राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सरकारची कोंडी करतील, असे म्हटले जात असले तरी तसे होण्याची शक्यता नाही. या बाबीची कल्पना आल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावरील टीका तीव्र केली असल्याचे मानले जाते.सरकारच्या स्थैर्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस निर्धास्त आहेत. अगदीच परिस्थिती निर्माण झाली तर इतर पक्षांमधील २५ ते ३० आमदार भाजपात येतील या बाबत त्यांना विश्वास आहे. मात्र तशी वेळ येणार नाही आणि सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, या बाबत मुख्यमंत्री निश्चिंत असल्याचे म्हटले जाते.

टॅग्स :BJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNarayan Raneनारायण राणे