शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नाने राणा जगजीतसिंह घायाळ; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 12:53 IST

भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील हे सोमवारी आपल्या मतदारसंघातील धनगरवाडी येथे गावांतर्गत रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमाला गेले होते.

मुंबई : नवनिर्वाचित आमदारांना मतदारसंघात फिरताना आता लोकं विकास कामांबद्दल विचारणा करू लागले आहे. मात्र राज्यात सरकारचं अस्तित्वात नसल्याने या आमदारांची उत्तर देताना अडचण होत आहे. असेच काही तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यासोबत घडताना पाहायला मिळाले. मतदारसंघात रस्त्याच्या भूमिपूजनासाठी गेले असताना त्यांना एका तरुणाने सुशिक्षित बेरोजगारांचे काय असा प्रश्न विचारला. मात्र आपलं सरकार तर येऊ द्या असे म्हणत त्यांनी गावकऱ्यांसमोर भविष्यात केल्या जाणाऱ्या कामांचा पाडाच वाचवून दाखवला.

विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी व उमेदवारांनी मतदारांना विविध आश्वासने दिली होती. त्यामुळे निवडून आलेल्या आमदारांना लोकं दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत आहे. मात्र राज्यात सरकारच अस्तित्वात नसल्याने विकास कामे कशी करायची असा प्रश्न या आमदारांना पडला आहे. त्यामुळे मतदारसंघात फिरताना नागरिकांना काय उत्तर द्यावे असा प्रश्न या आमदारांना पडत आहे.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील हे सोमवारी आपल्या मतदारसंघातील धनगरवाडी येथे गावांतर्गत रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमाला गेले होते. त्यांचे भाषण सुरू असतानाच तिथे उपस्थित असलेल्या एका तरुणाने तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार हे काम नसल्याने दुसऱ्या जिल्ह्यात जात असल्याचा मुद्दा मांडला. तसेच त्यांना रोजगार देण्यासाठी काही ठोस पाऊले उचलली जातील का ? असा प्रश्न उपस्थित केला.

तर तरुणांने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राणा जगजीतसिंह म्हणाले की, आधी यासाठी आपले सरकार तर येऊ द्या. तसेच मतदारसंघात असलेला साखर कारखाना,खताचा कारखानात सुरू करण्याचे प्रयत्न आपण करणार आहे. त्याचबरोबर एमआयडीसीसाठी जमीन घेऊन विकसित करण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले असल्याचे म्हणत त्यांनी आश्वासनाचा पाऊस पाडला. मात्र तरुणाने विचारलेल्या बेरोजगारांच्या प्रश्नाने राणा जगजीतसिंह घायाळ झाल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.