शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नाने राणा जगजीतसिंह घायाळ; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 12:53 IST

भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील हे सोमवारी आपल्या मतदारसंघातील धनगरवाडी येथे गावांतर्गत रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमाला गेले होते.

मुंबई : नवनिर्वाचित आमदारांना मतदारसंघात फिरताना आता लोकं विकास कामांबद्दल विचारणा करू लागले आहे. मात्र राज्यात सरकारचं अस्तित्वात नसल्याने या आमदारांची उत्तर देताना अडचण होत आहे. असेच काही तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यासोबत घडताना पाहायला मिळाले. मतदारसंघात रस्त्याच्या भूमिपूजनासाठी गेले असताना त्यांना एका तरुणाने सुशिक्षित बेरोजगारांचे काय असा प्रश्न विचारला. मात्र आपलं सरकार तर येऊ द्या असे म्हणत त्यांनी गावकऱ्यांसमोर भविष्यात केल्या जाणाऱ्या कामांचा पाडाच वाचवून दाखवला.

विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी व उमेदवारांनी मतदारांना विविध आश्वासने दिली होती. त्यामुळे निवडून आलेल्या आमदारांना लोकं दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत आहे. मात्र राज्यात सरकारच अस्तित्वात नसल्याने विकास कामे कशी करायची असा प्रश्न या आमदारांना पडला आहे. त्यामुळे मतदारसंघात फिरताना नागरिकांना काय उत्तर द्यावे असा प्रश्न या आमदारांना पडत आहे.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील हे सोमवारी आपल्या मतदारसंघातील धनगरवाडी येथे गावांतर्गत रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमाला गेले होते. त्यांचे भाषण सुरू असतानाच तिथे उपस्थित असलेल्या एका तरुणाने तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार हे काम नसल्याने दुसऱ्या जिल्ह्यात जात असल्याचा मुद्दा मांडला. तसेच त्यांना रोजगार देण्यासाठी काही ठोस पाऊले उचलली जातील का ? असा प्रश्न उपस्थित केला.

तर तरुणांने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राणा जगजीतसिंह म्हणाले की, आधी यासाठी आपले सरकार तर येऊ द्या. तसेच मतदारसंघात असलेला साखर कारखाना,खताचा कारखानात सुरू करण्याचे प्रयत्न आपण करणार आहे. त्याचबरोबर एमआयडीसीसाठी जमीन घेऊन विकसित करण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले असल्याचे म्हणत त्यांनी आश्वासनाचा पाऊस पाडला. मात्र तरुणाने विचारलेल्या बेरोजगारांच्या प्रश्नाने राणा जगजीतसिंह घायाळ झाल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.