शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नाने राणा जगजीतसिंह घायाळ; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 12:53 IST

भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील हे सोमवारी आपल्या मतदारसंघातील धनगरवाडी येथे गावांतर्गत रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमाला गेले होते.

मुंबई : नवनिर्वाचित आमदारांना मतदारसंघात फिरताना आता लोकं विकास कामांबद्दल विचारणा करू लागले आहे. मात्र राज्यात सरकारचं अस्तित्वात नसल्याने या आमदारांची उत्तर देताना अडचण होत आहे. असेच काही तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यासोबत घडताना पाहायला मिळाले. मतदारसंघात रस्त्याच्या भूमिपूजनासाठी गेले असताना त्यांना एका तरुणाने सुशिक्षित बेरोजगारांचे काय असा प्रश्न विचारला. मात्र आपलं सरकार तर येऊ द्या असे म्हणत त्यांनी गावकऱ्यांसमोर भविष्यात केल्या जाणाऱ्या कामांचा पाडाच वाचवून दाखवला.

विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी व उमेदवारांनी मतदारांना विविध आश्वासने दिली होती. त्यामुळे निवडून आलेल्या आमदारांना लोकं दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत आहे. मात्र राज्यात सरकारच अस्तित्वात नसल्याने विकास कामे कशी करायची असा प्रश्न या आमदारांना पडला आहे. त्यामुळे मतदारसंघात फिरताना नागरिकांना काय उत्तर द्यावे असा प्रश्न या आमदारांना पडत आहे.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील हे सोमवारी आपल्या मतदारसंघातील धनगरवाडी येथे गावांतर्गत रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमाला गेले होते. त्यांचे भाषण सुरू असतानाच तिथे उपस्थित असलेल्या एका तरुणाने तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार हे काम नसल्याने दुसऱ्या जिल्ह्यात जात असल्याचा मुद्दा मांडला. तसेच त्यांना रोजगार देण्यासाठी काही ठोस पाऊले उचलली जातील का ? असा प्रश्न उपस्थित केला.

तर तरुणांने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राणा जगजीतसिंह म्हणाले की, आधी यासाठी आपले सरकार तर येऊ द्या. तसेच मतदारसंघात असलेला साखर कारखाना,खताचा कारखानात सुरू करण्याचे प्रयत्न आपण करणार आहे. त्याचबरोबर एमआयडीसीसाठी जमीन घेऊन विकसित करण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले असल्याचे म्हणत त्यांनी आश्वासनाचा पाऊस पाडला. मात्र तरुणाने विचारलेल्या बेरोजगारांच्या प्रश्नाने राणा जगजीतसिंह घायाळ झाल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.