शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राणा दांपत्याला हवंय युतीचं सरकार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 19:30 IST

आधी पती रवी राणा आणि आता खासदार नवनीत राणा देखील युती सरकारसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांच्या या भूमिकेचे कारण काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

मुंबई - अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देत भाजपच्या बाजुने बोलण्यास सुरुवात केली होती. आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर खासदार झालेल्या नवनीत राणा यांना देखील राज्यात युतीचं सरकार हवंय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

आमदार रवी राणा निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच भाजपशी जवळीक साधत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान करावे, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यातच त्यांनी शिवसेनेचे 20 ते 25 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले होते. मात्र भाजपच सत्तेपासून दूर राहणार यामुळे राणा यांची गोची झाली आहे. 

दरम्यान शिवसेनेच्या समसमान वाटपाच्या मागणीमुळे युती फिस्कटली असून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असं सरकार सत्तेत येण्याची शक्यता आहे. यामुळेच  राज्यात वेळेत सरकार स्थापन होऊ शकले नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. 

अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी राज्यातील राष्ट्रपती राजवटीसाठी शिवसेनेला जबाबदार धरले आहे. शिवसेनेच्या भूमिकेमुळे राज्यात युतीचे सरकार स्थापन होऊ शकले नाही. परिणामी शेतकऱ्यांना मदत पोहोचविण्यास उशीर होत असल्याचं त्यांनी म्हटले आहे. राणा यांच्या युती सरकारसाठीच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आधी पती रवी राणा आणि आता खासदार नवनीत राणा देखील युती सरकारसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांच्या या भूमिकेचे कारण काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.