शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

राणा दांपत्याला हवंय युतीचं सरकार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 19:30 IST

आधी पती रवी राणा आणि आता खासदार नवनीत राणा देखील युती सरकारसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांच्या या भूमिकेचे कारण काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

मुंबई - अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देत भाजपच्या बाजुने बोलण्यास सुरुवात केली होती. आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर खासदार झालेल्या नवनीत राणा यांना देखील राज्यात युतीचं सरकार हवंय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

आमदार रवी राणा निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच भाजपशी जवळीक साधत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान करावे, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यातच त्यांनी शिवसेनेचे 20 ते 25 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले होते. मात्र भाजपच सत्तेपासून दूर राहणार यामुळे राणा यांची गोची झाली आहे. 

दरम्यान शिवसेनेच्या समसमान वाटपाच्या मागणीमुळे युती फिस्कटली असून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असं सरकार सत्तेत येण्याची शक्यता आहे. यामुळेच  राज्यात वेळेत सरकार स्थापन होऊ शकले नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. 

अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी राज्यातील राष्ट्रपती राजवटीसाठी शिवसेनेला जबाबदार धरले आहे. शिवसेनेच्या भूमिकेमुळे राज्यात युतीचे सरकार स्थापन होऊ शकले नाही. परिणामी शेतकऱ्यांना मदत पोहोचविण्यास उशीर होत असल्याचं त्यांनी म्हटले आहे. राणा यांच्या युती सरकारसाठीच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आधी पती रवी राणा आणि आता खासदार नवनीत राणा देखील युती सरकारसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांच्या या भूमिकेचे कारण काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.