शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

जी काही अक्कल आहे ती ठाकरेंकडेच, आम्ही सगळे बेअक्कल; रामदास कदमांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 11:47 IST

बाळासाहेबांचे विचार, पक्ष संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या मांडीवर बसून केले असं कदमांनी म्हटलं.

रत्नागिरी - बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरेंनंतर आदित्य ठाकरे आणि त्याच्यानंतर लहान भाऊ तेजस ठाकरे. जी काही अक्कल आहे ती ठाकरेंनाच आहे. आम्ही सगळे बेअक्कल आहोत. बाळासाहेब आमच्यासाठी देव होते. त्यांनी शून्यातून आम्हाला उभे केले. आम्हाला बाळासाहेबांनी घडवलं. बाळासाहेबांनी जी शिवसेना मराठी माणसांच्या न्यायहक्कासाठी उभी केली. हिंदुत्व जपलं. ते हिंदुत्व आणि बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर गहाण ठेवली. खरी गद्दारी त्यांनी केली असा हल्लाबोल बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. 

रामदास कदम म्हणाले की, नागपूरच्या अधिवेशनात जयंत पाटील स्पष्टच बोलले. ही राष्ट्रवादीची शिवसेना आहे. मनात जे होते ते ओठांवर आले. बाळासाहेबांचे विचार, पक्ष संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या मांडीवर बसून केले. गद्दारी ही उद्धव ठाकरेंनी केली. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी उद्धव ठाकरेंनी केली. आम्ही भाजपात जाणार असं म्हटलं जातं. परंतु आजच सांगतो मरेपर्यंत आम्ही भगवा झेंडा सोडणार नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिले. 

धनुष्यबाण आम्हालाच मिळेलकाँग्रेसची बैलजोडी, गाय-वासरू याबाबत जे निकाल लागलेत. त्यात जे निकष लागले त्याप्रमाणे एकनाथ शिंदेंना न्याय मिळेल. खरी शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदेंनाच मिळेल. एकूण आमदार किती? एका आमदाराला, खासदाराला मिळालेली मते अशी मोजली जातात. शिंदेंसोबत ५० आमदार आणि १३ खासदार आहेत. ठाकरेंकडे १४ आमदार आहेत. नियमानुसार एकनाथ शिंदे यांनाच धनुष्यबाण मिळेल यावर शिक्कामोर्तब झालं पाहिजे असं मला वाटतं असं रामदास कदमांनी म्हटलं. 

अनिल परब बोगस वकीलसंजय राऊत सकाळपासून रात्रीपर्यंत ठाकरेंची बाजू मांडण्यासाठी संघर्ष करतायेत. त्यांच्यावर अधिक बोलणार नाही. १४ तारखेला निकाल लागेल तेव्हा उद्धव ठाकरेंच्या लक्षात येईल. त्यांच्या आजुबाजूला ते अनिल परबसारखे वकील आहेत ते त्यांना कसं फसवतायेत हे लक्षात येईल. आमचा पक्ष बाळासाहेबांचा आहे. त्यांचा पक्ष वेगळा आहे. आमची घटना झालेली आहे. नियमाप्रमाणे आमचं काम सुरू आहे. आम्ही गाफील नाही. कायदेशीर सर्व बाबी पूर्ण केल्या. आमच्याकडे अनिल परब यांच्यासारखे बोगस वकील नाहीत असं सांगत कदमांनी अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला. 

आमदार नाराज नाहीत, जनता खुश आहे प्रत्येक आमदाराला वाटतं मंत्री झालं पाहिजे. ते स्वाभाविक असते. आमच्याकडे कुणी नाराज नाही. फक्त मंत्रिपद मिळावे म्हणूनच आले असं नाही. प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात विकासाचं ध्येय एकनाथ शिंदेंनी ठेवले आहे. कुठल्याही आमदाराला मी पडू देणार नाही. त्यांच्या मतदारसंघात विकासकामांसाठी जे काही खोके द्यायचे आहेत ते सगळे देईन असं आहे. मविआ काळात शिवसेना आमदारांना निधी मिळत नव्हता. म्हणून आमदार नाखुश होते. आता विकासकामाला सुरुवात झालीय. त्यामुळे जनता खुश आहे असं सांगत मंत्रिमंडळ विस्तारावर रामदास कदमांनी भाष्य केले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRamdas Kadamरामदास कदमEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना