शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

जी काही अक्कल आहे ती ठाकरेंकडेच, आम्ही सगळे बेअक्कल; रामदास कदमांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 11:47 IST

बाळासाहेबांचे विचार, पक्ष संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या मांडीवर बसून केले असं कदमांनी म्हटलं.

रत्नागिरी - बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरेंनंतर आदित्य ठाकरे आणि त्याच्यानंतर लहान भाऊ तेजस ठाकरे. जी काही अक्कल आहे ती ठाकरेंनाच आहे. आम्ही सगळे बेअक्कल आहोत. बाळासाहेब आमच्यासाठी देव होते. त्यांनी शून्यातून आम्हाला उभे केले. आम्हाला बाळासाहेबांनी घडवलं. बाळासाहेबांनी जी शिवसेना मराठी माणसांच्या न्यायहक्कासाठी उभी केली. हिंदुत्व जपलं. ते हिंदुत्व आणि बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर गहाण ठेवली. खरी गद्दारी त्यांनी केली असा हल्लाबोल बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. 

रामदास कदम म्हणाले की, नागपूरच्या अधिवेशनात जयंत पाटील स्पष्टच बोलले. ही राष्ट्रवादीची शिवसेना आहे. मनात जे होते ते ओठांवर आले. बाळासाहेबांचे विचार, पक्ष संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या मांडीवर बसून केले. गद्दारी ही उद्धव ठाकरेंनी केली. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी उद्धव ठाकरेंनी केली. आम्ही भाजपात जाणार असं म्हटलं जातं. परंतु आजच सांगतो मरेपर्यंत आम्ही भगवा झेंडा सोडणार नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिले. 

धनुष्यबाण आम्हालाच मिळेलकाँग्रेसची बैलजोडी, गाय-वासरू याबाबत जे निकाल लागलेत. त्यात जे निकष लागले त्याप्रमाणे एकनाथ शिंदेंना न्याय मिळेल. खरी शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदेंनाच मिळेल. एकूण आमदार किती? एका आमदाराला, खासदाराला मिळालेली मते अशी मोजली जातात. शिंदेंसोबत ५० आमदार आणि १३ खासदार आहेत. ठाकरेंकडे १४ आमदार आहेत. नियमानुसार एकनाथ शिंदे यांनाच धनुष्यबाण मिळेल यावर शिक्कामोर्तब झालं पाहिजे असं मला वाटतं असं रामदास कदमांनी म्हटलं. 

अनिल परब बोगस वकीलसंजय राऊत सकाळपासून रात्रीपर्यंत ठाकरेंची बाजू मांडण्यासाठी संघर्ष करतायेत. त्यांच्यावर अधिक बोलणार नाही. १४ तारखेला निकाल लागेल तेव्हा उद्धव ठाकरेंच्या लक्षात येईल. त्यांच्या आजुबाजूला ते अनिल परबसारखे वकील आहेत ते त्यांना कसं फसवतायेत हे लक्षात येईल. आमचा पक्ष बाळासाहेबांचा आहे. त्यांचा पक्ष वेगळा आहे. आमची घटना झालेली आहे. नियमाप्रमाणे आमचं काम सुरू आहे. आम्ही गाफील नाही. कायदेशीर सर्व बाबी पूर्ण केल्या. आमच्याकडे अनिल परब यांच्यासारखे बोगस वकील नाहीत असं सांगत कदमांनी अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला. 

आमदार नाराज नाहीत, जनता खुश आहे प्रत्येक आमदाराला वाटतं मंत्री झालं पाहिजे. ते स्वाभाविक असते. आमच्याकडे कुणी नाराज नाही. फक्त मंत्रिपद मिळावे म्हणूनच आले असं नाही. प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात विकासाचं ध्येय एकनाथ शिंदेंनी ठेवले आहे. कुठल्याही आमदाराला मी पडू देणार नाही. त्यांच्या मतदारसंघात विकासकामांसाठी जे काही खोके द्यायचे आहेत ते सगळे देईन असं आहे. मविआ काळात शिवसेना आमदारांना निधी मिळत नव्हता. म्हणून आमदार नाखुश होते. आता विकासकामाला सुरुवात झालीय. त्यामुळे जनता खुश आहे असं सांगत मंत्रिमंडळ विस्तारावर रामदास कदमांनी भाष्य केले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRamdas Kadamरामदास कदमEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना