शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

शरद पवारांनी शिवसेना फोडली, उद्धवजींनी आत्मपरीक्षण करावे: रामदास कदम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 05:39 IST

शिवसेनेच्या आजच्या परिस्थितीला शरद पवार आणि अजित पवार हे नेते जबाबदार असल्याची टीका करत याबाबत उद्धव ठाकरेंनी यांनी आत्मपरीक्षण करावे, असे मत रामदास कदम यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेनेच्या आजच्या परिस्थितीला शरद पवार आणि अजित पवार हे नेते जबाबदार असल्याची टीका करतानाच शिवसेनेच्या आजच्या स्थितीबाबत उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे, असे मत माजी मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले. ते वृत्त वाहिन्यांशी बोलत होते.

मी ५० वर्षे शिवसेनेत झिजलो, ज्यांच्यासाठी एवढे केले त्यांनीच माझी हकालपट्टी केली. उद्धव साहेब... तुम्ही आणखी किती जणांची हकालपट्टी करणार आहात, तुम्हाला मातोश्रीवर बसून तेवढेच काम उरले आहे. शरद पवार शिवसेना फोडण्यात यशस्वी झाले. बाळासाहेब असताना जे शरद पवारांना जमले नाही ते पवारांनी उद्धवजींनासोबत घेऊन केले आणि डाव साधला. नशीब अडीच वर्षांत हे थांबले, पाच वर्षांत शिवसेना पूर्णच संपली असती, असे कदम म्हणाले.  

बंडखोर आमदारांनी शिवसेना फोडली. मातोश्रीला दगाफटका केला. ठाकरे कुटुंबीयांचा विश्वासघात केला आणि स्वत:च्या कृतीला योग्य आहे हे दाखविण्यासाठी त्याचे खापर राष्ट्रवादीच्या माथ्यावर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न रामदास कदम आणि काही बंडखोर नेते करीत आहेत. २०१९ मध्ये सत्ता न मिळाल्याचा राग भाजप शिंदेंना हाताशी धरून काढत आहे. - महेश तपासे, प्रवक्ते, राष्ट्रवादी

खेड मतदारसंघात रामदास कदम पराभूत झाले, उद्धवजींनी त्यांना मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर पाठवून पुढे मंत्रीही केले. रामदास कदम यांनी मुलालाच विधानसभेचे तिकीट दिले. उद्धवजींना त्यांनी खूप त्रास दिला आहे. पक्षधोरणाविरुद्ध ते सतत बोलले आहेत. गद्दारीबद्दल त्यांनीच आत्मपरीक्षण करावे. - खा. अरविंद सावंत, शिवसेना

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळRamdas Kadamरामदास कदमSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे