शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांनी शिवसेना फोडली, उद्धवजींनी आत्मपरीक्षण करावे: रामदास कदम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 05:39 IST

शिवसेनेच्या आजच्या परिस्थितीला शरद पवार आणि अजित पवार हे नेते जबाबदार असल्याची टीका करत याबाबत उद्धव ठाकरेंनी यांनी आत्मपरीक्षण करावे, असे मत रामदास कदम यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेनेच्या आजच्या परिस्थितीला शरद पवार आणि अजित पवार हे नेते जबाबदार असल्याची टीका करतानाच शिवसेनेच्या आजच्या स्थितीबाबत उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे, असे मत माजी मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले. ते वृत्त वाहिन्यांशी बोलत होते.

मी ५० वर्षे शिवसेनेत झिजलो, ज्यांच्यासाठी एवढे केले त्यांनीच माझी हकालपट्टी केली. उद्धव साहेब... तुम्ही आणखी किती जणांची हकालपट्टी करणार आहात, तुम्हाला मातोश्रीवर बसून तेवढेच काम उरले आहे. शरद पवार शिवसेना फोडण्यात यशस्वी झाले. बाळासाहेब असताना जे शरद पवारांना जमले नाही ते पवारांनी उद्धवजींनासोबत घेऊन केले आणि डाव साधला. नशीब अडीच वर्षांत हे थांबले, पाच वर्षांत शिवसेना पूर्णच संपली असती, असे कदम म्हणाले.  

बंडखोर आमदारांनी शिवसेना फोडली. मातोश्रीला दगाफटका केला. ठाकरे कुटुंबीयांचा विश्वासघात केला आणि स्वत:च्या कृतीला योग्य आहे हे दाखविण्यासाठी त्याचे खापर राष्ट्रवादीच्या माथ्यावर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न रामदास कदम आणि काही बंडखोर नेते करीत आहेत. २०१९ मध्ये सत्ता न मिळाल्याचा राग भाजप शिंदेंना हाताशी धरून काढत आहे. - महेश तपासे, प्रवक्ते, राष्ट्रवादी

खेड मतदारसंघात रामदास कदम पराभूत झाले, उद्धवजींनी त्यांना मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर पाठवून पुढे मंत्रीही केले. रामदास कदम यांनी मुलालाच विधानसभेचे तिकीट दिले. उद्धवजींना त्यांनी खूप त्रास दिला आहे. पक्षधोरणाविरुद्ध ते सतत बोलले आहेत. गद्दारीबद्दल त्यांनीच आत्मपरीक्षण करावे. - खा. अरविंद सावंत, शिवसेना

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळRamdas Kadamरामदास कदमSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे