शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

कोरेगाव भीमा घटना- जिग्नेश मेवाणीला दोषी धरता येणार नाही- रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 14:43 IST

1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमावरून परतणाऱ्या दलित कार्यकर्त्यांवर स्थानिक मराठ्यांनी हल्ला केला असावा, असा संशय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली- गुजरातमधील दलित नेते जिग्नेश मेवाणींनी चिथावणीखोर भाषणामुळे कोरेगाव भीमा येथील हिंसाचार घडला, असा आरोप होतो आहे. पण या घटनेला त्यांना दोषी धरता येणार नाही. ज्यांनी दलित कार्यकर्त्यांवर हल्ला केला, त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल करायला हवेत, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. 'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

हिंसाचाराच्या घटनेमागे पेशव्यांचे समर्थक किंवा ब्राह्मणांचा हात नाही. घटना घडली त्यावेळी गावात त्यांची उपस्थिती लक्षणीय नव्हती, हे लक्षात घ्यावे. तर तिथे स्थानिक मराठेच होते. काही मुद्द्यांवरून गैरसमज पसरले होते. त्यामुळे तणाव निर्माण झाला. आता प्रकरण निवळलं आहे, असं रामदास आठवले यांनी म्हंटलं.  गुजरातमधील दलित नेता जिग्नेश मेवाणींच्या चिथावणीखोर भाषणामुळे हिंसाचार घडला, असा आरोप होतो आहे. पण या घटनेला त्याला दोषी धरता येणार नाही. ज्यांनी दलित कार्यकर्त्यांवर हल्ला केला, त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल करायला हवेत, अशी मागणीही त्यांनी केली.

'आमच्या कार्यकर्त्यांवर काही स्थानिक मराठ्यांनी हल्ला केला असण्याची शक्यता आहे. आमच्या संयमी कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी शोधून काढावं, अशी मागणी यावेळी रामदास आठवले यांनी केली. 2016मध्ये घडलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणापासून दोन्ही समाजांमध्ये तणावाचं वातावरण आहे. आम्ही मराठा आरक्षणाला नेहमीच पाठिंबा दिला आहे. रिपब्लिकन पक्षाची मराठा आघाडी आम्ही सुरू केली, असं स्पष्टीकरण रामदार आठवले यांनी दिलं आहे. समाजातील प्रत्येकाला आपल्या सोबत पुढे घेऊन जायचं आहे, असंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी बोलायचे, असंही रामदास आठवले यांनी म्हंटलं.  

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावRamdas Athawaleरामदास आठवले