शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
5
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
6
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
7
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
8
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
9
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
10
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
11
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
12
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
13
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
14
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
15
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
16
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
17
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
18
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
19
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
20
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
Daily Top 2Weekly Top 5

Ramdas Athawale : रामदास आठवले म्हणाले, "संभाजीराजेंनी भाजपसोबत राहायला हवे होते, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 13:34 IST

Ramdas Athawale : संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेने शब्द दिला होता, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिवसेनेने त्यांना धोका दिला आहे, भाजपने नाही, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

सोलापूर : राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना आणि भाजपाने राज्यसभेसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तर यासाठी महाराष्ट्रातून काँग्रेसने बाहेरचा उमेदवार दिल्याने नाराजी आहे. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपसोबत राहायला हवे होते. मात्र मागील काही दिवसांपासून त्यांच्या हालचाली या भाजपविरोधी होत्या, असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले आहे.

शिवसेने आधी उमेदवार जाहीर केला. त्यामुळे भाजपने उमेदवार जाहीर केला आहे. जर निवडणूक बिनविरोध करायची होती तर शिवसेने सहाव्या जागेसाठी उमेदवार द्यायला नको होता. तसेच, संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपसोबत राहायला हवे होते, मात्र मागील काही दिवसांपासून त्यांच्या हालचाली या भाजपविरोधी होत्या. भाजपकडून उमेदवारी हवी अशी त्यांची भूमिकाच नव्हती. ते अपक्ष उभे राहणार असेच म्हणत होते, असे रामदास आठवले म्हणाले. 

संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेने शब्द दिला होता, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिवसेनेने त्यांना धोका दिला आहे, भाजपने नाही, असे रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच, धनंजय महाडिक हे ताकदवर उमेदवार आहेत, त्यामुळे सहावी जागादेखील भाजप जिंकणार, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. याचबरोबर, केंद्रातील मोदी सरकारच्या आठ वर्षे पूर्तीनिमित्त रामदास आठवले यांनी कवितामय शुभेच्छा दिल्या. "मोदी साहेब आणि माझी पडली होती गाठ, त्याला वर्ष झाली आता पूर्ण आठ आणि शेतकऱ्यांची आम्ही अजिबात सोडणार नाही पाठ,  शेतकऱ्यांच्या दुष्मनांची लावून टाकू आम्ही वाट!", असे रामदास आठवले म्हणाले.

शेतकऱ्यांनी दोन वेळा आमच्या पाठीशी राहून आम्हाला निवडून दिले. आम्ही त्यांच्या विरोधात असूच शकत नाही. शेतकरी कायदे आणले, त्यामागे शेतकऱ्यांचे नुकसान व्हावे अशी आमची भावना अजिबात नव्हती. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातही शेतकरी कायदे आणू असे सांगितले होते, मात्र आम्ही आणलेल्या कायद्याला विरोध केला, असे रामदास आठवले म्हणाले.

शेतकरी कायदे परत आणायचे असतील तर सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करावे लागतील. मागचे शेतकरी कायदे रद्द केले, तेच कायदे परत आणायचे प्रयत्न झाले तर शेतकऱ्यांत रोष निर्माण होईल. आम्ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहोत. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करुनच नवीन कायद्यासंदर्भात विचार करु.पुढील अधिवेशनात हे कायदे आणणार नाही, कारण आमच्याकडे अजून दोन वर्षे आहेत आणि आणखी पाच वर्षे आमचेच सरकार असणार आहे, असेही रामदास आठवले यांनी सांगितले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाSolapurसोलापूर