शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
2
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
3
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
4
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
5
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
6
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
7
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
8
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
9
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
10
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
11
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
12
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
13
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
14
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
15
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
16
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
17
वेसावकरांनी भाल्याने फोडली हंडी; डोंगरीकर तरुण मंडळाला ९ वर्षांनी मिळाला मान
18
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
19
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
20
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला

Ramdas Athawale : रामदास आठवले म्हणाले, "संभाजीराजेंनी भाजपसोबत राहायला हवे होते, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 13:34 IST

Ramdas Athawale : संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेने शब्द दिला होता, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिवसेनेने त्यांना धोका दिला आहे, भाजपने नाही, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

सोलापूर : राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना आणि भाजपाने राज्यसभेसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तर यासाठी महाराष्ट्रातून काँग्रेसने बाहेरचा उमेदवार दिल्याने नाराजी आहे. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपसोबत राहायला हवे होते. मात्र मागील काही दिवसांपासून त्यांच्या हालचाली या भाजपविरोधी होत्या, असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले आहे.

शिवसेने आधी उमेदवार जाहीर केला. त्यामुळे भाजपने उमेदवार जाहीर केला आहे. जर निवडणूक बिनविरोध करायची होती तर शिवसेने सहाव्या जागेसाठी उमेदवार द्यायला नको होता. तसेच, संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपसोबत राहायला हवे होते, मात्र मागील काही दिवसांपासून त्यांच्या हालचाली या भाजपविरोधी होत्या. भाजपकडून उमेदवारी हवी अशी त्यांची भूमिकाच नव्हती. ते अपक्ष उभे राहणार असेच म्हणत होते, असे रामदास आठवले म्हणाले. 

संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेने शब्द दिला होता, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिवसेनेने त्यांना धोका दिला आहे, भाजपने नाही, असे रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच, धनंजय महाडिक हे ताकदवर उमेदवार आहेत, त्यामुळे सहावी जागादेखील भाजप जिंकणार, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. याचबरोबर, केंद्रातील मोदी सरकारच्या आठ वर्षे पूर्तीनिमित्त रामदास आठवले यांनी कवितामय शुभेच्छा दिल्या. "मोदी साहेब आणि माझी पडली होती गाठ, त्याला वर्ष झाली आता पूर्ण आठ आणि शेतकऱ्यांची आम्ही अजिबात सोडणार नाही पाठ,  शेतकऱ्यांच्या दुष्मनांची लावून टाकू आम्ही वाट!", असे रामदास आठवले म्हणाले.

शेतकऱ्यांनी दोन वेळा आमच्या पाठीशी राहून आम्हाला निवडून दिले. आम्ही त्यांच्या विरोधात असूच शकत नाही. शेतकरी कायदे आणले, त्यामागे शेतकऱ्यांचे नुकसान व्हावे अशी आमची भावना अजिबात नव्हती. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातही शेतकरी कायदे आणू असे सांगितले होते, मात्र आम्ही आणलेल्या कायद्याला विरोध केला, असे रामदास आठवले म्हणाले.

शेतकरी कायदे परत आणायचे असतील तर सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करावे लागतील. मागचे शेतकरी कायदे रद्द केले, तेच कायदे परत आणायचे प्रयत्न झाले तर शेतकऱ्यांत रोष निर्माण होईल. आम्ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहोत. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करुनच नवीन कायद्यासंदर्भात विचार करु.पुढील अधिवेशनात हे कायदे आणणार नाही, कारण आमच्याकडे अजून दोन वर्षे आहेत आणि आणखी पाच वर्षे आमचेच सरकार असणार आहे, असेही रामदास आठवले यांनी सांगितले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाSolapurसोलापूर