शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रामदास आठवलेंचाही पोलिसांवर गंभीर आरोप; अंबरनाथमध्ये कडकडीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 12:04 IST

भाजपचे आमदार अनिल गोटे यांनीही धुळे महापालिका निवडणुकीच्या आदल्या रात्री गाडीवर झालेल्या हल्ल्यावरून पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना मारहाण झाल्याच्या पार्श्वभुमीवर आज अंबरनाथ बंदची हाक देण्यात आली असून शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. तर आठवले यांनी केंद्रीय मंत्री असूनही पोलीस बंदोबस्त पुरवत नसल्याचा गंभीर आरोप केला आहे. 

अंबरनाथमधील घटना वाईट होती. मी गाडीतून उतरल्यानंतर माझ्यावर तरुणाने हल्ला केला. यावेळी पोलीस हजर असते तर ही घटना टाळता आली असती. केंद्रीय मंत्री असूनही पोलीस आपल्याला सुरक्षा पुरवत नाहीत. जेथे जेथे जातो तेथे कार्यकर्तेच आजुबाजुला असतात, असे आठवले म्हणाले. तसेच अंबरनाथमध्ये शांतता पाळण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.  

दरम्यान, भाजपचे आमदार अनिल गोटे यांनीही धुळे महापालिका निवडणुकीच्या आदल्या रात्री गाडीवर झालेल्या हल्ल्यावरून पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस चोर असून, विकले गेले आहेत. यामुळे त्यांनी मारहाणीत जखमी झालेल्या आपल्या कार्यकर्त्यावरच गुन्हा दाखल केला आहे, असा आरोप केला. यामुळे त्यांच्याकडे तक्रार केल्यास ते काय कारवाई करणार, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. 

 दरम्यान, या प्रकारानंतर आरपीआयच्यावतीने अंबरनाथ बंदची हाक देण्यात आली आहे. रविवारी सकाळपासून शहरातील सर्व रिक्षा आणि सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे आरोपी गोसावी यांच्या घराला देखील पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे.

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेambernathअंबरनाथPoliceपोलिस