शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

राहुल गांधींनी लग्न करून ‘हम दो हमारे दो’ची अंमलबजावणी करावी,रामदास आठवलेंचा सल्ला; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 17:26 IST

काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत केंद्रातील मोदी सरकारला 'हम दो-हमारे दो' म्हणत जोरदार टोला लगावला होता. (Rahul Gandhi)

पुणे -काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत केंद्रातील मोदी सरकारला 'हम दो-हमारे दो' (Hum Do Hamare Do) म्हणत जोरदार टोला लगावला होता. यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी राहुल यांना मोलाचा सल्ला दिला आहे. "राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि 'हम दो-हमारे दो'ची अंमलबजावणी करावी, असे आठवले यांनी म्हटले आहे. ते पिंपरी-चिंचवड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. आठवले हे नेहमीच आपल्या कवितांमुळे चर्चेत असतात. (Ramdas Athavale Advice Rahul Gandhi Should Get Married And Implement Hum Do Hamare Do)

"मोदी असो किंवा मनमोहन सिंग, राहुल गांधींकडून पंतप्रधानांचा अपमान"; अर्थमंत्री संतापल्या 

शेतकरी आंदोलनावर काय म्हणाले आठवले? -आठवले म्हणाले, दिल्लीतील शेतकरी आंदोलन वाढवत आहेत. सरकार चर्चेला तयार आहे. पण, कायदेच मागे घ्या, ही आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यांची ही भूमिका असंवैधानिक आहे. तसेच 200 शेतकऱ्यांच्या मृत्यूला अप्रत्यक्षपणे शेतकरीच जबाबदार आहेत. तिरंग्याचा अपमान दुर्दैवी आहे. याच बरोबर नवडणूक काळात काँग्रेसनेही आपल्या जाहीरनाम्यात कृषी कायद्याचे आश्वासन दिले होते, याची आठवणही आठवले यांनी करून दिली. 

पूजा चव्हान आत्महत्येसंदर्भात बोलताना, पूजा यांच्या आत्महत्येस कुणी जबाबदार असेल तर त्याची चौकशी व्हावी, असंही आठवले म्हणाले. तसेच, मराठा आरक्षणाला आरपीआयचा संपूर्ण पाठिंबा आहे. मात्र त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे. असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.

राहुल गांधींच्या ‘हम दो, हमारे दो’ वक्तव्यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा पलटवार; भरसभागृहात म्हणाले...

राहुल गांधींनी नेहमीच पंतप्रधानांचा अपमान केला आहे - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'हम दो हमारे दो' विधानावरून सणसणीत टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी नेहमीच पंतप्रधानांचा अपमान केला आहे. मग ते सद्य पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग.. माजी पंतप्रधान परदेशात गेले असताना राहुल गांधींनी त्यांच्याकडून आणण्यात आलेला अध्यादेश फाडून फेकून दिला होता, याची आठवण सीतारामन यांनी करून दिली. ‘हम दो, हमारे दो’ हेच मोदी यांचे सरकार; राहुल गांधी यांचा लोकसभेत घणाघात 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसRamdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपा