शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

हिंदुत्वाच्या मुद्यावरून राम कदम यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 14:53 IST

शिवसेना सत्तेसाठी हिंदुत्व विसरल्याची जेव्हा टीका होऊ लागली, त्यावेळीच उद्धव ठाकरे यांना श्रीराम यांची आठवण आली असल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येत जाणार असल्याचे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. राज्य सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जातील. तसेच, श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर उद्धव ठाकरेंच्या याच अयोध्या दौऱ्यावरून भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

कदम म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाणार असून ही चांगली गोष्ट आहे. तसं तर ते अडीच महिन्यापूर्वीचं जाणार होते. मात्र शिवसेना सत्तेसाठी हिंदुत्व विसरल्याची जेव्हा टीका होऊ लागली, त्यावेळीच उद्धव ठाकरे यांना श्रीराम यांची आठवण आली असल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेचं अयोध्या दौऱ्याचं टाईमिंग खूप महत्वाचे आहे. शिवसेना हिंदुत्व विसरली, सावरकरांवरील त्यांचे प्रेम कमी झाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचे अपमान केल्यानंतर सुद्धा त्यांनी माफी मागीतीली नाही, अशा चर्चा जेव्हा होऊ लागल्या त्यावेळी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला श्रीराम यांची आठवण येत असल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे.

तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी घेत असलेल्या अधिवेशनातून हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करणार आहे. त्यामुळे त्यांच्या अधिवेशनाच्या आदल्या दिवशीच शिवसेनेला श्रीराम यांची आठवण आली असल्याचा खोचक टोला कदम यांनी शिवसेनेला लगावला.