शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हिंदुत्वाच्या मुद्यावरून राम कदम यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 14:53 IST

शिवसेना सत्तेसाठी हिंदुत्व विसरल्याची जेव्हा टीका होऊ लागली, त्यावेळीच उद्धव ठाकरे यांना श्रीराम यांची आठवण आली असल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येत जाणार असल्याचे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. राज्य सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जातील. तसेच, श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर उद्धव ठाकरेंच्या याच अयोध्या दौऱ्यावरून भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

कदम म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाणार असून ही चांगली गोष्ट आहे. तसं तर ते अडीच महिन्यापूर्वीचं जाणार होते. मात्र शिवसेना सत्तेसाठी हिंदुत्व विसरल्याची जेव्हा टीका होऊ लागली, त्यावेळीच उद्धव ठाकरे यांना श्रीराम यांची आठवण आली असल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेचं अयोध्या दौऱ्याचं टाईमिंग खूप महत्वाचे आहे. शिवसेना हिंदुत्व विसरली, सावरकरांवरील त्यांचे प्रेम कमी झाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचे अपमान केल्यानंतर सुद्धा त्यांनी माफी मागीतीली नाही, अशा चर्चा जेव्हा होऊ लागल्या त्यावेळी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला श्रीराम यांची आठवण येत असल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे.

तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी घेत असलेल्या अधिवेशनातून हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करणार आहे. त्यामुळे त्यांच्या अधिवेशनाच्या आदल्या दिवशीच शिवसेनेला श्रीराम यांची आठवण आली असल्याचा खोचक टोला कदम यांनी शिवसेनेला लगावला.