शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

"महिला नेत्याच्या मुलीची छेड काढणारे कुठल्या पक्षाचे ते लगेच जाहीर करा"; जयंत पाटलांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 18:39 IST

Jayant Patil: केंद्रीय मंत्र्यांची मुले सुरक्षित नसतील तर सामान्य माणसाचे काय? हाच गंभीर प्रश्न असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patil on Jalgaon case: राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. स्वारगेट बस डेपोतील बलात्कार प्रकरण ताजे असतानाच, आता एक धक्कादायक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे घडली. भाजपच्या महिला नेत्या आणि केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीसह अन्य काही मुलींची यात्रेदरम्यान टवाळखोरांनी छेड काढली. या घटनेबाबत दोन दिवसांपूर्वी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र अद्याप कारवाई न झाल्याने स्वतः केंद्रीय मंत्र्यांना पोलीस ठाण्यात जाऊन ठिय्या द्यावा लागला. या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते टवाळखोर मुलं एका विशिष्ट पक्षाचे असल्याचे सांगितले. तर त्या टवाळखोरा मुलांच्या पक्षाचे नाव लवकर जाहीर करून टाकावे, असे आव्हान शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी दिले.

काय म्हणाले जयंत पाटील?

"महिला नेत्याच्या मुलीशी काही टवाळक्यांनी छेडछाड केल्याची बातमी वाचली. हा अत्यंत किळसवाणा प्रकार आहे. या गोष्टीचा निषेध करावा तितका कमी आहे. सध्याच्या काळात राज्यात मवालीगीरी वाढली आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीनी सुरक्षित नाहीत. त्यामुळे असे गुन्हे महाराष्ट्रात राजरोसपणे घडत आहे. परंतु याबाबत शासन कोणतीही कडक पावले उचलत नाही म्हणून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही," अशा शब्दांत त्यांनी ट्विटरवरून रोष व्यक्त केला.

त्या पक्षाचे नाव जाहीर करा...

"जर केंद्रीय मंत्र्यांची मुले सुरक्षित नसतील तर सामान्य माणसाचे काय? असा गंभीर प्रश्न या प्रकरणातून उभा राहिला आहे. मुख्यमंत्री महोदय म्हणतात की एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत. असे असेल तर लवकरात लवकर त्यांनी त्या पक्षाचे नाव जाहीर करावे," असे आव्हानच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

"दुर्दैवाने त्या घटनेत एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत, ज्यांनी अतिशय वाईट प्रकारचं काम केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून काहीना अटकही झाली आहे. इतरांनाही अटक केली जाईल. सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे त्रास देणे, छेडछाड करणे हे अत्यंत चुकीचे आहे. कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना माफी देता कामा नये. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल," अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.

टॅग्स :raksha khadseरक्षा खडसेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJayant Patilजयंत पाटीलMuktainagarमुक्ताईनगर