शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

"महिला नेत्याच्या मुलीची छेड काढणारे कुठल्या पक्षाचे ते लगेच जाहीर करा"; जयंत पाटलांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 18:39 IST

Jayant Patil: केंद्रीय मंत्र्यांची मुले सुरक्षित नसतील तर सामान्य माणसाचे काय? हाच गंभीर प्रश्न असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patil on Jalgaon case: राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. स्वारगेट बस डेपोतील बलात्कार प्रकरण ताजे असतानाच, आता एक धक्कादायक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे घडली. भाजपच्या महिला नेत्या आणि केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीसह अन्य काही मुलींची यात्रेदरम्यान टवाळखोरांनी छेड काढली. या घटनेबाबत दोन दिवसांपूर्वी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र अद्याप कारवाई न झाल्याने स्वतः केंद्रीय मंत्र्यांना पोलीस ठाण्यात जाऊन ठिय्या द्यावा लागला. या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते टवाळखोर मुलं एका विशिष्ट पक्षाचे असल्याचे सांगितले. तर त्या टवाळखोरा मुलांच्या पक्षाचे नाव लवकर जाहीर करून टाकावे, असे आव्हान शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी दिले.

काय म्हणाले जयंत पाटील?

"महिला नेत्याच्या मुलीशी काही टवाळक्यांनी छेडछाड केल्याची बातमी वाचली. हा अत्यंत किळसवाणा प्रकार आहे. या गोष्टीचा निषेध करावा तितका कमी आहे. सध्याच्या काळात राज्यात मवालीगीरी वाढली आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीनी सुरक्षित नाहीत. त्यामुळे असे गुन्हे महाराष्ट्रात राजरोसपणे घडत आहे. परंतु याबाबत शासन कोणतीही कडक पावले उचलत नाही म्हणून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही," अशा शब्दांत त्यांनी ट्विटरवरून रोष व्यक्त केला.

त्या पक्षाचे नाव जाहीर करा...

"जर केंद्रीय मंत्र्यांची मुले सुरक्षित नसतील तर सामान्य माणसाचे काय? असा गंभीर प्रश्न या प्रकरणातून उभा राहिला आहे. मुख्यमंत्री महोदय म्हणतात की एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत. असे असेल तर लवकरात लवकर त्यांनी त्या पक्षाचे नाव जाहीर करावे," असे आव्हानच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

"दुर्दैवाने त्या घटनेत एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत, ज्यांनी अतिशय वाईट प्रकारचं काम केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून काहीना अटकही झाली आहे. इतरांनाही अटक केली जाईल. सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे त्रास देणे, छेडछाड करणे हे अत्यंत चुकीचे आहे. कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना माफी देता कामा नये. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल," अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.

टॅग्स :raksha khadseरक्षा खडसेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJayant Patilजयंत पाटीलMuktainagarमुक्ताईनगर