शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

Rajyasabha Election: उरली फक्त ६० मिनिटं, कोण घेणार माघार?; राज्यातील राजकारणाला आला वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 13:55 IST

भाजपाने या निवडणुकीत माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केले आहे. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनीही राज्यातील भाजपा नेत्यांना ग्रीन सिग्नल दिले आहे.

मुंबई - राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यात राजकीय खलबतं वाढली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सागर बंगल्यावर जात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. भाजपानंराज्यसभा निवडणुकीत माघार घ्यावी त्याबदल्यात विधान परिषदेची पाचवी जागा भाजपाला देऊ असा प्रस्ताव बैठकीत दिला. परंतु हा प्रस्ताव भाजपानं नाकारला आहे. त्यानंतर आता भाजपा नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. 

काँग्रेसनं राज्याबाहेरील उमेदवार दिल्यानं अनेक काँग्रेस आमदार नाराज असल्याची बातमी आहे. इमरान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्यानं राज्यातील काँग्रेस नेते नाराज असल्याचं दिसून येते. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत कुठेही दगाफटका होऊ नये यासाठी वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीचे नेत्यांनी भाजपा नेत्यांची बैठक घेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली परंतु त्याला यश आले नाही. राज्यसभा निवडणुकीसाठी आज दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. काँग्रेसमध्ये नाराजी असल्यानं भाजपानं एकाची उमेदवारी मागे घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू झाले. 

भाजपाने या निवडणुकीत माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केले आहे. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनीही राज्यातील भाजपा नेत्यांना ग्रीन सिग्नल दिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. काँग्रेसला सत्तेत राहून नेमकं मिळतंय काय? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होतो. भाजपाच्या भूमिकेनंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मंत्री अशोक चव्हाण यांच्या बंगल्यावर बैठक सुरू आहे. त्यात शिवसेनेने अपक्ष आमदारांसह स्वपक्षीय आमदारांना वर्षावर बोलावलं आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. 

मविआ आणि भाजपाचा एकमेकांना प्रस्तावराज्यसभेच्या सहा जागांसाठी शिवसेनेने २, भाजपाने ३ तर काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रत्येकी १ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे सहाव्या जागेवर कोण निवडून येणार यासाठी चुरस निर्माण झाली आहे. मात्र तत्पूर्वी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मविआ नेते आणि भाजपा नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत मविआने भाजपाला राज्यसभा निवडणूक बिनविरोध करा त्याऐवजी आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजपाला पाचवी जागा देऊ असा प्रस्ताव दिला. मात्र फडणवीसांनीही राज्यसभेच्या निवडणुकीत मविआने माघार घ्यावी त्याबदल्यात विधान परिषेदत १ जागा सोडू असा फेरप्रस्ताव दिला. त्यामुळे आता राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा