शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Rajyasabha Election: उरली फक्त ६० मिनिटं, कोण घेणार माघार?; राज्यातील राजकारणाला आला वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 13:55 IST

भाजपाने या निवडणुकीत माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केले आहे. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनीही राज्यातील भाजपा नेत्यांना ग्रीन सिग्नल दिले आहे.

मुंबई - राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यात राजकीय खलबतं वाढली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सागर बंगल्यावर जात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. भाजपानंराज्यसभा निवडणुकीत माघार घ्यावी त्याबदल्यात विधान परिषदेची पाचवी जागा भाजपाला देऊ असा प्रस्ताव बैठकीत दिला. परंतु हा प्रस्ताव भाजपानं नाकारला आहे. त्यानंतर आता भाजपा नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. 

काँग्रेसनं राज्याबाहेरील उमेदवार दिल्यानं अनेक काँग्रेस आमदार नाराज असल्याची बातमी आहे. इमरान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्यानं राज्यातील काँग्रेस नेते नाराज असल्याचं दिसून येते. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत कुठेही दगाफटका होऊ नये यासाठी वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीचे नेत्यांनी भाजपा नेत्यांची बैठक घेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली परंतु त्याला यश आले नाही. राज्यसभा निवडणुकीसाठी आज दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. काँग्रेसमध्ये नाराजी असल्यानं भाजपानं एकाची उमेदवारी मागे घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू झाले. 

भाजपाने या निवडणुकीत माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केले आहे. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनीही राज्यातील भाजपा नेत्यांना ग्रीन सिग्नल दिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. काँग्रेसला सत्तेत राहून नेमकं मिळतंय काय? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होतो. भाजपाच्या भूमिकेनंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मंत्री अशोक चव्हाण यांच्या बंगल्यावर बैठक सुरू आहे. त्यात शिवसेनेने अपक्ष आमदारांसह स्वपक्षीय आमदारांना वर्षावर बोलावलं आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. 

मविआ आणि भाजपाचा एकमेकांना प्रस्तावराज्यसभेच्या सहा जागांसाठी शिवसेनेने २, भाजपाने ३ तर काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रत्येकी १ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे सहाव्या जागेवर कोण निवडून येणार यासाठी चुरस निर्माण झाली आहे. मात्र तत्पूर्वी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मविआ नेते आणि भाजपा नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत मविआने भाजपाला राज्यसभा निवडणूक बिनविरोध करा त्याऐवजी आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजपाला पाचवी जागा देऊ असा प्रस्ताव दिला. मात्र फडणवीसांनीही राज्यसभेच्या निवडणुकीत मविआने माघार घ्यावी त्याबदल्यात विधान परिषेदत १ जागा सोडू असा फेरप्रस्ताव दिला. त्यामुळे आता राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा