शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Rajyasabha Election: उरली फक्त ६० मिनिटं, कोण घेणार माघार?; राज्यातील राजकारणाला आला वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 13:55 IST

भाजपाने या निवडणुकीत माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केले आहे. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनीही राज्यातील भाजपा नेत्यांना ग्रीन सिग्नल दिले आहे.

मुंबई - राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यात राजकीय खलबतं वाढली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सागर बंगल्यावर जात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. भाजपानंराज्यसभा निवडणुकीत माघार घ्यावी त्याबदल्यात विधान परिषदेची पाचवी जागा भाजपाला देऊ असा प्रस्ताव बैठकीत दिला. परंतु हा प्रस्ताव भाजपानं नाकारला आहे. त्यानंतर आता भाजपा नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. 

काँग्रेसनं राज्याबाहेरील उमेदवार दिल्यानं अनेक काँग्रेस आमदार नाराज असल्याची बातमी आहे. इमरान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्यानं राज्यातील काँग्रेस नेते नाराज असल्याचं दिसून येते. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत कुठेही दगाफटका होऊ नये यासाठी वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीचे नेत्यांनी भाजपा नेत्यांची बैठक घेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली परंतु त्याला यश आले नाही. राज्यसभा निवडणुकीसाठी आज दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. काँग्रेसमध्ये नाराजी असल्यानं भाजपानं एकाची उमेदवारी मागे घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू झाले. 

भाजपाने या निवडणुकीत माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केले आहे. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनीही राज्यातील भाजपा नेत्यांना ग्रीन सिग्नल दिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. काँग्रेसला सत्तेत राहून नेमकं मिळतंय काय? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होतो. भाजपाच्या भूमिकेनंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मंत्री अशोक चव्हाण यांच्या बंगल्यावर बैठक सुरू आहे. त्यात शिवसेनेने अपक्ष आमदारांसह स्वपक्षीय आमदारांना वर्षावर बोलावलं आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. 

मविआ आणि भाजपाचा एकमेकांना प्रस्तावराज्यसभेच्या सहा जागांसाठी शिवसेनेने २, भाजपाने ३ तर काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रत्येकी १ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे सहाव्या जागेवर कोण निवडून येणार यासाठी चुरस निर्माण झाली आहे. मात्र तत्पूर्वी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मविआ नेते आणि भाजपा नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत मविआने भाजपाला राज्यसभा निवडणूक बिनविरोध करा त्याऐवजी आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजपाला पाचवी जागा देऊ असा प्रस्ताव दिला. मात्र फडणवीसांनीही राज्यसभेच्या निवडणुकीत मविआने माघार घ्यावी त्याबदल्यात विधान परिषेदत १ जागा सोडू असा फेरप्रस्ताव दिला. त्यामुळे आता राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा