शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Rajya Sabha Election Result: राज्यसभा निवडणुकीत बविआने कुणाला मतदान केलं? हितेंद्र ठाकूर यांनी अगदी तपशीलवार सांगितलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 18:38 IST

Rajya Sabha Election Result: काही अपक्ष आणि बहुजन विकास आघाडीने महाविकास आघाडीला मतदान केले नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याला आता हितेंद्र ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुकीत कुणाला मतदान केलं, या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी दिलं आहे.

मुंबई - काल झालेल्या राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकीमध्ये अपक्ष आणि छोट्या पक्षांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या महाविकास आघाडीसोबत असल्याचे दाखवणाऱ्या काही अपक्ष आणि छोट्या पक्षांनी भाजपाच्या धनंजय महाडिक यांना मतदान केल्याने निवडणुकीचे चित्र बदलल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यातच काही अपक्ष आणि बहुजन विकास आघाडीने महाविकास आघाडीला मतदान केले नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याला आता हितेंद्र ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुकीत कुणाला मतदान केलं, या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी दिलं आहे.

संजय राऊत यांनी बविआची मतं आम्हाला मिळाली नाहीत, असं म्हटलं आहे, अशी विचारणा केली असता हितेंद्र ठाकूर म्हणाले की, ते काय बोलले हे मला माहिती नाही. मतदान गुप्त असतं. त्यांच्या त्यांच्या पक्षांची मतं ते आपल्या प्रतिनिधील दाखवून टाकतात. मात्र आमच्यासारखे छोटे पक्ष, अपक्षांना मत दाखवण्याचं बंधन नसतं. विधानसभेत अशी एकूण ३० मतं आहेत. त्यामुळे अमूक एक मतं मिळाली नाहीत, असं कुणी सांगू शकत नाही. आम्हाला जेवढे उमेदवार तेवढी मतं देता येतात. आम्ही जे निवडून आलेले उमेदवार आहेत. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, इम्रान प्रतापगडी, संजय राऊ, पियूष गोयल, अनिल भोंडे आणि मुन्ना महाडिक यांना प्राधान्यक्रमानुसार मतं दिली आहेत, असे हितेंद्र ठाकूर म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत यांनी केलेले घोडेबाजाराच्या आरोपावरही हितेंद्र ठाकूर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते समजदार असतील तर असं बोलणार नाहीत. कुठलाही राजकारणी माझ्यावर असा आरोप करणार नाही. मी आमदार आहे घोडा नाही. मी त्यादिवशीही बोललो आहो. नॉट फॉर सेल. मला विकत घेणारा पक्ष बघायचा आहे.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाHitendra Thakurहितेंद्र ठाकूरSanjay Rautसंजय राऊत