शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

ऊसदरासाठी स्वाभिमानी आक्रमक; पुणे-बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 09:49 IST

महामार्गावर शिरोली पुलाजवळ महामार्ग रोखण्यात येणार आहे. संघटनेचे कार्यकर्ते सकाळी आंदोलनस्थळी दाखल होतील.

कोल्हापूर : ऊस दरावरून निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी बुधवारी मुंबईत सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठकही तोडग्याविना निष्फळ ठरली. मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला चारशेऐवजी किमान १०० रुपये मिळालेच पाहिजेत, यावर 'स्वाभिमानी'चे नेते राजू शेट्टी ठाम राहिल्याने पेच वाढला. त्यामुळे आज, गुरुवारी सकाळी ११ वाजता पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन आहे.

महामार्गावर शिरोली पुलाजवळ महामार्ग रोखण्यात येणार आहे. संघटनेचे कार्यकर्ते सकाळी आंदोलनस्थळी दाखल होतील. त्यानुसार महामार्ग रोखण्याचे नियोजन आहे. पोलिसांनीही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तयारी केली आहे. पोलीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना ताब्यात घेण्याची शक्यता असली तरी हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होणार असल्याचा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.

मागील वर्षीच्या तुटलेल्या ऊसाचे ४०० रुपये आणि पुढील वर्षी उसाला ३५०० रुपये दर द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रात तीव्र आंदोलन पुकारण्यात आले आहे. या मागण्यांकडे राज्य सरकार आणि साखर कारखानदार लक्ष देत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिलेला आहे. तसेच, आम्हाला किमान १०० रुपये मिळाले पाहिजे, असे शेवटचे सांगितले आहे. मात्र, आता यापेक्षा एक रुपया कमी घेणार नाही. जर कारखानदार मुंबईतून येताना पैसे देण्यास तयार झाले तर आजच्या आंदोलनाबाबत विचार करू, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, बुधवारी मुंबईत सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मुंबईतील बैठकीत साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, सहकार सचिव राजेश प्रधान यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांचे अध्यक्ष उपस्थित होते. तसेच, राजू शेट्टी हे जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाइन सहभागी झाले होते. त्यावेळी राजू शेट्टी म्हणाले, ज्यावेळी साखरेचे दर कमी होते, अशा अडचणीच्या काळात आम्ही कारखानदारांना सहकार्य केले. आता, चांगले भाव असताना कायद्याची भाषा करीत आहेत. 

एफआरपीपेक्षा जादा रक्कम देऊ नये, असा कायदा आहे का? एफआरपीशिवाय दिलेल्या रकमेला शासनाने मान्यता द्यावी, असे राजू शेट्टी यांनी सांगितले. तर आता ही रक्कम देणे शक्य नसल्याचे साखर कारखान्यांचे मत आहे. मागील हंगामातील देता येणार नाही आणि पुढचे किती द्यायचे, हे आताच सांगता येणार नसल्याने आंदोलन थांबवून कारखाने सुरू करावेत, असे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले. मात्र, मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला चारशेऐवजी किमान १०० रुपये मिळालेच पाहिजेत, यावर 'स्वाभिमानी'चे नेते राजू शेट्टी ठाम राहिल्याने पेच वाढला. त्यामुळे आज पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊस