शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Sambhaji Raje पूर्वी गडकोट किल्ल्यावर न बोलणारे लोक आता...; छत्रपती संभाजीराजेंचा मविआला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 12:43 IST

राजकोट किल्ल्यावरील घटनेवरून संभाजीराजे यांनी महायुती आणि महाविकास आघाडीवर प्रश्नांचा भडीमार करत टीका केली आहे. 

मुंबई - वाऱ्याच्या वेगाने पुतळा पडला हे काही उत्तर नाही. या गोष्टींचा विचार याआधी व्हायला हवा होता. घाईगडबडीने जे असे निर्णय घेतले ते पोषक नाही. पुतळा उभारताना ज्या काही जाचक अटी असतात त्या सगळ्यांचा सखोल अभ्यास होणं आवश्यक आहे. आता या घटनेनंतर राजकारण व्हायला लागलं आहे त्यात दुमत नाही. पूर्वी गडकोट किल्ल्यांवर न बोलणारे लोक आता बोलतायेत ही आनंदाची बाब आहे असा टोला माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

राजकोट किल्ल्यावरील घटनेनंतर संभाजीराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी स्वत: गडकोट किल्ल्यांबाबत अनेक वर्ष काम करतोय. हे आंदोलन बघून मला शॉकिंग वाटलं. या निमित्ताने सगळे बोलायला लागलेत. विशालगडावरील अतिक्रमणावर मी भूमिका घेतली, सगळ्या धर्मातील लोक तिथे घुसले होते. सगळ्यांना काढा असं मी बोललो त्यावर कुणी चर्चा केली नाही. परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांबाबत जे प्रेम दाखवायला लागलेत ती चांगली बाब आहे असं त्यांनी विरोधकांना म्हटलं. 

तसेच गडकोट किल्ल्यांसाठी तुम्ही काय केले हे महायुती आणि महाविकास आघाडीनं सांगावे. किती पैसे खर्च केलेत? रायगड किल्ल्याबाबत मी पुढाकार घेतला त्यामुळे त्याचे जतन संवर्धन सुरू आहे. बाकी कुठल्या किल्ल्याचे सुरू आहे? काहीच नाही. ३५० वर्ष झाली, गेल्या वर्षभरात महायुती सरकारने गडकोट किल्ल्यांसाठी काय केले ते बोलावे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे आजोबा जेव्हा परदेशात गेले, इटलीत त्यांचे निधन झाले. तिथे आजही त्यांची समाधी आहे. इतक्या सुंदर पद्धतीने ते सांभाळतात. इटलीचे सरकार सांभाळ करतात परंतु आपले सरकार या वास्तू का सांभाळत नाही? असा सवालही छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी केला.

दरम्यान, राजकोटच्या किल्ल्यासाठी कला संचालनायलाने परवानगी दिली होती का? पुतळा उभारण्यासाठी सरकारने काही नियमावली बनवली आहे. त्यावर चर्चा व्हायला हवी. मी १२ डिसेंबर २०२३ ला पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होते. हा पुतळा साजेशा नाही, कामही पूर्णत्वास नाही त्यामुळे तो बदलावा अशी मागणी केली होती. दुर्दैवाने आज तो पुतळा पडला. महाराष्ट्राच्या दृष्टीने ती दुर्दैवी आहे. जे घडायला नको ते घडलेले आहे. साधा शिवाजी महाराजांचा पुतळा गावातही उभा करायचा असेल तर त्याला अनेक अटी असतात. पंतप्रधान, राष्ट्रपती उद्धाटनाला येतात तेव्हा अधिक जाचक अटी असतात, त्याचे पालन झाले का याची चौकशी होणे गरजेचे आहे असंही छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती