शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

Sambhaji Raje पूर्वी गडकोट किल्ल्यावर न बोलणारे लोक आता...; छत्रपती संभाजीराजेंचा मविआला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 12:43 IST

राजकोट किल्ल्यावरील घटनेवरून संभाजीराजे यांनी महायुती आणि महाविकास आघाडीवर प्रश्नांचा भडीमार करत टीका केली आहे. 

मुंबई - वाऱ्याच्या वेगाने पुतळा पडला हे काही उत्तर नाही. या गोष्टींचा विचार याआधी व्हायला हवा होता. घाईगडबडीने जे असे निर्णय घेतले ते पोषक नाही. पुतळा उभारताना ज्या काही जाचक अटी असतात त्या सगळ्यांचा सखोल अभ्यास होणं आवश्यक आहे. आता या घटनेनंतर राजकारण व्हायला लागलं आहे त्यात दुमत नाही. पूर्वी गडकोट किल्ल्यांवर न बोलणारे लोक आता बोलतायेत ही आनंदाची बाब आहे असा टोला माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

राजकोट किल्ल्यावरील घटनेनंतर संभाजीराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी स्वत: गडकोट किल्ल्यांबाबत अनेक वर्ष काम करतोय. हे आंदोलन बघून मला शॉकिंग वाटलं. या निमित्ताने सगळे बोलायला लागलेत. विशालगडावरील अतिक्रमणावर मी भूमिका घेतली, सगळ्या धर्मातील लोक तिथे घुसले होते. सगळ्यांना काढा असं मी बोललो त्यावर कुणी चर्चा केली नाही. परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांबाबत जे प्रेम दाखवायला लागलेत ती चांगली बाब आहे असं त्यांनी विरोधकांना म्हटलं. 

तसेच गडकोट किल्ल्यांसाठी तुम्ही काय केले हे महायुती आणि महाविकास आघाडीनं सांगावे. किती पैसे खर्च केलेत? रायगड किल्ल्याबाबत मी पुढाकार घेतला त्यामुळे त्याचे जतन संवर्धन सुरू आहे. बाकी कुठल्या किल्ल्याचे सुरू आहे? काहीच नाही. ३५० वर्ष झाली, गेल्या वर्षभरात महायुती सरकारने गडकोट किल्ल्यांसाठी काय केले ते बोलावे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे आजोबा जेव्हा परदेशात गेले, इटलीत त्यांचे निधन झाले. तिथे आजही त्यांची समाधी आहे. इतक्या सुंदर पद्धतीने ते सांभाळतात. इटलीचे सरकार सांभाळ करतात परंतु आपले सरकार या वास्तू का सांभाळत नाही? असा सवालही छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी केला.

दरम्यान, राजकोटच्या किल्ल्यासाठी कला संचालनायलाने परवानगी दिली होती का? पुतळा उभारण्यासाठी सरकारने काही नियमावली बनवली आहे. त्यावर चर्चा व्हायला हवी. मी १२ डिसेंबर २०२३ ला पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होते. हा पुतळा साजेशा नाही, कामही पूर्णत्वास नाही त्यामुळे तो बदलावा अशी मागणी केली होती. दुर्दैवाने आज तो पुतळा पडला. महाराष्ट्राच्या दृष्टीने ती दुर्दैवी आहे. जे घडायला नको ते घडलेले आहे. साधा शिवाजी महाराजांचा पुतळा गावातही उभा करायचा असेल तर त्याला अनेक अटी असतात. पंतप्रधान, राष्ट्रपती उद्धाटनाला येतात तेव्हा अधिक जाचक अटी असतात, त्याचे पालन झाले का याची चौकशी होणे गरजेचे आहे असंही छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती