शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

Sambhaji Raje पूर्वी गडकोट किल्ल्यावर न बोलणारे लोक आता...; छत्रपती संभाजीराजेंचा मविआला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 12:43 IST

राजकोट किल्ल्यावरील घटनेवरून संभाजीराजे यांनी महायुती आणि महाविकास आघाडीवर प्रश्नांचा भडीमार करत टीका केली आहे. 

मुंबई - वाऱ्याच्या वेगाने पुतळा पडला हे काही उत्तर नाही. या गोष्टींचा विचार याआधी व्हायला हवा होता. घाईगडबडीने जे असे निर्णय घेतले ते पोषक नाही. पुतळा उभारताना ज्या काही जाचक अटी असतात त्या सगळ्यांचा सखोल अभ्यास होणं आवश्यक आहे. आता या घटनेनंतर राजकारण व्हायला लागलं आहे त्यात दुमत नाही. पूर्वी गडकोट किल्ल्यांवर न बोलणारे लोक आता बोलतायेत ही आनंदाची बाब आहे असा टोला माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

राजकोट किल्ल्यावरील घटनेनंतर संभाजीराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी स्वत: गडकोट किल्ल्यांबाबत अनेक वर्ष काम करतोय. हे आंदोलन बघून मला शॉकिंग वाटलं. या निमित्ताने सगळे बोलायला लागलेत. विशालगडावरील अतिक्रमणावर मी भूमिका घेतली, सगळ्या धर्मातील लोक तिथे घुसले होते. सगळ्यांना काढा असं मी बोललो त्यावर कुणी चर्चा केली नाही. परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांबाबत जे प्रेम दाखवायला लागलेत ती चांगली बाब आहे असं त्यांनी विरोधकांना म्हटलं. 

तसेच गडकोट किल्ल्यांसाठी तुम्ही काय केले हे महायुती आणि महाविकास आघाडीनं सांगावे. किती पैसे खर्च केलेत? रायगड किल्ल्याबाबत मी पुढाकार घेतला त्यामुळे त्याचे जतन संवर्धन सुरू आहे. बाकी कुठल्या किल्ल्याचे सुरू आहे? काहीच नाही. ३५० वर्ष झाली, गेल्या वर्षभरात महायुती सरकारने गडकोट किल्ल्यांसाठी काय केले ते बोलावे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे आजोबा जेव्हा परदेशात गेले, इटलीत त्यांचे निधन झाले. तिथे आजही त्यांची समाधी आहे. इतक्या सुंदर पद्धतीने ते सांभाळतात. इटलीचे सरकार सांभाळ करतात परंतु आपले सरकार या वास्तू का सांभाळत नाही? असा सवालही छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी केला.

दरम्यान, राजकोटच्या किल्ल्यासाठी कला संचालनायलाने परवानगी दिली होती का? पुतळा उभारण्यासाठी सरकारने काही नियमावली बनवली आहे. त्यावर चर्चा व्हायला हवी. मी १२ डिसेंबर २०२३ ला पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होते. हा पुतळा साजेशा नाही, कामही पूर्णत्वास नाही त्यामुळे तो बदलावा अशी मागणी केली होती. दुर्दैवाने आज तो पुतळा पडला. महाराष्ट्राच्या दृष्टीने ती दुर्दैवी आहे. जे घडायला नको ते घडलेले आहे. साधा शिवाजी महाराजांचा पुतळा गावातही उभा करायचा असेल तर त्याला अनेक अटी असतात. पंतप्रधान, राष्ट्रपती उद्धाटनाला येतात तेव्हा अधिक जाचक अटी असतात, त्याचे पालन झाले का याची चौकशी होणे गरजेचे आहे असंही छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती